शहरं
Join us  
Trending Stories
1
हवाई दल प्रमुखपदी एअर मार्शल अमरप्रीत सिंग यांची नियुक्ती; जाणून घ्या, त्यांच्याविषयी...
2
"या तीन घराण्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये दहशत पसरवली" अमित शाहांचा विरोधकांवर हल्लाबोल
3
तिरुमला तिरुपती लाडू वाद: प्रकाश राज यांचा DCM पवन कल्याण यांना मोलाचा सल्ला; म्हणाले...
4
लेडीज टॉयलेटमध्ये कॅमेरा लावला; मुलीने रंगेहाथ पकडला, विद्यार्थ्याला अटक, अनेक व्हिडीओ सापडले
5
ऐश्वर्या-करीश्मादेखील वाचवू शकले नाहीत सुपरस्टारच्या मुलाचं करिअर, आता इंडस्ट्रीतून आहे गायब
6
मोठी बातमी: विधानसभेसाठी वंचितचा धमाका; ११ उमेदवारांची पहिली यादी जाहीर
7
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; विहिरी, शेततळे, वीज जोडणीसाठीच्या अनुदानात वाढ
8
TV वर खूप नाव कमावलं पण मोठ्या पडद्यावर चालली नाही जादू; प्रसिद्ध अभिनेत्याला ओळखलं का?
9
जरांगेंच्या तालावर मुख्यमंत्री नाचतात; ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंची बोचरी टीका
10
IND vs BAN : डोळ्याची पापणी लवण्याच्या आत खेळ खल्लास! यशस्वीनं घेतलेला भन्नाट कॅच बघाच (VIDEO)
11
"काशीचा प्रसाद मिळाला, तेव्हा माझ्या मनात तिरुपतीचा विचार आला", लाडू वादावर माजी राष्ट्रपतींनी व्यक्त केली चिंता
12
IND vs BAN : Rishabh Pant चे झंझावाती शतक! गर्लफ्रेंड ईशाने मानले आभार, म्हणाली...
13
"गोली का जवाब गोले से...!"; गृह मंत्री अमित शाह यांची कश्मिरात गर्जना; विरोधकांवरही निशाणा
14
काय सांगता! ६०० ब्राह्मण करतात तिरुपतीचा प्रसाद; १ लाख लाडू रामलला चरणी केले होते अर्पण
15
LLC 2024 : इरफान पठाणची जादू अन् विजयी सलामी; जुन्या आठवणींना उजाळा, भज्जीचा संघ हरला
16
BSNL नं जिओ, एअरटेल, Vi ला दिला 'जोर का झटका'; एकाच महिन्यात वाढले लाखो ग्राहक
17
'खोसला का घोसला'मधील लोकप्रिय अभिनेत्याचा भीषण अपघात, ICU त उपचार सुरु
18
Leela Palace IPO: पैशांची व्यवस्था करून ठेवा! आता दिग्गज हॉटेल ब्रँडचाही येणार IPO; पाहा डिटेल्स
19
हिज्बुल्लाहची झोप उडवणाऱ्या कंपनीची CEO असणारी ही फिल्मी महिला आहे तरी कोण? 
20
तिरुपती बालाजींवर कुबेराचे ऋण; आजही भाविक फेडतात कर्ज! वाचा, लाडू प्रसादम अद्भूत गोष्टी

वाढत्या काँक्रिटीकरणामुळे तापमानाचा तडाखा

By admin | Published: March 23, 2016 2:06 AM

खेडे ओस होत असून शहरी भाग झपाट्याने वाढत आहेत. या सोबतच शहरात काँक्रिटीकरणही वाढत आहे. या काँक्रिटीकरणामुळे

श्रेया केने ल्ल वर्धाखेडे ओस होत असून शहरी भाग झपाट्याने वाढत आहेत. या सोबतच शहरात काँक्रिटीकरणही वाढत आहे. या काँक्रिटीकरणामुळे वातावरणातील उष्णताशोषक घटकांचा ऱ्हास होत असल्याचे दिसून आले आहे. उष्णताशोषक घटकांच्या झालेल्या ऱ्हासामुळेच तापमानात वाढ होत असल्याची बाब निरीक्षणातून वैज्ञानिकांच्या निदर्शनात आली आहे. यातून बचावाकरिता नागरिकांत जागृती निर्माण करण्याकरिता शासनस्तरावर प्रयत्न होणे गरजेचे आहे. हवामान बदलाच्या संदर्भात भारतीय वेधशाळेकडून निरीक्षण नोंदविले जातात. यात निसर्गातील वाढता मानवी हस्तक्षेप हवामान बदलास कारणीभूत ठरत असल्याचे समोर आले आहे. वाढत्या शहरीकरणासह काँक्रिटीकरण झपाट्याने होत आहे. पूर्वी कच्चे रस्ते असायचे. आता झगमगटाच्या नावाखाली शहरातच नव्हे तर ग्रामीण भागातूनही कच्चे रस्ते हद्दपार झाले आहे. सर्रास सिमेंट रस्त्याचे बांधकाम केले जात आहे. शिवाय घरबांधकामातही सिमेंट, काँक्रिटचा वापर होत आहे. शहरीकरणाच्या प्रक्रियेत तर मोठ्या इमारती निर्माण होत काँक्रिटचे जंगल तयार होवू लागले आहे. या काँक्रिटीकरणाकरिता झाडांची कत्तल होत असून हिरव्या जंगलाऐवजी सिमेंटचे जंगल वाढत आहे. यामुळे उष्णताशोषक घटकांच्या संख्येत घट झाली आहे. प्रखर सूर्यकिरणांना शोषून वातावरण शीत राखण्यास मदत करणारे घटक कमी होवून उष्णता परावर्तीत करणाऱ्या घटकांमध्ये वाढ होवू लागली आहे. बदलत्या जीवन शैलीसह वापरात येणाऱ्या विविध साधनांमुळे उष्णतामान वाढविणाऱ्या घटकांत भरच पडत आहे. यासह दळणवळणाची साधने, त्यातून होणारे प्रदूषण, तापमान वाढीस कारणीभूत ठरत आहे.जिल्ह्यातील वनसंपदा, वनक्षेत्र कायम असले तरीही मानवी वस्तीचा विस्तार होताना त्या परिसरातील झाडांची कत्तल होत आहे. याला पर्याय म्हणून वृक्षारोपण होत असले तरीही त्याची गती मंद आहे. तुलनेने झाडांची संख्या झपाट्याने कमी होत आहे. याचा थेट परिणाम हवामान बदलाच्या स्वरूपात मानवाला भोगावा लागत असून फेब्रुवारी महिन्यातच पारा ३५ अंशापुढे गेला आहे. याविषयी जागरूकता बाळगण्याची गरज असल्याचे मत वैज्ञानिकांनी नोंदविले आहे.४हवामान बदलामुळे मानवासह प्राणिमात्रांना अनेक गंभीर स्वरूपाच्या समस्यांचा सामना करावा लागत आहे. यातील एक म्हणजे ऋतूबद्दल उन्हाळ्यात वाढलेला कालावधी. या सर्व परिणामांपासून निसर्गाचे रक्षण करण्याकरिता जागतिक स्तरावर प्रयत्न होत असून जागरूकता निर्माण करण्यासाठी २३ मार्च हा हवामान दिन म्हणून साजरा केला आहे. शासनस्तरावर हा दिन साजरा करण्याची प्रक्रिया पूर्ण केली जात असून याशिवाय प्रत्यक्षात कृती करण्याची गरज वैज्ञानिकांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली आहे.वाढते काँक्रिटीकरण उष्णता वाढीस कारणीभूत ठरत असल्याचे निदर्शनात आले आहे. मानवी वस्ती व परिसरातून उष्णता शोषक घटक बाद होत असून तापमान वाढीस हे घटक जबाबदार आहेत. एकाएकी तापमान वाढल्याने समुद्राच्या पाण्याच्या बाष्पीभवनाची प्रक्रिया अधिक गतिमान होते. परिणामी वातावरणातील आर्द्रतेचे प्रमाण वाढून पाऊस पडतो. वेळीअवेळी होणाऱ्या पावसाचे हे देखील मुख्य कारण आहे.- बी. एस. आवळे, सहायक वैज्ञानिक, भारतीय वेधशाळा, नागपूर विभाग, जि. नागपूर.