शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
3
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
4
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
5
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
6
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
7
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
8
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
9
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
10
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
11
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
12
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
13
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
14
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
15
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
16
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
17
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
18
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
19
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
20
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!

वर्धा जिल्ह्यात म्युकरमायकोसिसचा मृत्यू दर पोहोचला ६.०६ टक्क्यांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2021 07:00 IST

वर्धा जिल्ह्यात म्युकरचा मृत्यू दर तब्बल ६.०६ टक्के असल्याचे वैद्यकीय क्षेत्रातील अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांनी अधिकच दक्ष राहून जिल्हा प्रशासनाच्या सूचनांचे पालन करणे गरजेचे आहे.

ठळक मुद्देआठ व्यक्तींचा घेतला बळीकासवगतीने जिल्ह्यातील नागरिकांना नेतोय मृत्यूच्या दारात

महेश सायखेडे

लोकमत न्यूज नेटवर्क  

वर्धा : काळी बुरशी अशी ओळख असलेल्या म्युकरमायकोसिस हा आजार जिल्ह्यातील नागरिकांना कासवगीनेच आपल्या कवेत घेत मृत्यूच्या दारापर्यंत नेत आहे. या आजाराने आतापर्यंत तब्बल आठ व्यक्तीचा बळी घेतला असून जिल्ह्यात म्युकरचा मृत्यू दर तब्बल ६.०६ टक्के असल्याचे वैद्यकीय क्षेत्रातील अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांनी अधिकच दक्ष राहून जिल्हा प्रशासनाच्या सूचनांचे पालन करणे गरजेचे आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण १३२ म्युकरमायकोसिस बाधितांची नोंद घेण्यात आली आहे. त्यापैकी आठ व्यक्तींचा या आजाराने बळी घेतला असून ११९ रुग्णांनी त्यावर विजय मिळविला आहे. तर सध्या दोन रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच रुग्णालयात उपचार सुरू असताना तीन रुग्णांनी स्वत:च रुग्णालयातून सुटी घेतली आहे.

बाधितांत पुरुष सर्वाधिक

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण १३२ म्युकरमायकोसिस बाधितांची नोंद घेण्यात आली आहे. त्यात १०६ पुरुष तर २६ महिलांचा समावेश आहे. तशी नोंद आरोग्य विभागाने घेतली आहे.

रिकव्हरी दर ९०.१५ टक्के

जिल्ह्यात म्युकरमायकोसिस या काळ्या बुरशीच्या आजाराने आठ व्यक्तींचा बळी घेतला असला तरी आतापर्यंत ११९ रुग्णांनी त्यावर विजय मिळविला आहे. जिल्ह्यात म्युकरमायकोसिसचा रिकव्हरी दर ९०.१५ टक्के असल्याचे सांगण्यात आले.

जिल्ह्यात आतापर्यंत १३२ म्युकरमायकोसिस बाधितांची नोंद घेण्यात आली आहे. त्यापैकी आठ व्यक्तींचा म्युकरमुळे मृत्यू झाला असून ११९ रुग्णांनी या आजारावर विजय मिळविला आहे. वेळीच उपचार म्युकरमुक्तीसाठी महत्त्वाचे असून कुठल्याही व्यक्तीला लक्षणे असल्यास त्याने नजीकच्या रुग्णालयात जाऊन डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधोपचार घ्यावा.

- डॉ. अजय डवले, जिल्हा आरोग्य अधिकारी, वर्धा.

टॅग्स :Mucormycosisम्युकोरमायकोसिस