शहरं
Join us  
Trending Stories
1
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चाैकशी करा; वडिलांची मागणी, दुपारी घेतली कारागृहात भेट
2
१६५ लीटरचा फ्रीज, जमिनीवर रक्ताचे डाग, मृतदेहाचे तुकडे; बंगळुरूत पोलीस हादरले
3
युद्ध पेटलं! लेबनानमध्ये ४९२ लोकांचा मृत्यू; हिजबुल्लाहवर इस्त्रायलचा पलटवार
4
बदलापूरनंतर युपीमध्येही गुन्हेगाराचा एन्काऊंटर; ट्रेनमधून कॉन्स्टेबलला फेकणारा गुन्हेगार ठार
5
अग्रलेख : श्रीलंका डाव्या वळणावर! भारताला राहावे लागणार अधिक सावध
6
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: व्यापार - व्यवसायात वृद्धी होऊन मोठा फायदा होईल; धनलाभाची शक्यता
7
घोसाळकर हत्येप्रकरणी सीबीआयकडून गुन्हा; न्यायालयाच्या आदेशानंतर कारवाई
8
सिनेटमध्ये कोण बसणार? युवासेना -अभाविपमध्ये थेट लढत, उत्सुकता शिगेला
9
मुंबई, ठाण्याचा राज ठाकरेंकडून आढावा; संभाव्य उमेदवारांबाबत पदाधिकाऱ्यांशी चर्चा
10
उद्धव ठाकरे, राऊतांना काेर्टाचा दणका
11
‘एसटी’च्या ३९ जमिनी ६० वर्षांच्या लीजवर देणार; ३० वर्षांसाठी प्रतिसाद न मिळाल्याने निर्णय
12
सिडकोची गोड बातमी : दसऱ्याआधी निवडा तुमच्या आवडीचे घर
13
दहशतवाद गंभीर धोका; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावरुन पीएम नरेंद्र मोदींनी दिला इशारा
14
"शाळेचे संचालक अजूनही का सापडलेले नाहीत?", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर आदित्य ठाकरेंचा सवाल
15
"जगन मोहन रेड्डींचे मन शुद्ध असेल तर...", तिरुपती लाडू वादावरून पवण कल्याण यांचा निशाणा
16
Devendra Fadnavis on Badlapur Case Akshay Shinde Encounter: "पोलिसांवर गोळ्या चालवल्या तर..."; देवेंद्र फडणवीसांचे अक्षय शिंदे एन्काऊंटरवर रोखठोक मत
17
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी व्हावी, नातलगांची मागणी 
18
प्रकल्पग्रस्तांनी बांधलेली ‘ती’ घरे होणार नियमित; नवी मुंबई, पनवेल, उरणमध्ये सर्वेक्षण
19
बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदे एन्काऊंटरवर नाना पटोले यांचे सरकारला ३ महत्त्वाचे प्रश्न
20
"प्रकरण दडपण्यासाठी हे एन्काऊंटरचे फेक नॅरेटिव्ह", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर अनिल देशमुखांचा आरोप

‘त्या’ ५२ गावांचा उत्साह वाढवून श्रमदानही करणार

By admin | Published: April 25, 2017 12:57 AM

पाणी फाऊंडेशन अंगर्तत असलेल्या स्पर्धेत आर्वी तालुक्यातील ५२ गावे सक्रिय सहभागी झाली आहे.

विविध संघटनांचा निर्धार : गावे पाणीदार करण्याच्या उपक्रमाला नवे बळवर्धा : पाणी फाऊंडेशन अंगर्तत असलेल्या स्पर्धेत आर्वी तालुक्यातील ५२ गावे सक्रिय सहभागी झाली आहे. या गावांतील नागरिकांना प्रोत्साहन देऊन त्यांच्यासोबत श्रमदान करण्याचा निर्धार वर्धेतील विविध सामाजिक संघटनांनी सोमवारी येथे केला. आर्वी तालुक्यातील ७३ पैकी ५२ गावे पाणी फांऊडेशन अंतर्गत जलसंवर्धन स्पर्धेत सहभागी झालेली आहे. येथे गावकरी श्रमदान करीत आहे. या नागरिकांना श्रमदानदानातून सहकार्य करतानाच त्यांचे प्रोत्साहन वाढविण्याच्या अनुषंगाने आज सायंकाळी येथील शासकीय विश्राम गृहात विविध सामाजिक संघटनांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीला विविध संघटनांचे प्रतिनिधी आवर्जून उपस्थित होते. यावेळी सत्यमेव जयते वॉटर कप -२ मध्ये आर्वी तालुक्यातील ५२ गावांमध्ये जलसंधारणासाठी गावकऱ्यांच्या श्रमदानातून झालेल्या कामांचा लेखाजोखाच मांडण्यात आला. या गावांना आर्थिक मदतीची गरज नसल्याचेही यावेळी स्पष्ट करण्यात आले. मात्र ही गावे पाणीदार होण्यासाठी गावकरी करीत असलेल्या श्रमदानाला आणखी गती यावी, या गावांचा जलसंधारणाच्या दृष्टीने कायापालट व्हावा, यासाठी या गावकऱ्यांना प्रोत्साहन देण्याची गरज आहे. जिल्ह्यात उष्णतेची लाट असताना ही मंडळी केवळ आपल्या गावात पावसाचे पाणी वर्षभर टिकून रहावे, यासाठी दिवसरात्र एक करीत आहे. त्यांच्या श्रमाचे कुठेतरी कौतुक व्हावे, त्यांच्यासोबत श्रमदान करून त्यांना प्रोत्साहित करण्याची भूमिका आर्वीचे उपविभागीय अधिकारी शर्मा, वैद्यकीय जनजागृती मंचचे डॉ. सचिन पावडे, डॉ. अरुण पावडे, तहसीलदार विजय पवार, पाणी फाऊंडेशनचे मंदार देशपांडे यांनी मांडली. यावेळी उपस्थित सर्व संघटनांच्या प्रतिनिधींनी गावात जावून श्रमदान करण्याचा निर्धार व्यक्त केला.(जिल्हा प्रतिनिधी)