शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्येष्ठ साहित्यिका प्रा. डॉ. तारा भवाळकर यांची ९८ व्या अ.भा.म. साहित्य संमेलनाध्यक्षपदी निवड
2
"सरदार पटेलांचा पुतळा पूर्ण झाला पण..."; संभाजीराजे छत्रपतींनी स्पष्टच सांगितलं
3
Gold Investment: दागिने घेण्याऐवजी सोन्यामध्ये 'या' 5 प्रकारे करा गुंतवणूक; मिळेल भरपूर रिटर्न
4
पाक विरुद्ध हरमनप्रीत कौरनं खेळली 'ही' चाल; या खेळाडूची प्लेइंग इलेव्हनमध्ये एन्ट्री
5
संजय राऊतांना पवित्र करण्यासाठी अयोध्याला पाठवू; अब्दुल सत्तारांची बोचरी टीका
6
'भारत एक हिंदू राष्ट्र, आपल्या सुरक्षिततेसाठी...; सरसंघचालक मोहन भागवत यांचं हिंदूंना मोठं आवाहन
7
"स्मारकाच्या कामात स्थगिती आणणाऱ्या काँग्रेसच्या वकिलांचाही..."; संभाजीराजे छत्रपतींना फडणवीसांचा सल्ला
8
तिलक वर्मा की नितीश रेड्डी? मयंक यादव की रवी बिश्नोई? आकाश चोप्राने निवडली टीम इंडियाची Playing XI
9
तरुणाच्या आत्महत्येला मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री जबाबदार; मनोज जरांगेंनी काय दिला इशारा?
10
"..तर मी स्वतः पीएम नरेंद्र मोदींसाठी प्रचार करेन", अरविंद केजरीवालांचे मोठे वक्तव्य
11
Maharashtra Elections 2024: दादाजी भुसेंविरोधात उद्धव ठाकरेंचा उमेदवार ठरला!
12
चेंबूर आग दुर्घटनेची होणार सखोल चौकशी; मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ५ लाख देण्याची CM शिंदेंची घोषणा
13
सुवर्णसंधी! ONGC मध्ये 2 हजारांहून अधिक अप्रेंटिस भरती, स्टायपेंड किती मिळणार? पाहा...
14
Beed: चिमुरडीने फोटो बघितला अन् बलात्कारी शिक्षकाला पोलिसांनी केली अटक
15
Israel-Hamas war : हिजबुल्लाहने सेल्सगर्लवर विश्वास ठेवून केली चूक; झाला मोठा घात, इस्त्रायल १० वर्षापासून पेजरवर काम करत होते
16
अजित पवारांना बसणार मोठा झटका! 'तुतारी हाती घ्यायची का?', रामराजेंना कार्यकर्त्यांनी दिला 'होकार'
17
"पिझ्झा घेऊन पोलीस स्टेशनमध्ये जाता, ही मस्ती घरी दाखवायची"; सुप्रिया सुळेंची सुनील टिंगरेंवर जहरी टीका
18
"मोदींनी भाषण करण्यापूर्वी थोडा..."; संजय राऊतांनी पंतप्रधानांना पाटील, राठोडांवरून घेरलं
19
धक्कादायक! श्री रामची भूमिका साकारताना स्टेजवरच हृदयविकाराचा झटका, लाइव्ह परफॉर्मन्स दरम्यान मृत्यू झाला
20
गाझातील मशिदी आहेत 'हमासचा अड्डा'? इस्रायल बनवतोय निशाणा, एअर स्ट्राइकमध्ये अनेकांचा मृत्यू

वसई-विरार महापालिकेत २५ कोटींच्या औषधाचा घपला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 03, 2019 11:25 PM

प्रशासनाचे मौन : राजकुमार चोरघे यांचा महानगरपालिकेवर आरोप

नालासोपारा : वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या वैद्यकीय आरोग्य सेवेचा दर्जा सुधारण्यासाठी मोठ्या तरतुदी महानगरपालिकेकडून गेल्या ६ वर्षात करण्यात आल्या. पण आरोग्य सेवेसाठी हॉस्पिटलमध्ये रुग्णांना देण्यासाठी मागविण्यात आलेल्या करोडो रुपयांच्या औषधांचा काळाबाजार झाला असून या औषधांचे २५ कोटी कोणाच्या घशात गेले असा सवाल राजकुमार चोरघे यांनी केला आहे. वसई विरार महानगरपालिकेचा आरोग्य विभाग किटकनाशके आणि औषधांवर करोडो रूपये खर्च करत असून हा खर्च फक्त कागदोपत्रीच असल्याचे पुन्हा एकदा उघड झाले आहे.

महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात वसई येथील सर डी.एम.पेटिट रुग्णालय, नालासोपारा येथील नगीनदास पाडा येथील रुग्णालय, नालासोपारा व सातीवली येथील माता बाल संगोपन केंद्र आणि इतर आठ दवाखान्यामार्फत आरोग्य सेवा दिली जाते. डॉक्टरांची कमतरता, औषधांची उणीव आणि तुटपुंजी उपकरणे यामुळे आरोप आणि विवादामध्ये असणाऱ्या वसई विरार शहरातल्या महानगरपालिकेच्या रुग्णालयात गेल्या ६ वर्षात २५ करोड ३५ लाख ६६ हजार रुपये औषधांसाठी खर्च झाले आहेत. मात्र हा खर्च कागदावरच मर्यादित असून त्या रकमेचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करण्यात येत आहे.

प्रत्यक्षात वसई-विरार मनपाच्या आरोग्य विभागाने नागरिकांच्या आरोग्यासाठी खरोखरच औषधांवर खर्च केला आहे का ? हा प्रश्न स्थानिक नागरिकांच्या मनात येत असून याची चौकशी करावी, अशीही मागणी आता जोर धरु लागली आहे. याबाबत महानगरपालिकेच्या वैद्यकीय आरोग्य अधिकारी तब्बस्सूम काझी यांच्याशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही. मुख्यमंत्र्यांनी लोकसभा निवडणूकीत घोषित केल्याप्रमाणे एसआयटीकडून याची चौकशी करावी अशी मागणी होते आहे.

कोणत्या साली कितीची औषधे खरेदी केली...२०१४-२०१५ साली १ कोटी ६९ लाख ७२ हजार२०१५-२०१६ साली १ कोटी ९० लाख ४२ हजार२०१६-२०१७ साली १ कोटी ७५ लाख ९२ हजार२०१७-२०१८ साली ५ कोटी२०१८-२०१९ साली ७ कोटी२०१९-२०२० साली ८ कोटीसहा वर्षात एकूण २५ कोटी ३५ लाख ६६ हजारांची औषधे खरेदी केली.

आरोग्य विभागाने ६ वर्षांमध्ये २५ कोटींची औषधे खरेदी केली पण ती रु ग्णांना मिळाली का याचा कुठेही ठोक ताळेबंद का नाही ? यात पारदर्शकता का नाही ? वैद्यकीय विभागाने छुप्या पद्धतीने औषधे बाहेर काढून काळाबाजार केला असल्याचा संशय आहे. हे प्रकरण संवेदनशील असून आयुक्तांनी जातीने लक्ष घालून दोषींवर कारवाई करावी. औषधाचा काळाबाजार झाल्याने रुग्णांना औषधे मिळाली नसल्याच्या अनेक तक्रारी आहे. - राजकुमार चोरघे (आरोपकर्ते)