शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

पांढऱ्या सोन्याचे भाव अद्यापही स्थिरावलेलेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2018 23:58 IST

अस्मानी व सुलतानी संकटाचा सामना सातत्याने करावा लागत असलेला शेतकरी दरवर्षी खरीप व रब्बी हंगामातील शेतमालाला चांगला भाव मिळेल, ही आशा बाळगून असतो. यावर्षी तरी कापसाचे भाव वाढतील, अशी आशा सुरुवातीला होती, पण ५४०० वर भाव स्थिरावल्याने कापूस उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे.

ठळक मुद्देशेतकरी द्विधा मनस्थितीत : ठोस निर्णयाकडे लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कघोराड : अस्मानी व सुलतानी संकटाचा सामना सातत्याने करावा लागत असलेला शेतकरी दरवर्षी खरीप व रब्बी हंगामातील शेतमालाला चांगला भाव मिळेल, ही आशा बाळगून असतो. यावर्षी तरी कापसाचे भाव वाढतील, अशी आशा सुरुवातीला होती, पण ५४०० वर भाव स्थिरावल्याने कापूस उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. कापसाच्या भाववाढीची तो प्रतीक्षा करीत आहे.कापूस खरेदीच्या मुहूर्ताला व्यापाऱ्यांनी ५८०० ते ९०० असा भाव दिल्याने कापूस ६००० च्या वर जाईल, अशी आशा होती, पण दिवाळीचा सण आणि कापसाची वेचणी एकाचवेळी आल्याने शेतकऱ्यांजवळ कापूस वेचणीची मजुरी देण्यासाठी पैशाची चणचण असल्याने मिळेल त्या भावात कापूस विकावा लागला. यावर्षी पाऊस वेळेवर आला नसल्याने तसेच शेतातील विहिरीला असलेली पाणीपातळी कमी झाल्याने कोरडवाहू तसेच बागायती शेतातील कपाशीचे पिकाचे उत्पादन घटले. अशा परिस्थितीत कापसाला भाव चांगला मिळेल, अशी आशा कापूस उत्पादक शेतकºयांना होती. अच्छे दिन येण्याचे स्वप्न दाखविणाºयांनासुद्धा शेतमालाला मिळणारा भाव खरेच परवडणारा आहे का, याकडे लक्ष देण्यास वेळ नाही. हमीभावापेक्षा कमी दराने शेतमाल खरेदी करणाºयांवर कारवाई करू, अशा वल्गना करणारे राजकीय नेते शेतमालाला भाव कमी मिळत असताना गप्प आहेत. त्यामुळे अस्मानी संकट आले तर ते मान्य, पण सुल्तानी संकट कायमच असल्याने आच्छे दिनाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना कापसाच्या भाववाढीची प्रतीक्षा करावी लागत आहे कापूस वेचणीस मजूर मिळेना, कापूस वेचणी महागली, अशात भाव उतरत आहे. कापसाची प्रत चांगली नसल्याने भावात घसरण झाल्याचे बोलले जात आहे. दरवर्षी कापसाचे पीक परवडणार नाही, तर युवा शेतकरी शेती व्यवसायापासून दूर जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. कापसाचे स्थिर भाव कापूस उत्पादकांच्या पथ्यावर पडत आहे. नवीन वर्षात तरी कापसाचे भाव वाढतील, ही आशा शेतकऱ्यांना असल्याने तूर्तास कापूस विक्री थांबविण्याचे धोरण अवलंबिल्याचे दिसत आहे. उत्पादन खर्चावर भाव हे मृगजळ ठरत असताना बोंडअळीच्या अनुदानासाठी शेतकरी बँकेच्या पायºया वर्षभरापासून झिजवत आहे. कर्जमाफीपासून शेतकरी अद्याप दूर असल्याने चर्चेतून नाराजीचा सूर ऐकायला मिळत आहे.राजकीय पुढारी मौन बाळगूनअच्छे दिन येण्याचे स्वप्न दाखविणाºयांना सद्यस्थितीत शेतमालाला मिळत असलेला भाव खरेच परवडणारा आहे का, याकडे लक्ष देण्यास वेळ नाही. शेतमालाची हमीभावापेक्षा कमी दराने खरेदी करण्यात आली तर कारवाई करू, अशा वल्गना करणारे राजकीय पुढारी आज शेतमालाला कमी भाव मिळत असताना मौन बाळगून आहेत. कुणी वालीच नसल्याने दाद तरी कुणाकडे मागायची, असा पश्न शेतकरीवर्गातून उपस्थित केला जात आहे.

टॅग्स :cottonकापूस