शहरं
Join us  
Trending Stories
1
"चूक मान्य करुन माफी मागा"; महात्मा फुलेंबाबत केलेल्या विधानावरुन सदावर्तेंचे उदयनराजेंना प्रत्युत्तर
2
'वक्फ कायद्याच्या नावाखाली लोकांना भडकवले जातेय, हिंदूंना घराबाहेर...'; मुर्शिदाबाद हिंसाचारावरून CM योगींचा हल्लाबोल
3
"डोक्याने क्रॅक आहेस का, मी मगासपासून..."; 'त्या' प्रश्नाने संयम सुटताच अजितदादांची तुफान फटकेबाजी
4
धक्कादायक! रेशन कार्ड बनवण्यासाठी गेली, वाटेतच होणाऱ्या पतीसमोर सामूहिक अत्याचार
5
RCB चा विजयी 'चौकार'! IPL ट्रॉफी विजेत्यांना घरात मात देण्याचा सेट केलाय खास पॅटर्न
6
"मृत्युदंड हा इस्लामचा भाग..."; ४ जणांना गोळ्या घालून मारल्यानंतर, काय म्हणाला तालिबान नेता?
7
₹8 वरून ₹81 वर पोहचला हा शेअर, 1 लाखाचे केले ₹10.20 लाख; गुंतवणूकदारांना केलं मालामाल
8
“मित्रांकडून पैसे उधार घेतले, कष्टाने पहिलं घर...”; ‘ते’ दिवस आठवून अभिनेता झाला भावुक
9
शेख हसीना यांच्या अडचणी वाढणार! त्यांच्यासह बहिणीवर कारवाई होणार, अटक वॉरंट जारी
10
Akash Anand : “मला पुन्हा पक्षात काम करण्याची संधी द्या...“; आकाश आनंद यांनी मागितली मायावतींची माफी
11
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या उपस्थितीत बौद्ध धम्माची दीक्षा घेणाऱ्या हरिदास टेंभूर्णे यांचे निधन
12
Virat Kohli Record : किंग कोहलीचा मोठा पराक्रम; अर्धशतकांच्या 'शंभरी'सह रचला नवा विक्रम
13
टोलमध्ये सर्वसामान्यांना दिलासा! ३ हजार रुपयांचा पास मिळणार; FASTag बाबतही अटी असणार
14
“काका लोकांना विश्वासात घ्यावं लागतं” शरद पवारांसोबत भेटीनंतर आज बारामतीत अजित पवार म्हणाले…
15
कधी काळी अफगाणिस्तानात लाखोंच्या संख्येने हिंदू राहत होते, तालिबानी सरकार आल्यानंतर किती उरले? जाणून धक्का बसेल
16
"देशातून चालते व्हा, नाहीतर..."; अमेरिकेत राहणाऱ्या परदेशी व्यक्तींसाठी नवीन नियम लागू
17
RR vs RCB : विराटकडून ही अपेक्षा नव्हती! पण त्याला कोण काय बोलणार? बॉलरची रिअ‍ॅक्शन बघाच (VIDEO)
18
मुर्शिदाबाद हिंसाचार प्रकरणात भाजपचा मोठा दावा; हिंदू घरे सोडून पळून गेले; आतापर्यंत १५० जणांना अटक
19
सनस्क्रीन नसेल तरी नो टेन्शन! उन्हापासून बचावासाठी देशी जुगाड; ‘हा’ आहे जबरदस्त सोपा उपाय
20
आमदाराच्या मुलाची दादागिरी; मंदिराचे दरवाजे उघडायला विरोध केल्याने पुजाऱ्याच्या मुलाला मारहाण

विदर्भाच्या माथ्यावरील दुष्काळाचा कलंक पुसायचा आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

By रवींद्र चांदेकर | Updated: April 13, 2025 20:56 IST

नळगंगा-वैनगंगा नदी जोड प्रकल्प महत्त्वाचा असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

वर्धा : विदर्भातील अनेक जिल्ह्यात दुष्काळसदृश स्थिती असते. सिंचनाची सुविधाही कमी आहे. राज्य शासनाने आता वैनगंगा-नळगंगा नदीजोड प्रकल्प हाती घेतला आहे. यातून विदर्भाच्या माथ्यावरील दुष्काळाचा कलंक पुसायचा आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

आर्वी येथे रविवारी ७२० कोटी रुपयांच्या विविध विकासकामांच्या ई-भूमिपूजन, लोकार्पणप्रसंगी ते बोलत होते. मंचावर पालकमंत्री डॉ. पंकज भोयर, खासदार अमर काळे, आमदार दादाराव केचे, आमदार सुमित वानखेडे. आमदार समीर कुणावार, आमदार राजेश बकाने, माजी खासदार रामदास तडस, जिल्हाधिकारी वान्मथी सी. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकरी अधिकारी जितीन रहमान, आदी उपस्थित होते. 

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, वैनगंगा-नळगंगा नदीजोड प्रकल्पावर एक लाख कोटी रुपयांचा खर्च होणार आहे. विशेष विमानाने संपूर्ण परिसराचे मॅपिंग आटोपले आहे. या प्रकल्पामुळे तब्बल ५५० किलोमीटरची नवीन नदीच तयार होणार आहे. नागपूर, वर्धा, अमरावती, यवतमाळ, वाशीम, बुलढाणा, आदी जिल्ह्यांतील शेतकरी, जनतेला त्याचा लाभ होणार आहे. ६२ टीएमसी पाणी मिळणार आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

८० टक्के शेतकऱ्यांना दिवसा मोफत १२ तास वीज

पंतप्रधान सूर्यघर योजनेमुळे अनेक घरे, अनेक गावे सौरऊर्जेकडे वळत आहेत. आर्वी तालुक्यातील नेरी (पुनर्वसन) हे गाव १०० टक्के सौरऊर्जामय झाले. सौर कृषी योजनेत पुढील काळात १६ हजार मेगावॉट वीज उपलब्ध होईल. परिणामी २०२६ च्या शेवटपर्यंत राज्यातील ८० टक्के शेतकऱ्यांना सिंचनासाठी दिवसा १२ तास मोफत वीज उपलब्ध होईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

नागपूरएवढेच वर्धा जिल्ह्यावर प्रेम

पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी मुख्यमंत्र्यांची नागपूर एवढेच वर्धा जिल्ह्यावर प्रेम असल्याचे सांगितले. त्यामुळेच त्यांनी सेवाग्राम, पवनार कृती आराखडा, जिल्हा बँकेला १६३ कोटींची मदत केल्याचे स्पष्ट केले. त्यांच्या नेतृत्वात जिल्ह्याचा विकास आता थांबणार नाही, असे सांगितले. आमदार सुमित वानखेडे यांच्या काम करण्याच्या हातोटीचे डॉ. पंकज भोयर यांनी कौतुक केले. यावेळी खासदार अमर काळे, आमदार दादाराव केचे, आमदार सुमित वानखेडे यांनी आपल्या मनोगतातून विविध मागण्या मुख्यमंत्र्यांसमोर मांडल्या. प्रास्ताविक जिल्हाधिकारी वान्मथी सी. यांनी केले.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसVidarbhaविदर्भ