शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दिकी हत्याप्रकरणात डोंबिवली कनेक्शन समोर; शुटर्सपर्यंत पोहचवले शस्त्र
2
CSMT कडे जाणाऱ्या लोकलचा डब्बा घसरला; कल्याण रेल्वे स्थानकातील घटना
3
पक्षात एंट्री अन् १२ दिवसांतच लॉट्री; शरद पवारांकडून हर्षवर्धन पाटलांवर महत्त्वाची जबाबदारी!
4
MVA Seat Sharing: महाविकास आघाडीत धुसफूस; २८ जागांचा नेमका वाद काय?
5
योजनादूतांसाठी महत्त्वाची बातमी: काम नाही अन् पगारही मिळणार नाही, कारण...
6
"संजय राऊत उद्धव ठाकरेंपेक्षा मोठे असतील, त्यांना..."; राऊतांवर बरसले, पटोले काय म्हणाले?
7
लेटर'बॉम्ब'नंतर शरद पवारांची भेट भोवली, आ. सतीश चव्हाणांचे राष्ट्रवादीतून 6 वर्षांसाठी निलंबन
8
सलमान खानने खरेदी केली बुलेट प्रूफ कार, बिश्नोई टोळीच्या धमक्यांमुळे सुरक्षेत वाढ
9
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा दावा खरा ठरणार?; मविआत वादाची ठिणगी, टोकाची भूमिका
10
महायुतीचं जागावाटप होणार फायनल? शिंदे, फडणवीस, पवारांची दिल्लीत शाहांसोबत बैठक
11
महाविकास आघाडीने मुख्यमंत्री ठरविण्यापेक्षा विरोधीपक्ष नेता ठरवावा, एकनाथ शिंदेंनी लगावला टोला
12
असा हा लपंडाव! मास्क लावून भाजपचा आमदार शरद पवारांच्या भेटीसाठी गेला, पण कॅमेरे दिसताच...
13
'मला सिल्लोडमधून शिवसेनेचा (UBT) आमदार पाहिजे', सत्तारांविरोधात ठाकरेंचा उमेदवार कोण?
14
IND vs NZ 1st Test Day 3 Stumps : शेवटच्या चेंडूवर 'विराट' विकेट; सर्फराज 'नॉट आउट', आता...
15
दिवाळीची शॉपिंग करताय? 'या' क्रेडिट कार्ड्सवर मिळतेय बंपर ऑफर्स आणि कॅशबॅक...
16
Baba Siddique : बाबा सिद्दिकी यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई; आणखी ५ आरोपींना अटक
17
महाविकास आघाडीत कुरघोडी, जागावाटपावरून वाद; एक मित्रपक्ष बाहेर पडण्याच्या तयारीत
18
राजकीय हालचालींना वेग! अजितदादांना आणखी एक धक्का बसणार, 'या' आमदाराने शरद पवारांची भेट घेतली
19
'कासव'गतीनं नऊ हजारी पल्ला गाठणारा भारतीय फलंदाज ठरला किंग कोहली
20
"भाजप तरुणांचे भविष्य उद्ध्वस्त करतंय", PCS परिक्षेवरून प्रियांका गांधींचा योगी सरकारवर हल्लाबोल

पाण्याचा होणारा अपव्यय टळणार

By admin | Published: May 07, 2017 12:44 AM

स्थानिक ग्रा.पं. प्रशासनाच्यावतीने नळावर मिटर बसविण्याच्या कामाला वेग दिल्या जात असल्याने होणारा पाण्याचा अपव्यय टळणार आहे.

ग्रामपंचायत प्रशासनाकडून नळावर मीटर लोकमत न्यूज नेटवर्क सेवाग्राम : स्थानिक ग्रा.पं. प्रशासनाच्यावतीने नळावर मिटर बसविण्याच्या कामाला वेग दिल्या जात असल्याने होणारा पाण्याचा अपव्यय टळणार आहे. तसेच पाण्याच्या अतिवापरावर चाप बसणार आहे. नगर वासियांना नवीन नळ कनेक्शन देण्यात येणार असून होणारा पाण्याचा अपव्यय टळणार असल्याने उन्हाळ्यातील पाणी समस्येवर ग्रा.पं.प्रशासनाचे हे पाऊल रामबाण इलाज ठरणार असल्याचे सांगण्यात आले. ग्रा.पं. प्रशासनाने १४ व्या वित्त आयोग निधीतून नळावर मिटर बसविण्याचा निर्णय घेतला आहे. याची सर्व प्रथम अमलबजावणी आदर्शनगर मध्ये करण्यात आलेली आहे. २४७ मिटर बसविले आहे. काही लोकांनी विरोध दर्शविला. पण, लवकरच सर्वांना समान व आवश्यक पाणी मिळेल. काटकसरीने पाणी वापर व्हावा यासाठी मिटर लावण्यात येणार आहे असे ग्रा.पं. प्रशासनाच्यावतीने नागरिकांना सांगण्यात आले. ग्रामस्थांना मुबलग पाणी द्या अशी मागणी जुनीच होती. परंतु, विविध कारणांमुळे नगरवासीयांची उपेक्षा पुर्ण होत नव्हती. आदर्श नगरला नेहमीच झुलते माप देण्यात आल्याचाही आरोप होत होता. परंतु, यंदा आदर्शनगरला प्राधान्य देण्यात आले आहे. प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेंततर्गत पाणी देण्यात आले आहे. घरगुती नळ कनेक्शन देण्यात यावे, अशी मागणी रहिवासीयांची आहे. डिमांड भरण्याची तयारीही नागरिकांची आहे. सध्या तरी आदर्श व सेवाभावी नगरवांसीयांचा पाण्याचा प्रश्न सुटला असून दोन्ही नगरात बाराही महिने पाणी मिळणार का असा सवाल विचारला जात आहे. जुनी वस्ती व ऊगले ले-आऊट या भागाला जुन्या वस्तीतील जलकुंभातून पाणी पुरवठा केला जातो. उन्हाळ्याचे दिवस असल्याने विहीरींची पाणी पातळी दिवसेंदिवस खाली जात असून नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा असे आवाहन ग्रामपंचायत प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.