शहरं
Join us  
Trending Stories
1
बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय...
2
Pahalgam attack latest: पर्यटकांची हत्या करणाऱ्या तीन दहशतवाद्यांची ओळख पटली, 'या' दहशतवादी संघटनेशी कनेक्शन
3
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
4
नवरी जोमात, नवरा कोमात! रसगुल्ला खाल्ला, हात धुण्याच्या बहाण्याने बॉयफ्रेंडसोबत गेली पळून
5
'पीएम मोदी 1 तासही देऊ शकत नाहीत?', सर्वपक्षीय बैठकीत न बोलवल्याने ओवेसी नाराज...
6
Varuthini Ekadashi 2025: भयंकर राग येतो? त्याक्षणी म्हणा 'हा' मंत्र, क्षणात शांत व्हाल आणि वाद मिटेल! 
7
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
8
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
9
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
10
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'
11
नशीब बलवत्तर! फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; घटनास्थळापासून १५ मिनिटांवर होतं कुटुंब
12
पाकिस्तानी नागरिकांनी ४८ तासांत भारत न सोडल्यास काय कारवाई होणार? असा आहे गुप्तचर यंत्रणांचा ॲक्शन प्लॅन   
13
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
14
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केल्यास २ वर्षांनी किती परतावा मिळेल, पाहा कॅलक्युलेशन
15
काश्मीरमध्ये तणाव असतानाच छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांवर मोठी कारवाई, १००० नक्षल्यांना जवानांनी घेरले, ५ ठार  
16
पहलगाम दहशतवादी हल्लाः पाकिस्तानी उच्चायोगात मागवण्यात आला केक; बॉक्स पाहून एकच प्रश्न, हे 'सेलिब्रेशन' कसलं?
17
पाकिस्तान पुरता अडकणार? पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा एक निर्णय अन् शेअर बाजार धडाम
18
Elphinstone Bridge: तारीख निश्चित! एल्फिन्स्टन ब्रिज २५ एप्रिलपासून वाहतुकीसाठी बंद, मुंबईकरांची कोंडी होणार
19
Pahalgam Terror Attack : "माझ्या शुभमला परत आणा, मी माझं दुःख कोणाला सांगू, त्याने कोणाचं काय नुकसान केलं होतं?"
20
या सरकारी बँकेनं सुरू केलं लोन कॅम्पेन; कमी व्याजदर आणि शून्य चार्जेसवर मिळणार कर्ज, अखेरची तारीख कधी?

उपमुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर आमदारांचा युटर्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2023 17:33 IST

आधी केला पत्राचार : आता म्हणतात, अफवांना बळी पडू नका, हा विरोधकांचा डाव

आर्वी (वर्धा) : येथील आमदार दादाराव केचे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून माझ्या परवानगीशिवाय दिलेला निधी परत घ्या, अन्यथा राजीनामा देण्याचा इशारा दिला होता. परंतु लगेच मुंबईत उपमुख्यमंत्र्यांसोबत बैठक आटोपून आर्वीत परतल्यावर आमदारांनी पत्रकार परिषद घेवून 'माझी कुठलीही नाराजी नाही, कोणताही निधी परत जाणार नाही. हा विरोधकांचा डाव असून या अफवांवर विश्वास ठेवू नका' असे आवाहन केले. त्यामुळे आमदारांचा हा यूटर्न आणि 'ना' राजीनाम्याची भूमिका चर्चेचा विषय ठरत आहे.

आर्वीचे रहिवासी तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वीय सहायक सुमित वानखेडे यांनी नागरिकांच्या मागणीनुसार विकास कामाकरिता निधी मंजूर करण्याचा सपाटा लावला. हा सर्व प्रकार पाहून आमदार दादाराव केचे यांनी जाहीर सभेतून आगपाखड करीत उपमुख्यमंत्र्यांनाही पत्र पाठवून नाराजी व्यक्त केली होती. या सर्व घडामोडीनंतर मुंबईमध्ये उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक झाल्यावर आमदारांनी भूमिकाच बदलली. उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस यांनी माझे समाधान करून कारंजाकरिता मंजूर केलेला पाच कोटींचा निधी परत जाणार नाही. तसेच आष्टी व आर्वीकरिता जो निधी देणे बाकी होता, त्यावरही निर्णय झाला आहे. त्यामुळे आता राजीनामा देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे आमदार केचे यांनी विश्राम गृहात आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले.

नाल्या व पुलाच्या बांधकामासाठीच हा निधी नसून सर्वधर्म समभावाच्यादृष्टीने अनेक संतांच्या पावन कार्यासाठी, सर्व समाजबांधवांसाठी हा निधी उपलब्ध करून दिला आहे. ही विकासकामे विरोधकांना सहन होत नसल्याने माझी बदनामी करण्याचा सर्व प्रयत्न सुरू आहे. संताजी महाराज सभागृह व इतरत्र जी कामे आहे, ती कोणतीही कामे रद्द होणार नाहीत. माझ्याबद्दल होत असलेल्या अफवांवर विश्वास ठेवू नका. मी तुमचाच आहे, तुम्ही माझे आहात हे लक्षात घ्या, असे भावनिक आवाहनही आमदार केचे यांनी केले. या पत्रकार परिषदेला अनिल जोशी, राजाभाऊ गिरधर, प्रशांत वानखडे, विनय डोळे, डॉ. श्यामसुंदर भुतडा, बाळा नादुरकर, नीलेश देशमुख, जगन गाठे, राजाभाऊ वानखेडे, मिलिंद हिवाळे, दिनेश भगत, रोशन पवार आदींची उपस्थिती होती.

विरोधाचा प्रश्नच नाही

उपमुख्यमंत्र्यांचे स्वीय सहायक सुमित वानखेडे आणि माझ्यात कोणताही गैरसमज नाही. विकास कामांसंदर्भात आम्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जातो, तेव्हा ते कोणताही कागद सुमित यांच्याकडे द्यायला लावतात. त्यामुळे विरोधाचा प्रश्न उद्भवत नाही. सुमित हे विकासकामाला हातभार लावतात, असे आमदार दादाराव केचे यांनी सांगितले.

टॅग्स :PoliticsराजकारणDadarao Kecheदादाराव केचेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसwardha-acवर्धा