शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

गावगुंड ‘आकाश’ला गावकऱ्यांच्या जमावानेच ठेचले, सेलू मुरपाड येथील हत्याकांडाने खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2023 17:10 IST

चौघांना ठोकल्या बेड्या, १० ते १५ जण ताब्यात

हिंगणघाट (वर्धा) : अगदी किरकोळ कारणातून झालेल्या वादात गावगुंड आकाश उल्हेश उईके (३२) याला जमावानेच लाठ्याकाठ्या, दगड तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. गंभीर अवस्थेत त्याला हिंगणघाटच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले, पण उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. हे हत्याकांड बुधवारी ९ रोजी रात्री १० वाजताच्या सुमारास सेलू मुरपाड गावात घडले. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी गजानन खडसे, पांडुरंग देवतळे, प्रकाश खडसे, सूरज सातपुते या चौघांना अटक केली असून, जवळपास १० ते १५ संशयितांना चौकशीकरिता ताब्यात घेतल्याची माहिती पोलिसांनी दिली.

पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, मृत आकाश उईके हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा होता. त्याच्याविरुद्ध दरोडा, लुटमार, मारहाणीसारखे पाच ते सहा गंभीर गुन्हेही दाखल होते. नुकताच तो जामीनवर सुटला होता. गावातीलच रहिवासी प्रकाश खडसे याने दुचाकी रस्त्याच्या कडेला उभी करून ठेवली होती. मृतक आकाश याने रात्रीच्या सुमारास ती दुचाकी खाली पाडून वाद निर्माण केला. गावगुंड आकाशच्या नेहमीच्या त्रासाला कंटाळलेले १० ते १५ तरुण त्याला अद्दल घडविण्यासाठी पुढे आले. तरुणांची गर्दी पाहून आकाशने तेथून पळ काढला. हातात लाठ्याकाठ्या घेऊन जमावानेही त्याचा पाठलाग करून त्यास लाठ्याकाठ्या तसेच दगडाने ठेचले. जमावाकडून झालेल्या जबर मारहाणीत आकाश गंभीर जखमी झाला. रात्री १०:३० वाजताच्या सुमारास त्याची वहिनी मनीषा उईके हिने याची माहिती हिंगणघाट पोलिसांना दिली. पोलिसांनी सेलू मुरपाड गाव गाठून आकाशला पोलिस वाहनातून उपजिल्हा रुग्णालयात उपचारार्थ नेले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी चार आरोपींना अटक करून गुन्हा दाखल केला. 

हत्याकांडानंतर गावात तणावपूर्ण शांतता

सेलू मुरपाड गावात झालेल्या हत्याकांडानंतर गावात पोलिसांची कुमक दाखल झाली होती. पोलिस बंदोबस्तही वाढविण्यात आला होता. गुरुवारी गावात तणावपूर्ण शांतता पसरली होती.

आरोपींनी स्वत: केले आत्मसमर्पण

आकाश उईके याची जमावाने हत्या केल्यानंतर गावासह तालुक्यात खळबळ उडाली. या घटनेनंतर काही आरोपींनी स्वतः हिंगणघाट पोलिस ठाण्यात जात आत्मसमर्पण केल्याची माहिती आहे.

नुकताच कारागृहातून आला होता बाहेर

मृतक आकाश हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा होता. त्याच्याविरुद्ध विविध गंभीर गुन्हे दाखल होते. काही दिवसांपूर्वीच तो कारागृहातून जामिनावर बाहेर आला होता. अखेर नेहमीच्या त्रासाला कंटाळून संतप्त गावकऱ्यांनी त्याला यमसदनी पाठवून नेहमीसाठीचा होणारा त्रास दूर केला.

लिस अधीक्षकांसह ताफा घटनास्थळी दाखल

हत्याकांडाची माहिती मिळताच पोलिस अधीक्षक नुरुल हसन, अप्पर पोलिस अधीक्षक डॉ. सागर कवडे, उपविभागीय पोलिस अधिकारी रोशन पंडित, पोलिस निरीक्षक मारुती मुळुक, पोलिस उपनिरीक्षक ताराम, सहायक पोलिस निरीक्षक आळंदे यांनी पोलिस ताफ्यासह सेलू मुरपाड गाव गाठून घटनास्थळाची पाहणी केली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीwardha-acवर्धा