शहरं
Join us  
Trending Stories
1
जॉन सीनाने शेवटचा सामना 'मुद्दाम' गमावला? गुंथरकडून पराभव, रिंगला किस करून घेतला WWE चा निरोप...
2
सुदानमध्ये संयुक्त राष्ट्राच्या तळावर क्रूर ड्रोन हल्ला; ६ बांगलादेशी पीसकीपर्स ठार, ८ गंभीर जखमी; युनो महासचिवकडून तीव्र निषेध
3
जॅकपॉट अन् खजिना...! महाराष्ट्राच्या शेजारील राज्यात सापडले सोने, लिथिअम आयनचे साठे; खोऱ्याने पैसा ओढणार...
4
चोरी केल्यानंतर ते शिर्डी गाठायचे, साईबाबांच्या चरणी 'दान' ठेवायचे! काळाचौकी पोलिसांची २४ तासांत कारवाई; दोन तरुण चोर जेरबंद
5
वर्सोवा-भाईंदर कोस्टल प्रकल्पासाठी ४५ हजार खारफुटी तोडणार; हायकोर्टाचा हिरवा झेंडा
6
अमेरिकेतील ब्राउन युनिव्हर्सिटीत अंतिम परीक्षांदरम्यान गोळीबार; २ मृत, ८ गंभीर जखमी, हल्लेखोर पसार
7
पतीकडूनच सर्पदंश करवून पत्नीची हत्या, ब्रेन हॅमरेजने मृत्यू झाल्याचा बनाव; तिघांना अटक
8
मुंबईच्या फनेल झोनमधील इमारतींच्या पुनर्विकासासाठी 'हाउसिंग फॉर ऑल' योजना
9
मुंबईत महायुतीचाच महापौर होणार, मुख्यमंत्र्यांचा दावा! जागावाटपावर फडणवीस यांचे स्पष्टीकरण
10
पीएचडी शिष्यवृत्तीला आता शिस्तीची चौकट; अर्थ खात्याकडून पैसे न मिळाल्याने शिष्यवृत्तीची रक्कम रखडली!
11
सर्व्हेसाठी गेलेल्या अधिकाऱ्यांवर जमावाकडून दगड आणि धनुष्यबाणांद्वारे हल्ला, ४७ जण जखमी   
12
आजचे राशीभविष्य - १४ डिसेंबर २०२५, कार्य साफल्याचा दिवस, नवे काम सुरू कराल
13
राज्यातील सर्व २९ महापालिकांची निवडणूक होणार एकाच टप्प्यात! ५० टक्के आरक्षण मर्यादेचा अडसर नाही
14
आश्रम हल्ला प्रकरणातील एकमेव आरोपीची तब्बल ३४ वर्षांनंतर सुटका; काय होते नेमके प्रकरण?
15
ट्रम्प यांच्या टॅरिफला अमेरिकेतच विरोध; भारतावरील ५०% टॅरिफ रद्द करण्याचा प्रस्ताव
16
कोलकात्यात मेस्सी आला अन्... संतप्त चाहत्यांनी खुर्च्यांचाच फुटबॉल केला!
17
डोंबिवलीत पाच वर्षांनंतर पुन्हा गुलाबी रस्ता; प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर
18
चार्टर्ड प्लेनमधील 'त्या' प्रवासामुळे भाजपच्या नेत्यांना वरिष्ठांचे फटके!
19
दिसते तसे नसते... म्हणूनच जग फसते! भाजप-शिंदेसेनेच्या भांडणामागचे आणि युतीमागचे 'राजकारण'
20
गायत्री दातारच्या आयुष्यात हिरोची एन्ट्री! अभिनेत्रीने गुपचूप केला साखरपुडा, फोटो समोर
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात निधीअभावी रखडले तब्बल 22 ग्रामीण रस्त्यांचे काम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2022 05:00 IST

जिल्ह्यातील आठ तालुक्यांत पाच वर्षांत विविध योजनांतर्गत  ९९ ग्रामसडक निर्मितीच्या कामाला मंजुरी देण्यात आली आहे. त्यापैकी ७७ रस्त्यांची कामे पूर्ण झाल्याचे सांगितले जात असले तरी निधीअभावी तब्बल २२ रस्त्यांच्या कामाचा साधा श्रीगणेशाही झालेला नाही. परिणामी या २२ मार्गांवरून वाहनचालकांसह नागरिकांना ये-जा करण्यासाठी तारेवरची कसरतच करावी लागत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : गांधी-विनोबांची कर्मभूमी राहिलेल्या वर्धा जिल्ह्यात सेवाग्राम विकास आराखड्यांतर्गत विविध विकासकामे पूर्णत्त्वास जात असले तरी याच जिल्ह्याला शासनाकडून मुबलक आणि वेळीच निधी मिळत नसल्याने आता ग्रामीण रस्ते गुळगुळीत होण्याच्या कामालाच ब्रेक लागला आहे. मागील पाच वर्षांत विविध योजनांतर्गत एकूण ९९ ग्रामसडक निर्मितीच्या कामांना मंजुरी देण्यात आली आहे. परंतु, निधीअभावी तब्बल २२ ग्रामीण रस्त्यांचे कामच रेंगाळे असल्याचे वास्तव आहे.जिल्ह्यातील आठ तालुक्यांत पाच वर्षांत विविध योजनांतर्गत  ९९ ग्रामसडक निर्मितीच्या कामाला मंजुरी देण्यात आली आहे. त्यापैकी ७७ रस्त्यांची कामे पूर्ण झाल्याचे सांगितले जात असले तरी निधीअभावी तब्बल २२ रस्त्यांच्या कामाचा साधा श्रीगणेशाही झालेला नाही. परिणामी या २२ मार्गांवरून वाहनचालकांसह नागरिकांना ये-जा करण्यासाठी तारेवरची कसरतच करावी लागत आहे. कोविड संकट काळात शासनाच्या अनेक योजनांच्या निधीला राज्य शासनाकडून कात्रीच लावण्यात आली होती. शिवाय आरोग्य विषयक कामांसाठी निधी उपलब्ध करून देण्यात आला हाेता. यामुळेही ही कामे रखडल्याचे सांगण्यात आले.

९९ कामांना मिळाली मंजुरी-   ग्रामीण भागातील दळण-वळण सोयीस्कर व्हावे. शिवाय ग्रामीण भागातील नागरिकांसाठी गुळगुळीत रस्त्यांची सोय व्हावी, या हेतूने मुख्यमंत्री ग्रामसडक योजना, पंतप्रधान ग्रामसडक योजना तसेच जिल्हा वार्षिक निधीतून ९९ कामांना मंजुरी देण्यात आली आहे.

मुदत वाढीसाठी पाठविला प्रस्ताव-   आर्थिक वर्ष २०१७-१९ या वर्षातील २२ कामे अद्याप अपूर्ण आहेत. मुदत संपल्याने वाढीव मुदतीसाठी प्रस्ताव पाठविण्यात आल्याचे सांगण्यात आले.

कोरोनामुळे लागला ब्रेक-   कोरोना काळात येळाकेळी येथील स्टोन क्रशर मशीन सील करण्यात आली. त्यामुळे कामात वापरण्यात येणारी गिट्टी मिळत नव्हती. वेळीच वाळू घाटाचे लिलाव न झाल्याने वाळूचा तुटवडा पडला होता. कोरोनामुळे जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे राज्याबाहेरील मजूर आपल्या मूळ गावी परतले. यांसह कोरोनामुळे या कामांना ब्रेक लागल्याचे सांगण्यात येते.

शहर विकासासाठी करोडो रुपया खर्च केला जातो. मात्र, ग्रामीण भागाचा आम्ही विकास करू, अशी राजकीय पुढाऱ्यांची आश्वासने नेहमीच फोल ठरतात. ग्रामीण रस्त्यांच्या कामासाठी शासनाकडून मुबलक निधी खेचून आणण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींनी विशेष प्रयत्न केले पाहिजे.- निलकमल आखूड, सोनेगाव (बाई).

टॅग्स :Sewagramसेवाग्राम