शहरं
Join us  
Trending Stories
1
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
2
"Today I say to the whole world..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
3
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
4
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
5
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
6
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
7
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
8
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
9
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
10
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
11
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
12
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
13
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
14
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
15
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
16
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
17
मायेची फुंकर! ब्रेकअप, स्ट्रेस, रागावर फक्त एकाच थेरपीने उपचार, उशी ठरतेय वेदनांवरची डॉक्टर
18
सलग ७ दिवसांच्या वाढीला ब्रेक! एफएमसीजी आणि रिअल्टीमुळे बाजार कोसळला; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
19
WhatsApp वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी! अ‍ॅडव्हान्स्ड चॅट प्रायव्हसी फीचर आले, कसे वापरायचे जाणून घ्या
20
मुंबई: 'लिव्ह इन पार्टनरने दिला गुलिगत धोका; ज्याच्यावर जडला जीव तोच सोन्याचे दागिने घेऊन फरार

अबब! दारूबंदी असलेल्या जिल्ह्यात ६.२५ कोटींचा दारूसाठा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2022 12:01 IST

शहरासह जिल्ह्यात अनेक ठिकाणी खुलेआम दारूविक्री केली जात असल्याचे दिसून येते. अनेकदा पोलीस कारवाई करतात. मात्र, कठोर कायदा अंमलात न आल्याने अवघ्या काही वेळात दारूविक्रेत्याला जामीन मिळतो अन् पुन्हा तो दारूविक्रीसाठी सज्ज होतो.

ठळक मुद्देवर्धा जिल्ह्यात वर्षभरात कारवाईतीन हजारांवर दारू विक्रेत्यांना ठोकल्या बेड्या

चैतन्य जोशी

वर्धा :वर्धा जिल्ह्याला महापुरुषांचा वारसा लाभला असल्याने १९७४ मध्ये दारूबंदी करण्यात आली. मात्र, ही दारूबंदी केवळ नावालाच राहिली असून, गेल्या वर्षभराच्या कालावधीत पोलिसांनी तब्बल ६ कोटी २५ लाख ६२ हजार १६८ रुपयांचा देशी विदेशी दारूसाठा जप्त करुन गावठी दारूसाठा नष्ट केला आहे. त्यामुळे वर्ध्यातील दारूबंदी केवळ कागदावरच असल्याचे दिसते.

जिल्ह्यातील दारूविक्री रोखण्यासाठी अनेकांनी प्रयत्न केले. वर्धा, गडचिरोलीच्या धर्तीवर चंद्रपूरमध्येही दारूबंदी करण्यात आली होती. मात्र, चंद्रपूरची दारूबंदी उठल्यानंतर वर्ध्यातही याचे पडसाद उमटले अन् काही सामाजिक संघटनांकडून वर्ध्यातील दारूबंदी उठविण्याबाबतच्या हालचाली सुरू झाल्या. मात्र, वर्धा जिल्ह्याला गांधींचा, विनोबांचा वारसा लाभल्याने हे शक्य होऊ शकले नाही.

शहरासह जिल्ह्यात अनेक ठिकाणी खुलेआम दारूविक्री केली जात असल्याचे दिसून येते. अनेकदा पोलीस कारवाई करतात. मात्र, कठोर कायदा अंमलात न आल्याने अवघ्या काही वेळात दारूविक्रेत्याला जामीन मिळतो अन् पुन्हा तो दारूविक्रीसाठी सज्ज होतो. पंचाची फितुरी न्यायालयात आरोपी दारूविक्रेत्याला निर्दोष सोडण्यास फायदेशीर ठरते. यामुळेच दारूविक्रेत्यांचे मनसुबे वाढल्याचे दिसून येते. जिल्ह्यात अनेक पोलीस अधीक्षक येऊन गेले; पण दारूविक्री मात्र कायमस्वरुपी बंद झालेली दिसली नाही. त्यामुळे दारूबंदी जिल्ह्यात दारूविक्रेत्यांच्या मुसक्या आवळण्यासाठी कठोर कायदा करून स्थानबद्ध किंवा तडीपारीची कारवाई करण्याची नितांत गरज आहे.

न्यायालयात अनेक केसेस ‘पेंडिंग’

दारूविक्रेत्यांवर कारवाई केल्यानंतर गुन्हा दाखल केला जातो. त्यानंतर न्यायालयात प्रकरण दाखल केले जाते. एकट्या वर्धा जिल्ह्यात सुमारे सात ते आठ हजारांवर दारूविक्रेत्यांच्या केसेस पेंडिंग असल्याची माहिती आहे. याचे मुख्य कारण म्हणजे पंचांची फितुरी. त्यातच पकडलेल्या दारूच्या नमुन्यांचा अहवाल लवकर मिळत नाही. त्यामुळे न्यायालयाचा वेळही वाया जातो. याकडे लक्ष देण्याची गरज आहे.

एकतर खुली करा, अन्यथा बंद करा

जिल्ह्यात अनेक वर्षांपासून दारूविक्री सुरू आहे. अनेक दारूविक्रेते बनावट दारूची विक्री करतात. याचा विपरित परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होतो. त्यामुळे जर दारूविक्री होतेच आहे तर कायमस्वरुपी खुली करा, अन्यथा पूर्णपणे बंद करा, अशी मागणी विविध सामाजिक संघटनांकडून केली जात आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीliquor banदारूबंदीwardha-acवर्धाPoliceपोलिसalcohol prohibition actदारुबंदी कायदा