शहरं
Join us  
Trending Stories
1
"दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार"; बिहारमधून PM मोदींचा इशारा
2
फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; पहलगाम हल्ल्यातील पीडितांनी सांगितली आपबीती
3
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
4
काश्मीरमध्ये तणाव असतानाच छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांवर मोठी कारवाई, १००० नक्षल्यांना जवानांनी घेरले, ५ ठार  
5
पहलगाम दहशतवादी हल्लाः पाकिस्तानी उच्चायोगात मागवण्यात आला केक; बॉक्स पाहून एकच प्रश्न, हे 'सेलिब्रेशन' कसलं?
6
Elphinstone Bridge: तारीख निश्चित! एल्फिन्स्टन ब्रिज २५ एप्रिलपासून वाहतुकीसाठी बंद, मुंबईकरांची कोंडी होणार
7
डोळ्यात अश्रू, कपड्यांवर रक्ताचे डाग..! दहशतवादी हल्ल्यात डोळ्यादेखत वडिलांना गमावलेल्या लेकीनेच केले अंत्यसंस्कार
8
Pahalgam Terror Attack : "माझ्या शुभमला परत आणा, मी माझं दुःख कोणाला सांगू, त्याने कोणाचं काय नुकसान केलं होतं?"
9
या सरकारी बँकेनं सुरू केलं लोन कॅम्पेन; कमी व्याजदर आणि शून्य चार्जेसवर मिळणार कर्ज, अखेरची तारीख कधी?
10
पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर खेळाडूही संतापले! सचिन तेंडुलकर ते नीरज चोप्रा.. कोण काय म्हणाले?
11
मुलगी झाली हो..! ; अभिनेता चिराग पाटील दुसऱ्यांदा झाला बाबा, पोस्ट शेअर करत दिली खुशखबर
12
Pahalgam Attack Video: दहशतवाद्यांनी पर्यटकांची अशी केली हत्या; गोळ्या झाडतानाचा व्हिडीओ समोर
13
Indus Waters Treaty: ६५ वर्षे जुना सिंधू पाणी करार काय आहे? पाकिस्तानवर किती परिणाम होईल?; वाचा सविस्तर
14
"मला पहलगाम दहशतवादी हल्ल्याबद्दल आधीच माहित होतं"; 'त्या' व्यक्तीचा पोलिसांना फोन अन्...
15
मोठा खुलासा! लेफ्टनंट विनयने दोन दहशतवाद्यांना पकडलेले; नौदलाचा अधिकारी धारातीर्थी पडला
16
"तुला ठार मारू’’, भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक गौतम गंभीरला दहशतवादी संघटनेकडून धमकी
17
‘जीव वाचवण्यासाठी आम्ही…’मृत गनबोटेंच्या पत्नीने शरद पवारांना सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव
18
दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांना इन्शुरन्स क्लेम मिळतो का? काय आहेत विमा नियम?
19
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! २६ एप्रिलपासून 'या' भागांत २४ तास पाणीपुरवठा राहणार बंद
20
मित्राकडून महागडं गिफ्ट घेतलं तर द्यावा लागू शकतो Tax! ९०% लोकांना Gift वरील टॅक्सचा नियमच माहीत नाही

कृषी योजनांचा लाभ घेऊन शेतातील उत्पन्न दुप्पट करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2018 00:36 IST

विद्यमान केंद्र व राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी विविध योजना कार्यान्वित केल्या आहेत. या योजनांचा लाभ घेऊन शेतकऱ्यांनी आपल्या शेतीतील उत्पादन दुप्पट करून आर्थिक उन्नती साधावी, असे आवाहन आ. डॉ. देवराव होळी यांनी केले.

ठळक मुद्देआमदारांचे आवाहन : गिलगाव येथे शेतकरी दिन उत्साहात

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : विद्यमान केंद्र व राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी विविध योजना कार्यान्वित केल्या आहेत. या योजनांचा लाभ घेऊन शेतकऱ्यांनी आपल्या शेतीतील उत्पादन दुप्पट करून आर्थिक उन्नती साधावी, असे आवाहन आ. डॉ. देवराव होळी यांनी केले.राज्य शासनाच्या निर्देशानुसार कै. विठ्ठलराव विखे पाटील यांचा जन्मदिन शेतकरी दिवस म्हणून शुक्रवारी गिलगाव येथे साजरा करण्यात आला. जिल्हास्तरीय या कार्यक्रमात ते अध्यक्षस्थानाहून बोलत होते. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून गिलगावचे सरपंच किरण कोवासे, उपसरपंच पिंपळशेंडे, आत्माचे प्रकल्प संचालक डॉ. प्रकाश पवार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अनंत पोटे, उपविभागीय कृषी अधिकारी प्रीती हिरळकर, तालुका कृषी अधिकारी वीरेंद्र राजपूत, चंद्रकांत ठाकरे, कृषी पर्यवेक्षक चव्हाण, मेश्राम, कृषी सहायक भैसारे, तरंग शेतकरी उत्पादक कंपनीचे कैलास घोगरे, सचिन सातपुते, सतीश पुरकमवार यांच्यासह गिलगाव परिसरातील शेतकरी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.याप्रसंगी आत्माचे प्रकल्प संचालक डॉ. प्रकाश पवार यांनी अनुषंगिक योजनांची कारण मिमांसा केली. उत्पादन खर्च कमी करण्यासाठी स्थानिक निविष्ठा तयार करून सेंद्रीय शेती तंत्रज्ञान अवलंबिण्याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांप्रमाणे गडचिरोलीतील शेतकऱ्यांनी कष्टाळूवृत्तीने व तंत्रज्ञानाचा वापर करून शेती करावी, असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अनंत पोटे यांनी सांगितले. सदर कार्यक्रमात भात पिकांचे किड व रोग संरक्षण, शेतीतील महिलांचा सहभाग याविषयी उपविभागीय कृषी अधिकारी हिरळकर यांनी मार्गदर्शन केले. याप्रसंगी शेतकऱ्यांना खोडकिडीच्या नियंत्रणासाठी आ. डॉ. देवराव होळी यांच्या हस्ते कामगंध सापळ्यांचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी परिसरातील शेतकऱ्यांच्या शंकांचे निरसन करण्यात आले.संचालन हेमंत उंदीरवाडे यांनी केले. कार्यक्रमाला गिलगाव, नवरगाव, थाटरी व कोतेगाव परिसरातील ३०० शेतकरी उपस्थित होते.पूरग्रस्तांसाठी १० हजारांची मदतभेंडाळा येथील तरंग शेतकरी उत्पादक कंपनीमार्फत केरळमधील पूरग्रस्तांसाठी १० हजार रूपयांची मदत करण्यात आली. सदर दहा हजार रूपयांचा धनादेश आ. डॉ. देवराव होळी यांच्या मार्फत उपविभागीय कृषी अधिकारी हिरळकर यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. भेंडाळा, फोकुर्डी, दोटकुली येथील युवक शेतकऱ्यांनी एकत्र येऊन तरंग शेतकरी उत्पादक कंपनी नुकतीच स्थापन केली. सामाजिक बांधिलकीची जाण ठेवून या शेतकरी कंपनीतर्फे १० हजार रूपयांची मदत केरळमधील पूरग्रस्तांसाठी जिल्हा प्रशासनाकडे जमा करण्यात आली.

टॅग्स :agricultureशेतीDevrao Holiदेवराव होळी