शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद गंभीर धोका; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावरुन पीएम नरेंद्र मोदींनी दिला इशारा
2
"शाळेचे संचालक अजूनही का सापडलेले नाहीत?", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर आदित्य ठाकरेंचा सवाल
3
"जगन मोहन रेड्डींचे मन शुद्ध असेल तर...", तिरुपती लाडू वादावरून पवण कल्याण यांचा निशाणा
4
Devendra Fadnavis on Badlapur Case Akshay Shinde Encounter: "पोलिसांवर गोळ्या चालवल्या तर..."; देवेंद्र फडणवीसांचे अक्षय शिंदे एन्काऊंटरवर रोखठोक मत
5
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी व्हावी, नातलगांची मागणी 
6
बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदे एन्काऊंटरवर नाना पटोले यांचे सरकारला ३ महत्त्वाचे प्रश्न
7
Sharad Pawar on Akshay Shinde Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरवर शरद पवारांचे ट्विट, काय म्हणाले?
8
"प्रकरण दडपण्यासाठी हे एन्काऊंटरचे फेक नॅरेटिव्ह", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर अनिल देशमुखांचा आरोप
9
"पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न आहे का?", बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार, विजय वडेट्टीवारांचा सवाल
10
CM Eknath Shinde on Akshay Shinde Encounter: "ज्याने माणुसकीला काळीमा फासला..."; CM एकनाथ शिंदे अक्षयच्या एन्काऊंटरवर स्पष्टच बोलले
11
अक्षय शिंदे आणि पोलिसांची चकमक ठाण्यात नेमकी कुठे झाली? Inside Story
12
Badlapur Case Accused Akshay Shinde, Police Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: आरोपी अक्षय शिंदे पोलीस चकमकीत ठार! पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी केला गोळीबार
13
बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार! उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
14
अनिल अंबानी यांच्या मुलावर SEBI ची कारवाई; 'या' प्रकरणात ठोठावला कोट्यवधीचा दंड
15
"माझ्या पोराला पैसे देऊन मारून टाकलं", अक्षय शिंदेच्या आईचे गंभीर आरोप, दुपारीच घेतली होती भेट
16
भारतात मंकीपॉक्सचा रुग्ण आढळला, क्लेड १ बी व्हायरसची लागण, आरोग्य यंत्रणा सतर्क
17
'या' दिवसापासून भाजप राबवणार मेगा सदस्यत्व अभियान, एक कोटी लोकांना जोडण्याचे लक्ष्य
18
रोहित पवारांना राम शिंदेंचा धक्का! कर्जत-जामखेडमधील दोन नेते भाजपात
19
Video: बापरे! अजगराचा महिलेला विळखा, दोन तास मृत्यूशी झुंज, श्वास घेणेही कठीण; अखेर...
20
"लहान आणि मोठे हुड्डा यांच्यात लढाई सुरू आहे...", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल, कुमारी सैलजा यांच्यावरही निशाणा

७५ लाख खर्चूनही पाण्याचा थेंब नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2018 11:53 PM

बाकळी नदीवर ७५ लाख रुपये खर्च करून जलसंधारण विभागाने बंधाऱ्याचे बांधकाम केले; पण नियोजनाचा अभाव असल्याने या बंधााऱ्यात थेंबभरही पाणी दिसत नाही. यामुळे शासनाच्या निधीचा अपव्यय झाल्याचेच दिसून येत आहे.

अमोल सोटे।लोकमत न्यूज नेटवर्कआष्टी (श.) : बाकळी नदीवर ७५ लाख रुपये खर्च करून जलसंधारण विभागाने बंधाऱ्याचे बांधकाम केले; पण नियोजनाचा अभाव असल्याने या बंधााऱ्यात थेंबभरही पाणी दिसत नाही. यामुळे शासनाच्या निधीचा अपव्यय झाल्याचेच दिसून येत आहे.आष्टी शहरातील मुलभूत सुविधा व स्मारकासाठी अर्थमंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पाच कोटी रुपयांचा निधी दिला होता. यातून तीन कोटींच्या आराखड्यात बाकळी नदीवरील पुलाचा समावेश होता. उर्वरित निधी रस्ते, नाल्याची संरक्षण भिंत, टेकडीवरील इदगाह फ्लोरिंग, स्मशानभूमीचे बांधकाम यावर खर्च करण्यात आले. बाकळी नदीवर बांधलेला बंधारा वजा पुलासाठी ७५ लाख रुपये खर्च केले. यातील ४० लाख खोदकामावर खर्च करून प्रचंड उधळपट्टी करण्यात आली. पुलाचे बांधकाम अत्यंत निकृष्ट दर्जाचे करण्यात आले. कॉक्रीटचा वरील भाग आतापासूनच उखडत चालला आहे.गणेशतीर्थावर जाण्यासाठी असलेला रस्ता बूजविला असून उर्वरित रस्त्यावर काही शेतकऱ्यांनी अतिक्रमण केले आहे. नगरपंचायत हद्दीत असलेली विद्युत लाईनचे नुकसान करण्यात आले आहे. या कामामुळे पाईपलाईन अनेक ठिकाणी फुटली आहे. यामुळे आष्टीत दूषित पाण्याचा पुरवठा होत आहे. केवळ देखावा निर्माण करून निधीची अफरातफर जलसंधारण विभागाकडून केली जात असल्याचे दिसते.संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देत पाहणी करावी. बंधाऱ्याच्या बांधकामाची सखोल चौकशी करावी. तथा शासनाच्या निधीचा अपव्यय केल्या प्रकरणी संबंधितांवर कार्यवाही करावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.बंधारा वजा पुलाची डागडुजी विहित मुदतीत करावी. तोपर्यंत सुरक्षा ठेव रक्कम अदा करू नये. नगराध्यक्ष व मुख्याधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देत कंत्राटदारावर कारवाईचा ठराव घ्यावा. जलसंधारण विभागाच्या अधिकाऱ्यांनी संयुक्त भेट देऊन पाहणी करावी. ग्रामस्थांना असलेल्या सर्व समस्या मार्गी लावाव्यात, अन्यथा उपोषण करू असा इशारा नगरसेवक लेकुरवाळे यांनी तक्रारीतून दिला आहे.

टॅग्स :Waterपाणी