शहरं
Join us  
Trending Stories
1
‘जीव वाचवण्यासाठी आम्ही…’मृत गनबोटेंच्या पत्नीने शरद पवारांना सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव
2
'ज्याने माझ्या भावाला मारलं, मला त्याचं शीर हवंय', लेफ्टनंट विनय नरवालांच्या बहिणीचा मुख्यमंत्र्यांसमोर आक्रोश
3
कलमा म्हणजे काय? जो दहशवाद्यांसमोर पढल्याने पहलगाममध्ये वाचले एका हिंदू प्राध्यापकाचे प्राण
4
आत्महत्येपूर्वी डॉ. वळसंगकरांनी केला मृत्यूपत्रात बदल; २० टक्के हिस्सा कुणाला दिला?
5
मोठी बातमी! पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये तिसरी चकमक; एक जवान शहीद  
6
ED: सहारा प्रकरणात ईडीची मोठी कारवाई, १५०० कोटींपेक्षा अधिकची नवी संपत्ती जप्त; प्रकरण काय?
7
पाकिस्तान रात्रभर दहशतीत! भारत कोणत्याही क्षणी घुसू शकतो; १८ लढाऊ विमाने एलओसीवर...
8
सचिन तेंडुलकर झाला ५२ वर्षांचा! मास्टर ब्लास्टरचे 'हे' ५ रेकॉर्ड तोडणे जवळपास अशक्य
9
Pahalgam Terror Attack : बांदीपोरामध्ये लष्कर-ए-तोयबाच्या ४ दहशतवाद्यांना अटक, पूंछ-अनंतनाग आणि उधमपूरमध्ये चकमक सुरू
10
४८ तासांत पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्याचे आदेश; सीमा हैदरचं आता काय होणार?
11
Success Story: 'आपली आजी', वय वर्ष ७४, यू-ट्युबद्वारे महिन्याला ६ लाखांची कमाई; मराठमोळ्या आजींचा कसा आहे प्रवास?
12
आधी सिंधू करार थांबवला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
13
पहलगाम व्हॅलीचे नाव 'हिंदू व्हॅली' करा! मराठी अभिनेत्याचा सरकारला सल्ला, म्हणाला- "श्रीनगरला भारताची उपराजधानी घोषित करा"
14
FIITJEE चे मालक डीके गोयल यांच्याविरोधात ईडीची कारवाई, १० ठिकाणांवर छापेमारी
15
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामुळे २१,००० कोटी पणाला, काश्मीरच्या अर्थव्यवस्थेची मोठी हानी, देशाला होणार हे १० तोटे 
16
पहलगाम दहशतवादी हल्ला : मृत जगदाळेंच्या कुटुंबीयांनी शरद पवारांना सांगितली आपबिती; संसदेत मुद्दा उचलण्याची केली मागणी
17
Stock Market Today: ७ दिवसांच्या तेजीनंतर शेअर बाजार सुस्तावला, Sensex मध्ये १४० अंकांची घसरण; Tata Consumer, Eternal, ONGC टॉप लूझर्स
18
सिंधू पाणी करार थांबवल्याने पाकिस्तानच्या तोंडचं पाणी पळालं; उपपंतप्रधान तावातावाने म्हणाले...
19
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
20
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई

विषय शिक्षकांना पदोन्नती पण पदस्थापनेसाठी 'वेट अँड वॉच'

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2024 17:21 IST

आचारसंहितेमुळे अडचण : विद्यार्थ्यांचे होताहेत शैक्षणिक नुकसान

लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : शासनासह प्रशासनाकडूनही जिल्हा परिषद शाळांतील शिक्षणाचा खेळखंडोबा चालवल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यात गणित-विज्ञान विषय शिक्षकांच्या जागा रिक्त असल्याने नुकतेच २९ शिक्षकांना पदोन्नती देण्यात आली. पण, आता विधानसभा निवडणुकीची आचारसंहितेचे कारण सांगून या शिक्षकांची पदस्थापना रोखण्यात आल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याची ओरड होत आहे. 

जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये गणवेशापासूनच, तर शिक्षकांच्या संख्येपर्यंत अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. असा गोंधळ कायम असतानाही गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा तगादा लावल्या जात आहे. जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शाळामध्ये वर्ग सहावी ते आठवीपर्यंतच्या वर्गाकरिता गणित विज्ञान विषय शिक्षकांच्या जवळपास ७२ जागा बऱ्याच दिवसांपासून रिक्त आहेत. त्यामुळे नुकताच बीएसी उत्तीर्ण झालेल्या २९ सहायक शिक्षकांचे १५ दिवसांपूर्वी समुपदेशन घेऊन पदोन्नती देण्यात आली. अर्धे सत्र उलटले, तरीही विषय शिक्षक नसल्याने आता तरी विद्यार्थ्यांना विषय शिक्षक मिळेल, अशी अपेक्षा होती. परंतु, पदोन्नतीचे आदेशच उशिराने निघाले. त्यातच आचारसंहिताही लागल्याने आता पदस्थापनेचे काम रखडले असून, आचारसंहिता संपेपर्यंत शाळांना विषय शिक्षकांची प्रतीक्षा करावी लागणार आहे. तोपर्यंत आणखी विद्यार्थ्यांना शैक्षणिक नुकसानीची झळ सोसावी लागणार असल्याने रोष व्यक्त होत आहे. 

अध्ययन-अध्यापनात अडथळा जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये गणित-विज्ञान विषयाच्या शिक्षकांची कमतरता आहे. त्यामुळे शाळांतील शिक्षकांकडूनच या विषयाचे धडे दिल्या जात आहे. आता अर्धे सत्र संपत आले तरीही नियुक्ती न मिळाल्याने अध्ययन-अध्या- पनात अडचणी निर्माण होत आहे.

"जिल्ह्यामध्ये एकूण विषय शिक्षकांच्या ७२ जागा रिक्त असून, नुकतेच २९ विषय शिक्षकांना पदोन्नती देण्यात आली आहे, परंतु सध्या विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता असल्यामुळे शिक्षकांना त्यांच्या शाळांतून कार्यमुक्त करणे सोयीचे ठरणारे नाही. त्यामुळे आचारसंहिता संपतेपर्यंत शिक्षकांना कार्यमुक्त करता येणार नाही. "- डॉ. नीतू गावंडे, शिक्षणाधिकारी, प्राथमिक

टॅग्स :wardha-acवर्धाEducationशिक्षण