शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम दहशतवादी हल्ला: पाकिस्तानी उच्चायोगाने केक मागविला; कशासाठी?
2
Elphinstone Bridge: तारीख निश्चित! एल्फिन्स्टन ब्रिज २५ एप्रिलपासून वाहतुकीसाठी बंद, मुंबईकरांची कोंडी होणार
3
डोळ्यात अश्रू, कपड्यांवर रक्ताचे डाग..! दहशतवादी हल्ल्यात डोळ्यादेखत वडिलांना गमावलेल्या लेकीनेच केले अंत्यसंस्कार
4
या सरकारी बँकेनं सुरू केलं लोन कॅम्पेन; कमी व्याजदर आणि शून्य चार्जेसवर मिळणार कर्ज, अखेरची तारीख कधी?
5
मुलगी झाली हो..! ; अभिनेता चिराग पाटील दुसऱ्यांदा झाला बाबा, पोस्ट शेअर करत दिली खुशखबर
6
Pahalgam Attack Video: दहशतवाद्यांनी पर्यटकांची अशी केली हत्या; गोळ्या झाडतानाचा व्हिडीओ समोर
7
Indus Waters Treaty: ६५ वर्षे जुना सिंधू पाणी करार काय आहे? पाकिस्तानवर किती परिणाम होईल?; वाचा सविस्तर
8
"मला पहलगाम दहशतवादी हल्ल्याबद्दल आधीच माहित होतं"; 'त्या' व्यक्तीचा पोलिसांना फोन अन्...
9
मोठा खुलासा! लेफ्टनंट विनयने दोन दहशतवाद्यांना पकडलेले; नौदलाचा अधिकारी धारातीर्थी पडला
10
"तुला ठार मारू’’, भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक गौतम गंभीरला दहशतवादी संघटनेकडून धमकी
11
‘जीव वाचवण्यासाठी आम्ही…’मृत गनबोटेंच्या पत्नीने शरद पवारांना सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव
12
दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांना इन्शुरन्स क्लेम मिळतो का? काय आहेत विमा नियम?
13
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! २६ एप्रिलपासून 'या' भागांत २४ तास पाणीपुरवठा राहणार बंद
14
मित्राकडून महागडं गिफ्ट घेतलं तर द्यावा लागू शकतो Tax! ९०% लोकांना Gift वरील टॅक्सचा नियमच माहीत नाही
15
मनिषाचा तो एक ईमेल ज्यामुळे डॉक्टर झाले व्यथित; 'त्या' मेलमध्ये दडलंय काय? झालं उघड
16
हृदयद्रावक! बुलेट चालवताना २० वर्षीय तरुणाला आला हार्ट अटॅक; वेदनेने तडफडत असतानाच...
17
'ज्याने माझ्या भावाला मारलं, मला त्याचं शीर हवंय', लेफ्टनंट विनय नरवालांच्या बहिणीचा मुख्यमंत्र्यांसमोर आक्रोश
18
कलमा म्हणजे काय? जो दहशवाद्यांसमोर पढल्याने पहलगाममध्ये वाचले एका हिंदू प्राध्यापकाचे प्राण
19
भरमैदानात हार्दिक पांड्यानं जयवर्धनेशी घातला वाद? दोघांमधील संभाषण कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडीओ
20
आत्महत्येपूर्वी डॉ. वळसंगकरांनी केला मृत्यूपत्रात बदल; २० टक्के हिस्सा कुणाला दिला?

सूर्यफूल लागवड ठरतेय उत्पन्नाचे नवे साधन

By admin | Updated: May 16, 2015 02:16 IST

सूर्यफुलाचे पीक हे खरीप, रबी व उन्हाळी अशा तीनही हंगामात घेता येते.

वर्धा : सूर्यफुलाचे पीक हे खरीप, रबी व उन्हाळी अशा तीनही हंगामात घेता येते. यामुळे दुष्काळ व नापिकीचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना हे पीक उत्पन्नाचे नवे साधन ठरत आहे. याला जोडधंदा म्हणून मधुमक्षिका पालन केल्यास मधविक्रीतून आर्थिक उत्पन्न मिळते. ही बाब हेरुन जिल्हातील काही भागात सूर्यफुलाची लागवड केली जात आहे.सूर्यफुलाच्या एकूण लागवडीपैकी ४० टक्के लागवड खरीप तर ६ टक्के लागवड रबी व उन्हाळी हंगामात केली जाते. सूर्यफुलाची बागायतीखाली लागवड केल्यास अधिक उत्पादन मिळते. सूर्यफुलाच्या तेलाचे आहारातील महत्त्व तसेच बाजारातील मागणी व मिळणाऱ्या किंमत पाहता सूर्यफूल पिकांखालील क्षेत्रात उत्पादकतेत वाढ करणे गरजेचे असल्याचे कृषितज्ज्ञ म्हणतात. सूर्यफूल हे पीक साधारणत: ८० ते १०० दिवसात येत असते. बहुविध दुबार पीक, क्रमिक पीक व आंतर पीक पद्धतीस योग्य व कमी पाण्यावर येणारे हे पीक आहे. पाण्याचा ताण सहन करीत कमी लागवड खर्च असतो. यामुळे सूर्यफुलाची लागवड करणे शेतकऱ्यांसाठी हिताचे ठरत आहे. बी-बियाण्यांची योग्य तपासणी करून लागवड केल्यास यासह प्रतिहेक्टरी रोपांची संख्या योग्य राखणे, हलक्या व कमी प्रतिच्या जमिनीत लागवड न करणे, वेळीच व योग्य प्रकारच्या कीड व रोगांचा प्रादुर्भाव नष्ट करणे, उन्हाळी सूर्यफुलास जमिनीच्या मुबलकतेनुसार पाणी देणे या बाबींची खबरदारी घेतल्यास चांगले उत्पन्न मिळते. शिवाय याला जोडधंदा म्हणून मधुमक्षिका पालन करता येणे शक्य आहे. सूर्यफुलात परागीकरणासाठी मधमाश्यांचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा असतो. यामुळे जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांनी या सूर्यफूल लागवडीचा प्रयोग केला असून यातून नवे उत्पन्नाचे साधन ठरत असल्याचे दिसत आहे.(स्थानिक प्रतिनिधी)