शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
3
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
4
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
5
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
6
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
7
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
8
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
9
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
10
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
11
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
12
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
13
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
14
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
15
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
16
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
17
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
18
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं
19
सर्जिकल स्ट्राईकपेक्षा मोठा हल्ला; अजित डोभाल कामाला लागले, पाकिस्तावर मोठी कारवाई होणार?
20
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा

व्हीआयपी मार्गावरील वाहतूक असुरक्षित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2019 23:23 IST

व्हीआयपी मार्गावर असलेल्या पोत्यांमुळे वाहतूक असुरक्षित झाली आहे. पोती हटवून रस्ता वाहतुकीकरिता मोकळा करावा, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

ठळक मुद्देपोत्यांमुळे अपघाताला आमंत्रण : कंत्राटदाराचा हलगर्जीपणा

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : व्हीआयपी मार्गावर असलेल्या पोत्यांमुळे वाहतूक असुरक्षित झाली आहे. पोती हटवून रस्ता वाहतुकीकरिता मोकळा करावा, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.विश्रामगृहाशेजारून गेलेल्या, आर्वी मार्गाला जोडणाऱ्या व्हीआयपी मार्गावर खड्डयांनी जाळे विणल्याने येथून वाहनचालकांना मार्गक्रमण करताना तारेवरची कसरत करावी लागत होती. रात्री रस्त्यावरील खड्डे दृष्टीस पडत नसल्याने दररोज अपघाताच्या घटना घडत होत्या. बहुप्रतिक्षित या मार्गाच्या सिमेंटीकरणाला मंजुरी मिळाली असून काम मागील काही महिन्यांपासून प्रगतिपथावर आहे.रस्त्याचे काही प्रमाणात सिमेंटीकरण झाले असून रहदारीदेखील सुरू झाली आहे. रस्त्यावर उन्हाळ्यात पाणी जिरावे याकरिता पोती टाकण्यात आली होती. पावसाळा सुरू असतानादेखील ती पोती रस्त्यावरच असून अनेक ठिकाणी जमा झाल्याने रहदारीला अडथळा निर्माण झाला असून कुजल्यामुळे या परिसरातील वातावरण दुर्गंधीमय झाले आहे. दिवसा आणि रात्री उशिरापर्यंत या मार्गावर मोठी वर्दळ असते. विशेष म्हणजे जिल्हा प्रशासनातील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांची निवासस्थानेही याच परिसरात आहेत. या सर्वांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे.पोत्यांमुळे रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य असल्याचाच वाहनचालकांना भास होतो. पोत्यांवरून वाहने अडखळत असून दररोज किरकोळ असपघाताच्या घटना घडत आहेत. रस्त्याचे पुढील काम सुरू असून संबंधित कंत्राटदाराला ही पोती उचलण्याचा विसर पडला आहे. यामुळे वाहनचालकांतून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. रस्त्यावरील पोती तत्काळ उचलण्यात यावी, अशी मागणी या परिसरातील नागरिक, वाहनचालकांतून होत आहे.विकासकामांत नियोजनाचा अभावशहरात विविध ठिकाणी युद्धपातळीवर विकासकामे सुरू आहेत. मात्र, नियोजनाचा प्रचंड अभाव आहे. कुठे वीजखांब, रोहित्र न हलविताच रस्त्याचे काम सुरू आहेत. तर कुठे काम झाल्यावरही रस्त्यावर बांधकाम व तत्सम साहित्य पडून आहे. याशिवाय कामांचा दर्जा म्हणावा तसा नाही. सार्वजनिक बांधकाम विभागाचा याकडे कानाडोळा आहे. अधिकारी, कंत्राटदार आणि लोकप्रतिनिधींच्या संगनमतातून सर्वत्र गडबड घोटाळा सुरू आहे. विकासकामे सोईची ठरण्याऐवजी डोकेदुखी ठरताना दिसून येत असून नागरिकांत रोष व्यक्त होत आहे.

टॅग्स :road transportरस्ते वाहतूक