शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
2
बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय...
3
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
4
'देवाला घाबरलं पाहिजे, आता तुम्ही शून्याच्याही खाली जाणार'; पाकिस्तानी प्राध्यापकाची स्वतःच्याच देशावर टीका
5
संकटात कंपनी, गुंतवणकदार झाले कंगाल; ₹११२५ वरुन ₹९५ वर आला शेअर, सातत्यानं लोअर सर्किट
6
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध पेटले तर कोणता देश कोणाला पाठिंबा देईल? पाहा...
7
Pahalgam attack latest: पर्यटकांची हत्या करणाऱ्या तीन दहशतवाद्यांची ओळख पटली, 'या' दहशतवादी संघटनेशी कनेक्शन
8
सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर भारताचा थेट पाकच्या अर्थव्यवस्थेलाच धक्का! ३००० कोटींचे होणार नुकसान
9
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
10
नवरी जोमात, नवरा कोमात! रसगुल्ला खाल्ला, हात धुण्याच्या बहाण्याने बॉयफ्रेंडसोबत गेली पळून
11
'पीएम मोदी 1 तासही देऊ शकत नाहीत?', सर्वपक्षीय बैठकीत न बोलवल्याने ओवेसी नाराज...
12
Varuthini Ekadashi 2025: भयंकर राग येतो? त्याक्षणी म्हणा 'हा' मंत्र, क्षणात शांत व्हाल आणि वाद मिटेल! 
13
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
14
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
15
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
16
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'
17
नशीब बलवत्तर! फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; घटनास्थळापासून १५ मिनिटांवर होतं कुटुंब
18
पाकिस्तानी नागरिकांनी ४८ तासांत भारत न सोडल्यास काय कारवाई होणार? असा आहे गुप्तचर यंत्रणांचा ॲक्शन प्लॅन   
19
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
20
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केल्यास २ वर्षांनी किती परतावा मिळेल, पाहा कॅलक्युलेशन

तीन वर्षांपासून पाणीपट्टीकर भरलाच नाही; पालिकेकडे थकले ५.७३ कोटी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2025 17:12 IST

Wardha : पाटबंधारे विभाग अॅक्शन मोडवर

सटवाजी वानोळे लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शहराला धाम धरणावरून पाणीपुरवठा केला जातो. यासाठी वर्धा पालिकेला पाटबंधारे विभागाकडून नाममात्र शुल्कात पाणी उपलब्ध करून दिले जाते. असे असताना गत तीन वर्षापासून पालिकेने पाटबंधारे विभागाला पाण्याचा करच अदा केला नाही. पाण्याच्या कराची ही रक्कम तब्बल ५ कोटी ७३ लाख रुपयांवर पोहोचली आहे. थकीत रकमेचा वाढता आकडा लक्षात घेता पाटबंधारे विभाग अॅक्शन मोडवर आला असून, पालिकेची कोंडी करण्याच्या तयारीत आहे.

जिल्ह्यातील सिंचन तसेच पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागावा, यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करून पाटबंधारे विभागाने तलाव, धरणाची निर्मिती केली. यातून मोठचा शहरासह ग्रामपंचायत तसेच जिल्ह्यातील उद्योग कारखाने मोठे प्रकल्पांना पाणीपुरवठा केला जातो. यासाठी नाममात्र शुल्क आकारण्यात येते. मात्र, असे असताना एकट्या वर्धा पालिकेने गत तीन वर्षापासून कराचा भरणा केला नाही. शिवाय लघु उद्योगांसह, मोठ्या उद्योगांकडे लाखांची थकबाकी असल्याने जिल्ह्यातील आस्थापनांकडे थकबाकी असलेला आकडा २५ कोटी ३७ लाख ४० हजार रुपये एवढा आहे.

२८ प्रकल्पांतून होतो उद्योगांनाही पाणीपुरवठापाटबंधारे विभागाकडे ८ मोठे, तर २० लहान जलाशय आहेत. यातून जिल्ह्यासह चंद्रपूर तालुक्यातील काही भागांना पाण्याचा पुरवठा केला जातो. पोथरा प्रकल्पामधून चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारशहा येथील बिल्ट ग्राफीक पेपर मिल व राजुरा नगरपरिषदेला पाणी पाणीपुरवठा केला जातो.

...यांना केला जातो पाणीपुरवठापाटबंधारे विभागाच्या लघु तसेच मोठ्या जलाशयातून वर्धा जिल्ह्यासह चंद्रपूर जिल्ह्यातील काही भागाला पाणीपुरवठा केला जातो. पिंपरी मेघे व १३ गावे पाणीपुरवठा योजनांतर्गत धाम प्रकल्पातून पाणीपुरवठा केला जातो. तसेच महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, वर्धा, व्यवस्थापन मध्य रेल्वे वर्धा, उत्तम व्हॅलू स्टील लिमिटेड, वर्धा, नगरपरिषद वर्धा, ग्रामपंचायत पवनार, ग्रामपंचायत आंजी, बोर अभयारण्यातील एक हॉटेल, विश्रामगृह बोर धरण, मत्स्य बीज केंद्र व एवोनिथ मेटॅलिक्स वर्धा यांना जीवन प्राधिकरण यांच्याकडून पाणीपुरवठा केला जातो.

२५.३७ कोटींची थकबाकी आस्थापनांकडे बाकीपाटबंधारे विभागाची जिल्ह्यातील ग्रामपंचायत, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, वर्धा पालिका, तसेच उद्योग आस्थापनांकडे तब्बल २५ कोटी ३७लाख ४० हजारांची थकबाकी आहे. या थकबाकीमुळे कालवे दुरुस्तीसह अन्य कामे रखडली असल्याचे पाटबंधारे विभागाच्या वतीने सांगण्यात आले आहे. 

सर्वांत जास्त थकबाकीमदन प्रकल्पामधून जामणी येथील मानस अॅग्रो अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड यांना पाणीपुरवठा केला जातो. परंतु, सदर कंपनीने जीवन प्राधिकरणाचे ३१ जानेवारी २०२५ पर्यंत १७ कोटी ६६ लाख २९ हजार रुपये थकविले आहेत.

पाणी उचल करणारी यंत्रणा                                                   थकबाकीपिपरी मेघे व तेरा गावे पाणी पुरवठा योजना                             ६२ लाख ५३ हजारमहाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ                                    २५ लाख ५२ हजारनगर परिषद वर्धा                                                                    ५ कोटी ७३ लाखग्रामपंचायत पवनार                                                                 ४ लाख ५९ हजारग्रामपंचायत आंजी                                                                   १ लाख ९ हजारमानस अॅग्रो इंड अॅन्ड इन्फ्रास्ट्रक्चर लि., जामणी                   १७ करोड ६६ लाख १९ हजारमे. बिल्ट ग्रॉफीक्स पेपर मिल बल्लारशहा                                  ५८ लाख ३९ हजारनगर परिषद राजुरा                                                                 २५ हजारहॉटेल अरण्यक बोरधरण                                                         ५७ हजारविश्रामगृह बोर धरण                                                                ८६ हजारमत्स्य बीज केंद्र                                                                       १० लाख १४ हजारएवोनिथ मेटॅलिक्स लि., वर्धा                                                    ३२ लाख ७६ हजार

टॅग्स :zpजिल्हा परिषदTaxकरWaterपाणीwardha-acवर्धा