शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

१५ दिवसातच पडले भगदाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2018 23:47 IST

शहरातील बॅचलर रस्त्याचे काम सुरू झाले त्या वेळेपासून तो वादात आहे. सध्या या रस्त्याच्या कडेला असलेल्या नाल्यांचे बांधकाम सुरू आहे. काही भागात नाल्या बांधून त्यावर स्लॅब टाकण्यात आला; याला १५ दिवसांचा कालावधी झाला असून याच काळात या स्लॅबला भगदाड पडले आहे.

ठळक मुद्देबॅचलर रोड ठरतोय सदोष बांधकामाचा उत्तम नमुना

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शहरातील बॅचलर रस्त्याचे काम सुरू झाले त्या वेळेपासून तो वादात आहे. सध्या या रस्त्याच्या कडेला असलेल्या नाल्यांचे बांधकाम सुरू आहे. काही भागात नाल्या बांधून त्यावर स्लॅब टाकण्यात आला; याला १५ दिवसांचा कालावधी झाला असून याच काळात या स्लॅबला भगदाड पडले आहे. यामुळे हा रस्ता आता सदोष कामाचे एक जिवंत उदाहरण ठरत आहे.बांधकाम विभागामार्फत होत असलेल्या कामाचा दर्जा उत्तम असल्याचे शासनाच्यावतीने सांगण्यात येते. येथे मात्र त्याचे कुठेही दर्शन होत नाही. रस्त्याच्या कामाच्या प्रारंभीपासूनच नागरिकांच्या तक्रारी झाल्या आहेत. यात आमदारांकडूनही या रस्त्याची पाहणी करण्यात आली. त्यांनी मध्यंतरी या रस्त्याच्या कामाबाबत नाराजी व्यक्त केली. शिवाय रस्त्याच्या कामाकरिता कंत्राटदाराला दंड ठोठावण्याची मागणी केली. नंतर हे प्रकरण शांत झाले.सध्या या रस्त्याच्या शेजारी असलेल्या नाल्यांचे बांधकाम सुरू आहे. ते करताना नाल्यांच्या खाली साधे बेड कॉक्रीट ही टाकण्यात आले नसल्याचे या भागातील नागरिकांकडून सांगण्यात येत आहे. तशा तक्रारी बांधकाम विभागाकडे करण्यात आल्या आहेत. मात्र अधिकाऱ्यांकडून त्याची साधी पाहणीही करण्यात आली नाही. कालांतराने या नाल्या जमिनीत दबून साचलेल्या पाण्याचा नागरिकांना त्रास होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे बांधकाम विभागाने याची वेळीच दखल घेण्याची गरज आहे.नाली बांधकाम करून नागरिकांना त्यांच्या घरासमोर या नालीवर स्लॅब टाकण्यात येत आहे. वर्धेचे नगराध्यक्ष यांच्या घरासमोर असलेल्या नालीवरही तसाच स्लॅब टाकण्यात आला. शनिवारी सकाळी या स्लॅबला अचानक भगदाड पडले. विशेष म्हणजे या कामाला केवळ १५ दिवसांचा कालावधी झाला आहे. एवढ्या कमी दिवसात अशी वेळ आल्याने या कामांचा दर्जा कसा असेल याचा अंदाज करणेही कठीण झाले आहे.शहरात झालेली कामे कालांतराने नगर परिषदेला हस्तांतरीत करण्यात येणार आहे. मग अशी दर्जा नसलेली कामे त्यांच्या माथी मारल्यास त्याची डागडुजी करण्याची वेळ या यंत्रणेवर येणार आहे. यामुळे पालिकेने ही कामे हस्तांतरीत करताना काय करावे असा प्रश्न निर्माण होत आहे. शहरातील एका रस्त्याची नाही तर संपूर्ण कामांची हीच अवस्था आहे. यामुळे बांधकाम विभागाच्या कामांवर आता नागरिकांनी विश्वास ठेवावा अथवा नाही असा प्रश्न निर्माण झाला असून याकडे लक्ष देण्याची मागणी आहे. मुख्यमंत्री, पालकमंत्री यांनी बांधकामाच्या दर्जाबाबत जाहीर वक्तव्य केले परंतु त्याचा परिणाम येथे दिसत नाही.बांधकाम विभागाकडून कामांना मंजुरी मिळून निघताहेत देयकेशहरात विकास कामांच्या नावावर रस्ते आणि नाल्यांचीच कामे होत आहेत. केवळ एक बॅचलर रोड नाही तर शहरातील काही मोठ्या रस्त्यांची कामे जोरात सुरू आहे. असे असले तरी कामांच्या दर्जाचा प्रश्न निर्माण झाला आहे. विकास कामांवर कोट्यवधी रुपचे खर्च होत असून यातून दर्जाहिन कामे होत असल्याचे दिसून आले आहे. याचा विचार होणे गरजेचे आहे. शहरात झालेल्या आणि सुरू असलेल्या प्रत्येक कामांच्या दर्जाची तपासणी वरिष्ठ पातळीवर करण्याची मागणी आता वर्धेकर नागरिकांकडून सुरू झाली आहे. या मागणीनुसार कार्यवाही गरजेची आहे.शहरात भाजपा शासनाच्या काळात मोठ्या प्रमाणात विकास कामे सुरू आहेत. या कामांत रस्ते नाल्या, आदी कामांचा समावेश आहे. ही सर्व कामे नागरिकांकरिता आहे.पण बांधकाम विभागाच्यावतीने होत असलेल्या कामांचा दर्जा ढासळला जात आहे. अशी कामे पालिकेला हस्तांतरीत करण्यात येईल. मग पालिकेने काय याची डागडुजीच करावी काय, या कामांबाबात नागरिकांकडून अनेकवेळा तक्रारी झाल्या पण त्यावर कार्यवाही झाली नाही. बांधकाम विभाग आणि कंत्राटदाराला नेमके कोणाचे पाठबळ आहे. हे कळण्या पलिकडचे आहे.- अतुल तराळे, नगराध्यक्ष वर्धा

टॅग्स :pwdसार्वजनिक बांधकाम विभाग