शहरं
Join us  
Trending Stories
1
तणाव वाढला! जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीड, धाराशिवमध्ये बंदची हाक
2
शंभुराज देसाईंचा मध्यरात्री फोन अन् मनोज जरांगेंनी घेतले सलाईनद्वारे उपचार
3
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
4
"राजकारण असा धंदा जिथे सामान्यांच्या शिव्या..."; देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केली भावना
5
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
6
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: कोणत्याही प्रकारे अविचारी निर्णय करू नका
7
बीएसएफ जवानांची बस दरीत काेसळली; तिघांचा मृत्यू
8
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
9
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
10
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
11
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका
12
निवडणुकीपूर्वी दोघांनाही नवीन चिन्हे द्या; राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका
13
अमेरिकेत भेटलेल्या तरुणाच्या घरी पहाटेच पोहोचले राहुल गांधी; भारतातील बेरोजगारीला कंटाळून तरुणाने अमेरिकेत केली होती घुसखोरी
14
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; उद्या दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
15
एसटी बसला समाेरून धडकला ट्रक, सहा जणांचा मृत्यू; २० जण गंभीर जखमी, मृतांत तीन महिला
16
तिसऱ्या भिडूंच्या दंडबैठका; आघाडी अजून अपूर्ण
17
आयटीवाल्यांना पुढील वर्षी भरभरून पगारवाढ नाहीच; आघाडीच्या कंपन्या देणार ५ ते ८ टक्के वाढ
18
सणासुदीच्या तोंडावर तेल महागाईची चाहूल; अनेक जीवनावश्यक वस्तू चढ्या दराने
19
एसआरएतील इमारती म्हणजे उभ्या झोपड्याच, उच्च न्यायालय; प्रकल्प राबवताना अधिकारांचे उल्लंघन
20
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम

बांधकाम कामगार योजना मंडळासाठीच ‘कल्याणकारी’

By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2021 3:07 AM

कंत्राटदारांचं चांगभलं : आधी वाटल्या पेट्या; आता वाटणार आहेत ताटवाट्या

- आनंद इंगोलेवर्धा : महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडून नोंदणीकृत कामगारांना वर्षभरापूर्वी सुरक्षा किट असलेल्या लोखंडी पेट्यांचे वितरण करण्यात आले. त्यानंतर आता ताटवाट्यांसह गृहोपयोगी वस्तूंचा संच वितरित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, वितरित केलेल्या पेट्यांची बाजारातील किंमत आणि मंडळाकडून कंत्राटदाराला दिलेल्या देयकातील किंमत यात मोठी तफावत दिसून आली आहे. हाच प्रकार आता गृहोपयोगी वस्तूंच्या वाटपातही होण्याची शक्यता असून, या योजना कामगारांपेक्षा मंडळ आणि कंत्राटदारांसाठीच ‘कल्याणकारी’ ठरत असल्याची ओरड होत आहे.गेल्या वर्षी राज्यभरात जवळपास २३ लाख कामगारांना तालुकास्थळी शिबीर लावून पेट्यांचे वितरण करण्यात आले. या पेटीतील साहित्याची बाजारातील किंमत चार ते पाच हजार रुपये आहे. परंतु, कंत्राटदाराला प्रतिपेटी १४ हजार रुपयांप्रमाणे देयक अदा केल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे. ऑनलाइन नोंदणी प्रक्रियेचेही खासगी कंपनीला कंत्राट दिले आहे. राज्यभरात केवळ १० लाख कामगारांचेच नूतनीकरण झाले. नूतनीकरण केल्यानंतर मिळणाऱ्या ओळखपत्राची बाजारातील किंमत पंधरा रुपये असताना त्यासाठी २५ रुपये दिले जात आहेत. आता गृहोपयोगी वस्तूंचा संच देण्याचे कंत्राट पेटी पुरवठा करणाऱ्या कंत्राटदारालाच दिले जाण्याची शक्यता आहे. नागपूरस्थित या कंत्राटदाराचे मंत्रालयापर्यंत कनेक्शन असल्याचे सांगण्यात येते.गृहोपयोगी वस्तू संचात काय मिळणार?गृहोपयोगी वस्तू संचात चार ताटे, आठ वाट्या, पाण्याचे चार ग्लास, तीन पातेली झाकणासह, दोन मोठे चमचे, एक पाण्याचा जग, सात भाग असलेला एक मसाला डबा, झाकणांसह तीन डबे, एक परात, कुकर, कढई आणि स्टीलची टाकी झाकणासह या वस्तुंचा समावेश आहे. कामगारांसाठीचे निर्णय आणि सद्यस्थिती घर बांधण्याकरिता प्रत्येकी दोन लाख रुपये. - तीन वर्षांत एकाही कामगाराला लाभ मिळाला नाही.  मुलीच्या विवाहासाठी ५० हजार रुपये. - शासनाने अद्यापही मंजुरी दिली नाही.