शहरं
Join us  
Trending Stories
1
घराणेशाहीतून येणाऱ्यांना मतदान करू नका, एका मिनिटात सरळ होतील- नितीन गडकरी
2
टँकर अचानक खड्ड्यात! सुदैवानं चालक बचावला, पुण्यातील 'त्या' घटनेमागचं कारण आलं समोर
3
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: महाविकास आघाडीचं ठरलं, 130 जागांवर एकमत झालं! अस होणार जागावाटप?
4
मुंबईपासून दुरावलेल्या लाखो लोकांना हक्काचे घर देऊन पुन्हा मुंबईत आणू- श्रीकांत शिंदे
5
लाचखोर वनरक्षक अडकला एसीबीच्या जाळ्यात; पाच हजार रूपयांची लाच भोवली!
6
हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर लेबनॉनमध्ये इस्रायलचा कहर, बेरूत हल्ल्यात 8 जणांसह टॉप कमांडरचा खात्मा; 59 जखमी
7
उल्हासनगर महापालिका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे उपोषण मागे, सोमवारी होणार चर्चा
8
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
9
रिक्षात गॅस भरण्यासाठी पैसे मागितल्याने डोक्यात लोखंडी रॉडने हल्ला; दारूच्या नशेत कृत्य
10
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
11
BSF ची मिजोरममध्ये मोठी कारवाई; भारत-बांगलादेश सीमेवर 40 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त
12
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
13
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
14
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
15
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
16
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
17
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
18
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
19
९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई
20
पुरी जोधपूर एक्सप्रेसमधून पाच लाखांचा सुमारे ३३ किलो गांजा जप्त; अल्पवयीन आरोपी जेरबंद

शेतकऱ्यांसाठी काय केले ते केंद्र सरकारने सांगावे

By ऑनलाइन लोकमत | Published: August 01, 2024 5:32 PM

Vardha : खासदार काळे यांनी उपस्थित केला संसदेत प्रश्न

लोकमत न्यूज नेटवर्कआर्वी : शेतकऱ्यांप्रती केंद्र सरकारचे मोठ्या प्रमाणात उदासीन धोरण आहे. आजही विदर्भात आत्महत्या होत आहेत. याला कारणीभूत कोण? २०१४ मध्ये यवतमाळ येथे शेतकऱ्यांना आश्वासन दिले होते. दाभाडी येथे 'चाय पे चर्चा' करून शेतकऱ्यांना हमी भाव, स्वामीनाथन आयोग लागू करू, असे विविध आश्वासने दिली होती. मात्र, एकही आश्वासन पूर्ण केले नाही. केंद्र सरकारने पुन्हा दाभाडी येथे 'चाय पे चर्चा' कार्यक्रम घेत शेतकऱ्यांसाठी अकरा वर्षांत काय केले हे सांगावे? असा प्रश्न खासदार अमर काळे यांनी संसदेत उपस्थित केला.

कापसाला सात हजार रुपये भाव आहे, तर साडेचार हजार रुपये क्विंटल सोयाबीन विकले जात आहे. केंद्र सरकारने आश्वासन पाळले असते, तर शेतकऱ्यांच्या कापसाला १५ हजार रुपये प्रतिक्विंटल भाव असता. पिकाला भाव मिळाला असता तर शेतकऱ्यांचे अर्धे प्रश्न असेच सुटले असते. मात्र, प्रश्न सुटत नसल्याने विदर्भात शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण वाढतीवर आहे. याकडे मोठ्या प्रमाणात केंद्र शासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप त्यांनी केला.

विदर्भातील अमरावती, नागपूर आणि इतर पट्टयातून मोठ्या प्रमाणात बांगलादेश येथे सव्वा लाख मेट्रिक टन संत्रा जात होता. मात्र, या संत्र्यावर या पाच वर्षात १०१ टक्के ड्युटी लावल्याने शेतकऱ्यांच्या मोठ्या अडचणी वाढल्या आहेत. संत्र्याला भाव नाही, याकडे संसदेने लक्ष द्यावे, अशी मागणी खासदार अमर काळे यांनी केली आहे. यासोबतच संसद अधिवेशनात शेतकरी आत्महत्या, मोर्शी, वरुड येथील संत्रा उत्पादक यांच्या समस्या, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, आरोग्य सेवेत पार्ट टाइम सेविकांच्या मानधनात वाढ, घरकुल योजनेत मिळणाऱ्या रकमेत वाढ करावी, असे विविध प्रश्न मांडून सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.

'चाय पे चर्चा' करण्यासाठी आवाहनशेतकऱ्यांच्या हिताच्या गोष्टी करणाऱ्यां केंद्र सरकारला आश्वासनांचा विसर पडला आहे. यवतमाळ दौऱ्यांचा उल्लेख करीत गत ११ वर्षात शेतकयांसाठी काय केले, यावर चर्चा करण्यासाठी केंद्र सरकारने पुन्हा 'चाय पे चर्चा' करण्याचे थेट आवाहन खासदार काळे यांनी केले.

टॅग्स :Amar Kaleअमर काळेcongressकाँग्रेसwardha-acवर्धा