शहरं
Join us  
Trending Stories
1
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
2
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
3
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
4
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
5
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
6
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
7
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
8
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
9
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
10
साता जन्माची साथ ८ दिवसांत सुटली; नववधू बॉयफ्रेंडसोबत पसार, नवऱ्याची शोधण्यासाठी वणवण
11
“महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा करून एकत्र निर्णय बसून घेऊ”; अजित पवारांनी केले स्पष्ट
12
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
13
नवा ट्विस्ट! "पवन सिंहला धमकी दिली नाही, जे करतो ते..."; लॉरेन्स बिश्नोई गँगचा ऑडिओ व्हायरल
14
शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत राहुल गांधी आणि गौतम अदानी आले आमने-सामने, त्यानंतर घडलं असं काही...
15
Lionel Messi : Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
16
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
17
“महाराष्ट्र विधानपरिषद देशासाठी आदर्श”; विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे कौतुकोद्गार
18
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
19
Mamata Banerjee : "मी माफी मागते"; मेस्सीच्या कार्यक्रमातील गोंधळ पाहून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी नाराज
20
H-1B व्हिसाच्या नव्या नियमांवरुन ट्रम्पच गोत्यात, वॉशिंग्टन ते कॅलिफोर्नियापर्यंत १९ राज्यांनी कोर्टाचा दरवाजा ठोठावला
Daily Top 2Weekly Top 5

पांढरे सोने निकषात बसलेच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2019 21:12 IST

खरीप हंगामात जिल्ह्यातील शेतकरी ज्वारी, सोयाबीन, तूर आणि कापसाचे मोठ्या प्रमाणात उत्पन्न घेतात. अनेक कपाशी उत्पादकांनी यंदा विम्याचे कवच घेतले होते. शिवाय काही कपाशी उत्पादक शेतकऱ्यांचे निसर्गाच्या लहरीपणामुळे नुकसानही झाले.

ठळक मुद्देपीक विम्याचे वास्तव : ८१० नुकसानग्रस्तांना ४२.९४ लाख

महेश सायखेडे।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : खरीप हंगामात जिल्ह्यातील शेतकरी ज्वारी, सोयाबीन, तूर आणि कापसाचे मोठ्या प्रमाणात उत्पन्न घेतात. अनेक कपाशी उत्पादकांनी यंदा विम्याचे कवच घेतले होते. शिवाय काही कपाशी उत्पादक शेतकऱ्यांचे निसर्गाच्या लहरीपणामुळे नुकसानही झाले. असे असले तरी विम्याचे कवच घेतलेल्या नुकसानग्रस्त कपाशी उत्पादकांचे झालेले नुकसान उंबरठा उत्पन्ना पेक्षा कमी उत्पन्न या निकषात बसलेच नाही. परिणामी एकाही कपाशी उत्पादकाला झालेल्या नुकसानीपोटी विमा कंपनीने आर्थिक मदत दिलेली नाही.निसर्गाच्या लहरीपणामुळे शेती हा व्यवसाय तोट्यात आला आहे. अशातच प्रत्येक शेतकऱ्याने शेती करताना पीक विम्याचे कवच घ्यावे असे कृषी तज्ज्ञ सांगतात. २०१८-१९ या आर्थिक वर्षातील खरीप हंगामात ३७ हजार २८८ शेतकऱ्यांनी पीक विम्याचे कवच घेतले होते. त्यापैकी उंबरठा उत्पन्नापेक्षा कमी उत्पन्न या निकषावर जिल्ह्यातील ८१० नुकसानग्रस्त शेतकरी पीक विम्याच्या नुकसानभरपाई पोटी मिळणाऱ्या रक्कमेसाठी पात्र ठरले आहेत. या शेतकऱ्यांना बँक खात्यात लवकरच एकूण ४२ लाख ९४ हजार ९७९ रुपयांची रक्कम वळती केली जाणार आहे. जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांसह कृषी विभागाच्या आवाहनाला केंद्रस्थानी ठेऊन २०१८-१९ या आर्थिक वर्षातील खरीप हंगामात जिल्ह्यातील एकूण ३७ हजार २८८ शेतकऱ्यांनी पीक विम्याचे कवच घेतले. सदर शेतकºयांना १६८ कोटी ७७ लाख ९८ हजार ६९७ रुपयांपर्यंच्या नुकसानीचे कवच देण्यात आले होते. हंगामाच्या शेवटी कृषी विभागाच्या सर्वेक्षणाअंती उंबरठा उत्पन्ना पेक्षा कमी उत्पन्न या निकषाच्या आधारावर नुकसानग्रस्त ८१० शेतकरी योजनेच्या लाभासाठी पात्र ठरले. त्यांना एकूण ४२ लाख ९४ हजार ९७९ रुपयांची रक्कम विमा कंपनीकडून देण्यात येणार आहे.व्यक्तिगत नुकसानीचे नऊ अर्जखरीप हंगामात व्यक्तीगत नुकसान झाल्याच्या एकूण ९ तक्रारी कृषी विभागाला प्राप्त झाल्या आहेत. सदर तक्रारी कृषी विभागाने पंचनामा करून विमा कंपनीकडे पाठविल्या आहेत. या नुकसानग्रस्तांना नुकसानीपोटी मिळणारी रक्कम अद्यापही निश्चित झाली नसून लवकरच ही आणि इतर प्रक्रिया पूर्ण करून नुकसानग्रस्तांना आर्थिक मोबदला देण्यात येणार आहे. यात देवळी व हिंगणघाट येथील नुकसानग्रांचा समावेश आहे.लीड बँकेकडे वळती झाली रक्कमाुकसानग्रस्त ८१० शेतकºयांना नुकसानीपोटी द्यावयाची रक्कम विमा कंपनीने लीड बँकेकडे वळती केली आहे. लीड बँक आता ही रक्कम इतर बँकेकडे वळती करणार असून सदर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर नुकसानग्रस्त शेतकºयांच्या बँक खात्यात नुकसानभरपाई पोटीची रक्कम टाकली जाणार आहे.रबीत २,२०० शेतकऱ्यांनी घेतले विमा कवचखरीप हंगामात ३७ हजार २८८ शेतकºयांनी पीक विमा काढला होता. तर रबी हंगामात २ हजार २०० शेतकºयांनी पीक विम्याचे कवच घेतले होते.उंबरठा उत्पन्नापेक्षा कमी उत्पन्न या निकषावरून विमा कंपनीने ८१० शेतकऱ्यांना झालेल्या नुकसानभरपाईपोटी ४२ लाख ९४ हजार ९७९ रुपये देण्याचे निश्चित केले आहे. शिवाय ही रक्कम लिड बँकेकडे वळती केली आहे.- विद्या मानकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी,वर्धा.

टॅग्स :cottonकापूस