शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद गंभीर धोका; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावरुन पीएम नरेंद्र मोदींनी दिला इशारा
2
"शाळेचे संचालक अजूनही का सापडलेले नाहीत?", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर आदित्य ठाकरेंचा सवाल
3
"जगन मोहन रेड्डींचे मन शुद्ध असेल तर...", तिरुपती लाडू वादावरून पवण कल्याण यांचा निशाणा
4
Devendra Fadnavis on Badlapur Case Akshay Shinde Encounter: "पोलिसांवर गोळ्या चालवल्या तर..."; देवेंद्र फडणवीसांचे अक्षय शिंदे एन्काऊंटरवर रोखठोक मत
5
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी व्हावी, नातलगांची मागणी 
6
बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदे एन्काऊंटरवर नाना पटोले यांचे सरकारला ३ महत्त्वाचे प्रश्न
7
Sharad Pawar on Akshay Shinde Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरवर शरद पवारांचे ट्विट, काय म्हणाले?
8
"प्रकरण दडपण्यासाठी हे एन्काऊंटरचे फेक नॅरेटिव्ह", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर अनिल देशमुखांचा आरोप
9
"पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न आहे का?", बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार, विजय वडेट्टीवारांचा सवाल
10
CM Eknath Shinde on Akshay Shinde Encounter: "ज्याने माणुसकीला काळीमा फासला..."; CM एकनाथ शिंदे अक्षयच्या एन्काऊंटरवर स्पष्टच बोलले
11
अक्षय शिंदे आणि पोलिसांची चकमक ठाण्यात नेमकी कुठे झाली? Inside Story
12
Badlapur Case Accused Akshay Shinde, Police Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: आरोपी अक्षय शिंदे पोलीस चकमकीत ठार! पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी केला गोळीबार
13
बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार! उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
14
अनिल अंबानी यांच्या मुलावर SEBI ची कारवाई; 'या' प्रकरणात ठोठावला कोट्यवधीचा दंड
15
"माझ्या पोराला पैसे देऊन मारून टाकलं", अक्षय शिंदेच्या आईचे गंभीर आरोप, दुपारीच घेतली होती भेट
16
भारतात मंकीपॉक्सचा रुग्ण आढळला, क्लेड १ बी व्हायरसची लागण, आरोग्य यंत्रणा सतर्क
17
'या' दिवसापासून भाजप राबवणार मेगा सदस्यत्व अभियान, एक कोटी लोकांना जोडण्याचे लक्ष्य
18
रोहित पवारांना राम शिंदेंचा धक्का! कर्जत-जामखेडमधील दोन नेते भाजपात
19
Video: बापरे! अजगराचा महिलेला विळखा, दोन तास मृत्यूशी झुंज, श्वास घेणेही कठीण; अखेर...
20
"लहान आणि मोठे हुड्डा यांच्यात लढाई सुरू आहे...", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल, कुमारी सैलजा यांच्यावरही निशाणा

वर्धा-यवतमाळ-नांदेड मार्ग: नव्या वर्षात कळंबपर्यंत धावणार रेल्वे

By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2023 10:54 AM

पंतप्रधान कार्यालयातील प्रगती पोर्टलवर समाविष्ट : प्रकल्पाच्या कामाला वेग

वर्धा : विदर्भ-मराठवाडा हे दोन्ही प्रदेश जोडण्याच्या प्रक्रियेत वरदान ठरणाऱ्या वर्धा-यवतमाळ-नांदेड या २८४ किलाेमीटरच्या बहुप्रतीक्षित रेल्वे मार्गाचे काम प्रगतीपथावर असून जानेवारी २०२४ पर्यंत वर्धा ते कळंबपर्यंत रेल्वेगाडी धावणार असल्याचे सूतोवाच रेल्वेच्या सूत्रांनी केले आहे. दरम्यान या मार्गाच्या विकासकामाला गती देण्यासाठी हा रेल्वेमार्ग पंतप्रधान कार्यालयातील प्रगती पोर्टलवर समाविष्ट करण्यात आला आहे.

वर्धा- यवतमाळ-नांदेड या रेल्वे मार्गाच्या कामाला केंद्र सरकारने लालूप्रसाद यादव रेल्वेमंत्री असताना लोकमत वृतपत्र समूहाचे अध्यक्ष, राज्यसभेचे तत्कालीन खासदार डाॅ. विजय दर्डा यांच्या पाठपुराव्यामुळे मंजुरी दिली होती. वर्धा- यवतमाळ - नांदेड रेल्वे प्रकल्प पंतप्रधान कार्यालयातील प्रगती पोर्टलवर समाविष्ट झाल्याने या प्रकल्पाच्या कामाला वेग आला आहे. वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वे प्रकल्प दोन टप्प्यांत आहे. पहिला वर्धा ते यवतमाळ ७८ किलोमीटर, तर दुसरा टप्पा यवतमाळ ते नांदेड २०६ किलोमीटरचा आहे. एकूण रेल्वे मार्ग २८४ किमी अंतराचा असून साडेतीन हजार कोटी खर्चातून तो पूर्णत्वास जात आहे. वर्धा जिल्ह्यातील पहिल्या टप्प्यातील वर्धा ते कळंब ४० किलोमीटर आणि कळंब ते यवतमाळ ३८ किलोमीटर तसेच वर्धा ते यवतमाळ या पहिल्या टप्प्याचे ९० टक्के काम पूर्ण झाले आहे.

यवतमाळ ते नांदेड रेल्वेमार्गाच्या सिंगल लाइनचे काम प्रगतिपथावर असून, या मार्गावर १५ मोठे ब्रीज, २९ बोगदे, तसेच ५ उड्डाणपुलांचे बांधकाम सुरू आहे. या मार्गावर वर्धा ते कळंबपर्यंत ४० किमी अंतराच्या रेल्वेचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. सोबतच देवळी रेल्वे स्टेशनच्या सुसज्ज वास्तूंचे बांधकाम पूर्ण झाले असून, प्लॅटफॉर्मचे बांधकाम, तसेच इतर कामे अंतिम टप्प्यात आहेत. त्यामुळेच येत्या जानेवारीपर्यंत वर्धा-देवळी ते कळंब मार्गावर रेल्वे धावणार असल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

ऑक्टोबर /नोंव्हेबर २०२३ मध्ये रेल्वे गाडीची ट्रायल सुरू होणार असून प्रत्यक्ष वर्धा ते कळंब या सेक्शनचे उद्घाटन जानेवारी २०२४ मध्ये प्रस्तावित आहे. या प्रकल्पामुळे देवळी शहर व वर्धा जिल्ह्यातील भिडी हे ग्रामपंचायत असलेले गाव भारतीय रेल्वेच्या नकाशावर प्रथमच येणार आहे.

विजय दर्डा यांच्या निरंतर प्रयत्नांचे यश

विदर्भ व मराठवाडा या महाराष्ट्रातील दोन मागास भागांसाठी संजीवनी ठरणारा वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वे प्रकल्प लोकमत समूहाच्या एडिटोरिअल बोर्डाचे चेअरमन व माजी खासदार डॉ. विजय दर्डा यांचा 'ड्रीम प्रोजेक्ट' राहिला आहे. या प्रकल्पासाठी ते गेल्या तीन दशकांपासून निरंतर प्रयत्न करत आहेत. त्यांच्या प्रयत्नांमुळे फेब्रुवारी २००८ मध्ये या प्रकल्पाची घोषणा केली गेली. फेब्रुवारी २००९ मध्ये तत्कालीन रेल्वेमंत्री लालू प्रसाद यादव यांनी यवतमाळात या प्रकल्पाचे भूमिपूजन केले होते. खासदारपदी असताना त्यांनी संसदेत या प्रकल्पाची मागणी लावून धरली, शिवाय केंद्र व राज्य सरकारकडे सतत पाठपुरावा केला. काही महिन्यांपूर्वी दर्डा यांनी या प्रकल्पाच्या संथगतीने सुरु असलेल्या कामासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. तसेच न त्यांच्यासोबत पत्रव्यवहारही केला होता. यानंतर विद्यमान रेल्वेमंत्री अश्विनी च वैष्णव यांच्यासोबतही चर्चा केली होती. यावेळी वैष्णव यांनी हा प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आश्वासन दिले होते.

मालधक्कादेखील मंजूर

या कामाबद्दल मी समाधानी असून देवळी येथे एमआयडीसीची मागणी लक्षात घेता मालधक्कादेखील मंजूर केलेला आहे अशी माहिती वर्धेचे खासदार रामदास तडस यांनी ‘लोकमत’ला दिली. वर्धा ते नांदेड हा प्रवासदेखील भविष्यात रेल्वेद्वारे तीन ते चार तासात करता येणार असल्याचे त्यांनी सांगितले. वर्धा-यवतमाळ-नांदेडसह इतर रेल्वे मार्गाला १६ हजार कोटीपेक्षा अधिक निधी देण्यात आला असल्याची माहिती रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी दिली.

टॅग्स :railwayरेल्वेIndian Railwayभारतीय रेल्वेwardha-acवर्धाYavatmalयवतमाळNandedनांदेड