शहरं
Join us  
Trending Stories
1
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
2
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
3
काय आहे शिमला करार? पाकिस्तान देतोय रद्द करण्याची धमकी; सोप्या भाषेत समजून घ्या...
4
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
5
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
6
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
7
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
8
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
9
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
10
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
11
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
12
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
13
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
14
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
15
टी२० क्रिकेटमध्ये ऋषभ पंत अपयशी का ठरतोय? चेतेश्वर पुजाराने सांगितलं त्यामागचं कारण!
16
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
17
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
18
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
19
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
20
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'

येळाकेळीतून बेपत्ता झालेल्या विवाहितेला विकण्याचा ‘प्लॅन’ पोलिसांनी उधळला

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2023 11:47 IST

सेलू पोलिसांची यशस्वी कारवाई : बिहार राज्यातील पिरापुरा मथुरातून घेतले ताब्यात

वर्धा : विवाहित महिलेला आमिष दाखवून पळवून नेत नेपाळ येथे विकण्याचा प्लॅन सेलू पोलिसांनी उधळून लावला असून महिलेला बिहार राज्यातील पिरापुरा जिल्ह्यातील मथुरा गावातून सुरक्षितरित्या ताब्यात घेत कुटुंबीयांच्या स्वाधीन केले. प्राप्त माहितीनुसार, येळाकेळी येथील रहिवासी २१ वर्षीय विवाहितेला अज्ञाताने फूस लावून पळवून नेले होते. याबाबतची तक्रार तिच्या पतीने १५ ऑगस्ट रोजी सेलू पोलिस ठाण्यात दाखल केली होती. त्या अनुषंगाने पोलिसांच्या पथकाने महिलेच्या शोधार्थ तपास सुरू केला. मात्र, महिलेचा थांगपत्ता लागत नव्हता. मात्र, तांत्रिक तपासाच्या मदतीने महिला बिहार राज्यात असल्याची माहिती मिळाली आणि तेथून तिला विकण्याचा प्लॅन असल्याचे पोलिसांना समजले.

महिलेने जाण्यापूर्वी तिच्या फेसबुक मॅसेंजरवर मेसेज पाठविला होता यावरून पोलिसांनी तपासाला दिशा दिली असता तांत्रिक तपासाच्या मदतीने तिचा ठावठिकाणा कुठे आहे ते समजले.

पोलिस निरीक्षक तिरुपती राणे यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक धनंजय पांडे, अखिलेश गव्हाणे, सचिन वाटखेडे, रुख्साना शेख यांचे पथक बिहार राज्यासाठी रवाना झाले. महिलेचे लोकेशन बिहार राज्यातील वैशाली जिल्ह्यातील पिरापुर मथुरा गावात दिसून आले. मात्र, ते गाव अतिशय दुर्गम भागात असल्याने आणि संवेदशील असल्याने महिलेपर्यंत पोहोचण्यासाठी मोठे आव्हान त्यांच्यापुढे उभे होते. मात्र, पोलिसांनी अथक परिश्रम घेत विविध संकटांना सामोरे जात बेपत्ता महिलेस ताब्यात घेत सुरक्षितरित्या सेलू पोलिस ठाण्यात आणून तिच्या कुटुंबीयांच्या स्वाधीन केले.

सतत दोन महिने तपास अन् मिळाले यश..

ऑगस्ट महिन्यात येळाकेळी येथून बेपत्ता झालेल्या महिलेस शोधण्यासाठी सेलू पोलिसांची चमू विविध जिल्ह्यात रवाना झाली होती. मात्र, महिलेचा थांगपत्ता लागत नव्हता. अखेर तांत्रिक तपासाच्या माध्यमातून महिलेचा सुगावा लागला. दोन महिन्यानंतर महिलेस बिहार राज्यातून ताब्यात घेतले अन् पोलिसांनी सुटकेचा श्वास सोडला.

‘त्या’ गावात इतर राज्यातील महिलांचाही उपस्थिती

प्राप्त माहितीनुसार, ज्या गावात बेपत्ता महिला मिळून आली त्या गावापासून नेपाळ बॉर्डर अतिशय जवळ असल्याने त्या गावातून अशा महिलांना विकण्याचे काम होणार होते. गावात विविध राज्यातील महिला व मुलींची देखील उपस्थिती होती. अशातच सेलू पोलिसांच्या पथकाने गाव गाठून क्षणाचाही विलंब न करता महिलेला ताब्यात घेतले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीKidnappingअपहरणwardha-acवर्धाBiharबिहार