शहरं
Join us  
Trending Stories
1
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
2
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
3
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
4
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
5
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
6
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
7
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
8
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
9
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
10
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
11
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
12
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
13
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
14
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
15
टी२० क्रिकेटमध्ये ऋषभ पंत अपयशी का ठरतोय? चेतेश्वर पुजाराने सांगितलं त्यामागचं कारण!
16
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
17
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
18
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
19
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
20
शिमला कराराने सुटलेले भारत-पाकिस्तानमधील वाद; आता पाक देतोय रद्द करण्याची धमकी...

पुनर्वसनाचा प्रश्न खितपत; दिंदोडा प्रकल्पग्रस्तांचे परिवारासह धरणे-आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2023 10:54 IST

तीन जिल्ह्यातील शेतकरी बाधित

पोहणा (वर्धा) :वर्धा जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या दिंदोडा बॅरेज प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न अनेक दिवसांपासून खितपत पडून आहे. प्रकल्पग्रस्तांचे भूमी अधिग्रहण कायद्यानुसार भूसंपादन व सावंगी गावाचे पुनर्वसन करण्यात यावे, या मागणीसाठी प्रकल्पग्रस्तांनी परिवारासह वर्धा नदीवरील दिंदोडा प्रकल्पस्थळी धरणे-आंदोलन सुरू केले आहे.

वर्धा, चंद्रपूर व यवतमाळ जिल्ह्याच्या सीमेवरील वर्धा नदीवर सन २०१७ पासून दिंदोडा बॅरेज प्रकल्प साकार होत आहे. या तिन्ही जिल्ह्यातील अनेक गावे प्रकल्पबाधित झाली आहेत. वर्धा जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावरील सावंगी (जोड) गावासह इतरही गावे या प्रकल्पामुळे बाधित झाली आहेत. सावंगी गावापासून काही अंतरावरच या सिंचन प्रकल्पाच्या कामाला सुरुवात झाली आहे. तेव्हापासून प्रकल्पग्रस्तांच्या विविध मागण्या प्रलंबित असल्याने त्यांनी अनेकदा आंदोलन करून शासन, प्रशासनाचे लक्ष वेधले. तरीही शासनाने गांभीर्याने घेतले नसल्याने आता प्रकल्पग्रस्तांनी प्रकल्पस्थळी मुलाबाळांसह आंदोलनाला सुरुवात केली आहे. जोपर्यंत मागण्या मान्य होणार नाही, तोपर्यंत हटणार नाही, असा निर्धार आंदोलकांनी केला आहे.

प्रकल्पग्रस्तांमध्ये खदखदतोय संताप

दिंदोडा प्रकल्पबाधित गावांचे २०१३-१४ च्या भूसंपादन कायद्यानुसार पुनर्वसन करण्यात यावे, प्रकल्पग्रस्तांना एकरी २० लाख रुपये सानुग्रह अनुदान देण्यात यावे. तसेच कुटुंबातील एका व्यक्तीला शासकीय नोकरी देण्यात यावी. या प्रमुख मागण्यांसाठी प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीने यापूर्वी बैलबंडी मोर्चा, नदीवर दिवे समर्पण, मानवी साखळी, अधिकाऱ्यांना घेराव, कामबंद आंदोलन अशा प्रकारची अनेक आंदोलने केलीत. परंतु शेतकऱ्यांना वाढीव मोबदला मिळाला तर नाहीच आणि पुनर्वसनही झाले नाही. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांमध्ये संताप खदखदत आहे.

टॅग्स :localलोकलagitationआंदोलनwardha-acवर्धा