शहरं
Join us  
Trending Stories
1
गोपीनाथ मुंडे आज असते, तर अजित पवारांना भाजपसोबत घेतलं असतं का?; धनंजय मुंडे म्हणाले...
2
माझी लाडकी बहीण योजना बंद होण्याची चर्चा; अदिती तटकरेंनी केला खुलासा 
3
Bhagyashree Navtake IPS: १२०० कोटींचा घोटाळा, सीबीआयचा गुन्हा; कोण आहेत भाग्यश्री नवटके?
4
गौरी लंकेश हत्या प्रकरणातील आरोपी शिवसेनेत, जेलमधून परतताच पक्षप्रवेश
5
IND A vs Pak A : 'हायहोल्टेज' मॅच! युवा टीम इंडियानं दिला पाकिस्तान 'अ' संघाला दणका
6
Maharashtra Election 2024: नितीन गडकरींच्या घरी फडणवीस-बावनकुळेंचे 2 तास खलबते
7
IND vs PAK : कॅचेस विन मॅचेस! Ramandeep Singh च्या अफलातून कॅचनं फिरली मॅच (VIDEO)
8
Noel Tata: नोएल टाटांची पत्नी कोण? त्यांना कोणत्या गोष्टींची आहे आवड?
9
Navya Haridas: प्रियंका गांधींविरोधात भाजपाचा उमेदवार ठरला! नव्या हरिदास कोण?
10
राजेंद्र शिंगणेंच्या हाती तुतारी; पुतणीने शरद पवारांना विचारला खरमरीत सवाल!
11
‘वंचित’कडून विधानसभेसाठी आणखी १६ उमेदवारांची घोषणा; साताऱ्यातील २ जागांचा समावेश!
12
अखेर रणजीतसिंह मोहिते पाटलांचं ठरलं! आमदारकीचा राजीनामा; लवकरच पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश
13
ठाकरेंना कोणत्या जागा हव्यात, ज्यामुळे महाविकास आघाडीच्या जागावाटपाचा गाडा फसलाय?
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मोहोळ, पंढरपूर अन् माढ्याचं गणित चुकल्यास पवारांचं राजकारण बिघडणार
15
Jharkhand Election 2024: भाजपाची पहिली यादी आली! झारखंडमधील ६६ उमेदवारांच्या नावाची घोषणा
16
वडील बाबा सिद्दिकी यांच्या हत्येनंतर झिशान सिद्दिकींची संतप्त पोस्ट; शायरीतून रोख कुणाकडे?
17
भाजप नेतृत्वाच्या मनात नेमकं काय?; फडणवीस-अजितदादा बाहेर, अमित शाह-CM शिंदेंची बंद दाराआड चर्चा!
18
महायुतीच्या जागावाटपाचा तिढा सुटला की नाही? फडणवीसांनी दिली महत्वाची माहिती
19
माढ्यात पवारांना धक्का बसणार? काँग्रेसच्या इच्छुक उमेदवाराने मराठा समाजाकडेच मागितली उमेदवारी
20
JMM-काँग्रेसमध्ये जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला, कोण किती जागांवर निवडणूक लढवणार? जाणून घ्या...

वॉटर कप स्पर्धा आणि जलशुक्त शिवारची पाहणी

By admin | Published: May 06, 2017 12:32 AM

सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत सहभागी झालेल्या सावंगी पोळ या गावात श्रमदानातून झालेल्या विविध विकासकामांची

वर्धा : सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत सहभागी झालेल्या सावंगी पोळ या गावात श्रमदानातून झालेल्या विविध विकासकामांची शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाहणी केली. यावेळी यावेळी खा. रामदास तडस, वर्धा विधानसभा क्षेत्राचे आ. डॉ. पंकज भोयर, अप्पर मुख्य सचिव प्रवीण परदेशी, विभागीय आयुक्त अनुप कुमार, जिल्हाधिकारी शैलेश नवाल, माजी आमदार दादाराव केचे, सरपंच वर्षा धुर्वे यांची प्रमुख उपस्थिती होती. दुष्काळ हा मानवनिर्मित आहे. शासन पुन्हा जलयुक्त शिवारच्या माध्यमातून निसर्गाशी मैत्री साधत आहे. वॉटरशेडच्या माध्यमातून नैसर्गिक क्षमता पुनरुज्जीवित करण्यासाठी माथा ते पायथा काम सुरू आहे. निसर्गाकडून घेतलेले निसर्गाला परत करण्यासाठी सावंगी पोळ या आदिवासी बहुल गावातील गावकरी जी मेहनत घेत आहे, त्यावरून पुढील ५० वर्षे यागावात दुष्काळ येणार नाही. मित्र म्हणून सरकार तुमच्यासोबत आहे. परिवर्तन घडत निसर्गाशी सर्वांची मैत्री झाली असून त्यातून दुष्काळ मुक्त महाराष्ट्राचे स्वप्न साकार करू, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. आपल्या देशात अनेक संस्कृती व सभ्यता संपल्या आहेत. मात्र आदिवासी संस्कृती अजूनही जिवंत आहे. याचे एकमेव कारण म्हणजे आदिवासी समाजाने निसर्गाचे शोषण नव्हे तर रक्षण केले आहे. असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, वॉटर कप स्पर्धेत काम करणारे सर्वच नायक असल्यचे ते म्हणाले. यावेळी पाणी फाउंडेशनचे मंदार देशपांडे व उपस्थितांनी जल है तो कल है, दुष्काळाला लाथ मारा, असे नारे देऊन वातावरण जोशमय केले. जलसंधारणाच्या कामात योगदान देणाऱ्या दिलासा संस्थेचे रवींद्र तांदळकर, आर्ट आॅफ लिव्हींगचे मनीष बदे, मनीष भाटे रोटरी क्लब नागपूर, बजाज फाउंडेशन मार्फत महेंद्र फाटे, रोटरीचे डॉ. सचिन पावडे, ग्रामविकास अधिकारी बोबडे यांच्यासह विरुळ सरपंच साधना उईके यांनी सहा महिन्यांचे बाळ असताना काम केले त्याबद्दल त्यांचा मुख्यमंत्र्यांचे हस्ते सत्कार करण्यात आला. यानंतर पांदण रस्ते माहिती पुस्तीकेचे प्रकाशन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. आर्वी तालुक्यातील पुनर्वसित १७ गावातील ४,४०० सातबारा तयार झाले असून त्यात प्रतिनिधिक स्वरुपात विनोद खांडेकर (नेरी), भीमराव तुमस्कर, भावराव कोरे यांना सातबाराचे वाटप करण्यात आले. तालुक्यातील नागरिकांची यावेळी उपस्थिती होती.(प्रतिनिधी) वॉटर कपमधून पाच लाख घनमीटर पाण्याच्या निचऱ्याची अपेक्षा वॉटर कप स्पर्धेत ८ एप्रिल ते ४ मे २०१७ या २७ दिवसात १ लाख ७५ हजार घनमीटर पाणीसाठा होईल एवढी कामे झाली असून ५ मे ते २२ मे या कालावधीत होणाऱ्या कामातून ५ लाख घनमीटर पाणीसाठा अपेक्षित आहे. या कामातुन ४५ हजार मनुष्य दिवस काम अपेक्षित आहे. यशोदा नदी खोरे पुनरुज्जीवन अंतर्गत ६३० किलोमीटर सरळीकरण व खोलीकरण होणार आहे. याचा फायदा ४ तालुक्यातील १४३ गावातील २८ हजार शेतकरी कुटुंबाना होणार आहे.