ऑनलाइन लोकमत
वर्धा : गेल्या दोन-तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे राळेगांव मार्गावरील यशोदा नदीला पूर आला आहे. या पुरामुळे वायगांव-राळेगांव मुख्य मार्गावरील पुलावर पाणी असल्याने सरुळ, चना (टाकळी), सोनेगांव(बाई), आलोड़ा, बोरगांव, निमसडा, पात्री, ममदापुर, या गांवा सह इतर गावांचा संपर्क तुटला आहे. यामुळे राळेगांव-वर्धा मार्गाची वाहतूक बंद करण्यात आली आहे. तसंच नदीला लागून असलेल्या नाल्यातुन पाण्याने चना टाकळी पुल पूर्णता तुटला. त्यामुळे चना टाकळी या गावांचा संपर्क पुर्णपणे तुटला आहे.