शहरं
Join us  
Trending Stories
1
"8 ऑक्टोबरनंतर बिहारमध्ये राजकीय भूकंप"! NDA संदर्भात आरजेडी नेत्याची मोठी भविष्यवाणी 
2
INDW vs PAKW : पाक विरुद्ध विजयी जल्लोष! हरमनप्रीत ब्रिगेडनं पुन्हा मारलं मैदान
3
रामराजेंनी घेतली शरद पवारांची भेट?; रणजीतसिंह निंबाळकरांचा खळबळजनक दावा
4
बंगालमध्ये पुन्हा बलात्कार अन् हत्या; आरोपीला 3 महिन्यांत फाशीची शिक्षा, ममतांचा अल्टिमेटम
5
हरियाणात कसं स्थापन होणार भाजप सरकार? नायब सैनी यांनी सांगितला पुढचा प्लॅन, म्हणाले...
6
पाकिस्तानात काहीही होऊ शकतं... आता थेट मुख्यमंत्रीच झाले बेपत्ता, नक्की प्रकरण काय?
7
Bigg Boss Marathi 5 : सूरज चव्हाण ठरला 'बिग बॉस मराठी ५'चा विजेता? 'त्या' पोस्टने खळबळ
8
Bigg Boss Marathi Season 5: रितेश देशमुखला मिळाल्या भाईजानकडून शुभेच्छा, म्हणाला, "सगळ्यांना वेड लावलं..."
9
कुणासोबत डिनर करायला आवडेल किम जोंग की जॉर्ज सोरोस? जयशंकर यांचं उत्तर ऐकून टाळ्यांचा कडकडाट; बघा Video
10
IND vs PAK मॅचमध्ये Arundhati Reddy चा तोरा; ज्यानं प्रसादच्या अविस्मरणीय सीनला उजाळा (VIDEO)
11
ज्येष्ठ साहित्यिका प्रा. डॉ. तारा भवाळकर यांची ९८ व्या अ.भा.म. साहित्य संमेलनाध्यक्षपदी निवड
12
Bigg Boss Marathi Season 5: दोन आठवडे 'भाऊचा धक्का' का झाला नाही? रितेशने प्रेक्षकांची माफी मागत सांगितलं कारण
13
अजित पवारांची आघाडी; जनसन्मान यात्रेत विधानसभेसाठी आणखी एका उमेदवाराच्या नावाची घोषणा
14
Bigg Boss Marathi 5 : अंकिता वालावलकर टॉप ३ मध्ये नाही? फिनालेआधीच मोठी अपडेट समोर, चाहते भडकले
15
INDW vs PAKW : रिचा घोषनं घेतला सुपर कॅच; पाक कॅप्टनचा खेळ खल्लास! (VIDEO)
16
"उत्तर गाझा खाली करा", IDF ची वॉर्निंग! इस्रायलकडून लेबनॉनमध्ये मृत्यूचं तांडव, हिजबुल्लाहचा पलटवार
17
Bigg Boss18 च्या प्रीमियरला आले अनिरुद्धाचार्य महाराज, सलमानला भेट दिली भगवद् गीता
18
अमेरिकेतील यशानंतर 'अमूल' आता युरोपमध्ये ठेवणार पाऊल!
19
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यावर 'क्रिकेटचा देव' सचिन तेंडुलकर म्हणतो- "हा सन्मान..."
20
"सरदार पटेलांचा पुतळा पूर्ण झाला पण..."; संभाजीराजे छत्रपतींनी स्पष्टच सांगितलं

ठेकेदाराकडून एकाच वेळी चार-चार महिन्यांचे ‘पोषण’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2023 11:03 AM

तांदळात अळ्या, कडधान्याला कीड; शिक्षक- बचत गट हैराण

- रवींद्र साळवे 

मोखाडा : तालुकाच नव्हे तर संपूर्ण पालघर जिल्ह्यात जिल्हा परिषद शाळांना मिळणाऱ्या पोषण आहाराच्या पुरवठ्यामध्ये मोठा भ्रष्टाचार होत असल्याचे चित्र असून, वाहतुकीचा खर्च वाचविण्यासाठी पोषण आहारातील कच्च्या मालाचा पुरवठा एक किंवा दोन महिन्याचा करावयाचा सोडून शाळांना मात्र तीन ते चार महिन्यांचा धान्य पुरवठा एकदाच केला जातो. यामुळे कालांतराने तांदळात जाळ्या होतात, हरभरा-वाटाणे हे कडधान्य आतून किडलेले असते. यामुळे विद्यार्थ्यांना हे धान्य शिजवून देताना शिक्षक आणि बचतगटांची चांगलीच पंचाईत होताना दिसत आहे. 

प्रशासनाचे अधिकारी संबंधित ठेकेदाराला सांभाळून घेतात. त्यामुळे शिक्षकही तक्रार कोठे करावी आणि अधिकारी वर्गाचा रोष कसा पत्करायचा, या विवंचनेत असल्यामुळे हा पुरवठ्याचा घोळ राजरोसपणे सुरूच आहे. यामुळे नियमाला धरून धान्य न देणाऱ्या ठेकेदारांवर कारवाई व्हावी, अशी मागणी जोर धरत आहे. 

जिल्हा परिषदेमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना नमध्यान्ह भोजन योजनेसाठी पोषण आहाराचा पुरवठा होत असतो. यामध्ये तांदूळ, तेल, हरभरा, वाटाणा यासोबतच अनेक मसाले पाकीट वगैरे धान्यांचा पुरवठा होतो, मात्र या पुरवठ्याबाबत अनेक शिक्षकांनी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम यांच्यासमोरच अडचणींचा पाडा मांडला.

प्रमाणित वजनकाट्याऐवजी हातकाट्याचा वापर

    तांदूळ कधीच मोजून दिला जात नाही, मात्र प्रत्येक गोणीत तांदूळ हा अपेक्षित वजनापेक्षा कमी असल्याचे दिसून येते. याशिवाय बाकी धान्य मोजण्यासाठी प्रमाणित केलेले वजनकाटे न वापरता थेट हातकाट्याचा वापर केला जातो. यामुळे बाकी धान्याच्याही मापात पाप होत असल्याचे निर्दशनास आले आहे. 

    धान्याचा पुरवठा शासन नियमांनुसार दर १ किंवा २ महिन्याला करावयाचा असतो. त्यासाठीची तरतूदही शासन करत असते, मात्र संबंधित ठेकेदार आपल्या वाहतुकीचे पैसे वाचावेत म्हणून जवळपास तीन-चार महिन्यांचा धान्य पुरवठा एकदाच करून मोकळा होतो. यामुळे कालांतराने या धान्याला कीड लागते, अशा तक्रारी आहेत. 

शिक्षण विभागाच्या आढावा बैठकीत याबद्दल अनेक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. मी शिक्षकांना आवाहन करतो की, महिन्याचा माल घ्यावा, धान्य दर्जा आणि वजन बघूनच माल स्वीकारावा. तुम्हाला कोणालाही घाबरण्याची गरज नाही. थेट माझ्याकडे तक्रारी केल्या तरी चालतील.- प्रकाश निकम, अध्यक्ष, पालघर जिल्हा परिषद

टॅग्स :palgharपालघर