शहरं
Join us  
Trending Stories
1
सलग दोन स्फोटांनंतर लेबनान 'सावधान'! आता विमान प्रवासात पेजर, वॉकी-टॉकीवर बंदी
2
VIDEO: क्रिकेट मॅचमध्ये तुफान राडा! खेळाडूंमध्ये हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी झाली तुडवातुडवी
3
"हिंदूंसोबत विश्वासघात, देव..."; तिरुपतीच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी प्रकरणावरून भाजपची प्रतिक्रिया
4
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विदर्भातील स्वागतासाठी भाजपाची जय्यत तयारी, तर काँग्रेसचे १० सवाल
5
सातारा: अल्पवयीन मुलाचा ४ वर्षीय मुलीवर अत्याचार; घराच्या टेरेसवर घडला किळसवाणा प्रकार
6
हातात खराटा अन् स्वच्छतेचा मंत्र... नागपुरात रेल्वे व्यवस्थापकांनी केली स्थानकावर साफसफाई
7
"इस्रायलने लेबनानमध्ये नरसंहार केला, आता परिणाम भोगा"; हिज्बुल्ला प्रमुखाचा इशारा
8
रशियासोबतची मैत्री तोडण्याचं कटकारस्थान...! युक्रेनला शस्त्रास्त्र पुरवल्याची खोटी बातमी पसरवली; भारतानं सुनावलं
9
तिरुपती मंदिराच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी? चंद्राबाबूंनी दिला लॅब रिपोर्टचा हवाला, झाली अशी पुष्टी
10
महायुतीतील ८० टक्के जागावाटप निश्चित, भाजपची १६० च्या जवळपास जागा लढविण्याची भूमिका
11
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे काँग्रेसमध्ये सामील; विधानसभा निवडणूक लढवणार?
12
"लाडकी बहीण' योजनेच्या पैशांचा परिणाम थोडाफार होईल, पण..."; शरद पवारांचे सूचक विधान
13
विरोधी पक्ष राज्याची बदनामी करतायत, लोकसभेतही खोटं बोलून मतं मिळवली, मुख्यमंत्री शिंदे बसरले 
14
अश्विन मार रहा है! चेन्नईच्या चेपॉकवर लोकल बॉय R Ashwinची सेंच्युरी; जड्डूच्या साथीनं रचला नवा इतिहास
15
“...तर आम्ही सर्व २८८ जागांवर लढू, गप्प बसणार नाही”; ठाकरे गटाने काँग्रेसला बजावले
16
"जोपर्यंत अशा महिला आहेत तोपर्यंत...", ग्राहकावर आरोप करत डिलिव्हरी बॉयची मृत्यूला मिठी
17
IREDA बद्दल केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय, DIPAM ने दिली मंजूरी; शेअर तेजीत
18
CM शिंदेंसमोरच अजित पवारांनी गायकवाडांचे टोचले कान; म्हणाले, "वाचाळवीरांनी..."
19
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: साडेसाती कशी येते? ‘शनी’ला आहे एक विशेषाधिकार; पाहा, प्रभावी मंत्र अन् उपाय
20
शाळा-कॉलेजांमध्ये मोबाईल फोन आणण्यावर पूर्ण बंदी; 'या' देशातील सत्ताधाऱ्यांचा नवा आदेश

एकाच वाणाच्या वापरामुळे विषाणू

By admin | Published: September 12, 2015 2:01 AM

निसर्गाच्या चक्रातून वाचत सोयाबीनला आता शेंगा धरून त्या भरायला प्रारंभ झाला. अशात अचानक सोयाबीनची उभी झाडे वाळू लागल्यामुळे शेतकरी पुरता हादरला आहे.

पवनार : निसर्गाच्या चक्रातून वाचत सोयाबीनला आता शेंगा धरून त्या भरायला प्रारंभ झाला. अशात अचानक सोयाबीनची उभी झाडे वाळू लागल्यामुळे शेतकरी पुरता हादरला आहे. सोयाबीनचे पीक हातचे जाण्याची भीती निर्माण झाली आहे. पवनार येथील सोयाबीनवर आलेल्या विषाणूची पाहणी केली असता शेतकरी एकाच वाणाचा वापर करीत असल्याने विषाणूचा हल्ला होत असल्याचे पीकेव्हीचे डॉ. नेमाडे यांनी शेतकऱ्यांना सांगितले आहे.सोयाबीनवर व्हायरस, जिवाणू, बुरशीजन्य रोगाचे एकदम आक्रमण झाले असून वातावरणातील बदल व जमिनीतील बुरशी याला कारणीभूत असल्याचे कृषीतज्ज्ञांचे मत आहे.जिल्ह्यात कृषी विभागामार्फत ‘क्रॉप सॅक’ची चमू किडीवरील नियंत्रणासाठी आहे; परंतु या चमूचे काम पिकांवर असलेल्या किडींची तपासणी व त्यावरील उपाययोजना सूचविणे आहे. सध्या सोयाबीनवर किडींचे आक्रमण जरी अल्प असले तरी विषाणूजन्य रोगाचे आक्रमण मोठ्या प्रमाणात आहे. हा रोग हवेद्वारे पावसाद्वारे झपाट्याने पसरतो. या रोगामुळे सोयाबीनची पाने वाळायला प्रारंभ होतो. एक-दोन दिवसात अख्खे झाड वाळते, त्यामुळे त्या झाडाला असलेल्या शेंगा भरत नाही. ज्या झाडावर या व्हायरसने आक्रमण केले असेल त्यावर फवारणी करूनही उपयोग होताना दिसत नाही; परंतु तो पसरू नये म्हणून प्रतिबंधात्मक उपाययोजना करता येत असल्याचे पीकेव्हीचे डॉ. नेमाडे यांनी सांगितले.पवनार शिवारात अशोक मरगडे यांच्या शेतात, प्रारंभी या रोगाची लक्षणे आढळल्यामुळे कृषी तज्ज्ञ डॉ. तोटे यांनी पिकेव्ही व कृषी विभागाला सूचना दिली. कृषी सहाय्यक भोयर यांनी सुद्धा क्रॉपसॅकच्या चमूला पाचारण केले. तालुका कृषी अधिकारी राठोडसह आत्मा प्रकल्प संचालक दीपक पटेल, सेलसुरा कृषी विद्यापीठाचे शास्त्रज्ज्ञ डॉ. दवने यांनी प्रत्यक्ष जाऊन शेतात पाहणी केली व शेतकऱ्यांना हा व्हायरस पसरू नये म्हणून उपाययोजना सुचविल्या. सोयाबीनची ३३५ नावाची एकच जात वर्षानुवर्षे शेतकरी वापरत आहे. यामुळे ही बियाने बियाणे अनेक विषाणूंना सोबतच घेवून येत असल्याचे डॉ. नेमाडे व डॉ. देवने यांनी सांगितले. बियाण्यांवर पेरणीपूर्वी वीज प्रक्रिया केली तर अनेक विषाणूपासून पिकांना वाचविता येते असे मत तालुका कृषी अधिकारी विपीनकुमार राठोड यांनी व्यक्त केले. शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्याकरिता मार्गदर्शन करण्याची मागणी आहे.(वार्ताहर)