शहरं
Join us  
Trending Stories
1
NIA: महाराष्ट्रासह पाच राज्यांमध्ये एनआयएच्या धाडी; जालना, छत्रपती संभाजीनगरमधून तिघांना घेतलं ताब्यात
2
राहुल गांधी कोल्हापूरात पोहचताच उचगावातील कौलारू घरात गेले, तिथे कोणाला भेटले? 
3
मैत्रीचा इतिहास: पाकिस्तान कदापी अण्वस्त्रधारी बनू शकला नसता; भारतावर आरोप झाला, इस्रायलने थेट अंगावर घेतला
4
करुन दाखवलं! दहावी, बारावी नापास पण वयाच्या २२ व्या वर्षी मिळवलं यश, झाली IAS
5
Kolkata Doctor Case : "२४ तासांत मागण्या पूर्ण न झाल्यास आमरण उपोषण करू", डॉक्टरांचा ममता सरकारला अल्टिमेटम
6
माजी खासदाराची शरद पवारांच्या राष्ट्रवादीत घरवापसी; अवघ्या २ वर्षात परतले माघारी
7
१० मिनिटांत घरी पोहोचणार गरमागरम जेवण, Swiggy नं सुरू केली नवी सेवा; मुंबई-पुण्यासह 'या' ठिकाणी घेता येणार लाभ
8
Navratri Special : "शेतकरी नवरा नको गं बाई" हा दृष्टिकोन बदलण्याची गरज, अभिनेत्री असलेली मृण्मयी शेतीकडे का वळली?
9
Bigg Boss 18 ची उत्सुकता शिगेला! सलमानने डॅशिंग एन्ट्री घेऊन दाखवला अनोखा अंदाज, बघा व्हिडीओ
10
मनसेचं 'मिशन महाराष्ट्र'! राज ठाकरे आज मराठवाड्यात; त्यानंतर नाशिक, पुणे दौरा करणार
11
राष्ट्रवादी प्रवेशाची घोषणा करताच हर्षवर्धन पाटलांचा जुना व्हिडिओ व्हायरल, काय म्हटलंय?
12
अहमदनगर शहराचे नाव 'अहिल्यानगर'; जिल्ह्याचे नाव राहणार तेच; सरकारी आदेश जारी
13
Jio Financial ला SEBI नं दिली गूड न्यूज, आता शेअरवर नजर; काय परिणाम होणार?
14
Irani Cup 2024 : अजिंक्य की ऋतुराज? MUM vs ROI मॅच ड्रॉ झाली तर कोण उचलेल ट्रॉफी?
15
संतापजनक! "पप्पा वाचवा..." ओरडत पळाल्या मुली; शाळेतून परतताना तरुणांनी काढली छेड
16
Virat सह अनेक सेलिब्रिटींचे डीपफेक व्हिडीओ बनवून होतेय फसवणूक; बनावट गेमिंग अ‍ॅपद्वारे कोट्यवधींची लूट
17
'तुम्ही मनी लॉड्रिंग, मानवी तस्करीत...", वैज्ञानिकाला एक व्हिडीओ कॉल अन् गमावले ७१ लाख
18
Jammu And Kashmir : सैन्याला मोठं यश! कुपवाडामध्ये घुसखोरीचा प्रयत्न करणाऱ्या २ दहशतवाद्यांचा खात्मा
19
IND vs NZ सामन्यात 'चिटिंग'? आर. अश्विननंही केली 'चॅटिंग', पण...
20
अमेठीत घडलं 'बदलापूर', आरोपी गंभीर जखमी! पोलिसाची रिव्हॉल्वर हिसकावताना घडली घटना

भूकंपाने ५२ अंगणवाड्यांना तडे; आदिवासी बालकांचा जीव टांगणीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 05, 2019 11:01 PM

तलासरी भागात भूकंपाच्या हादऱ्याने अनेक घरांना व अंगणवाड्यांना तडे जात आहेत या बरोबर या भागातील खदानी त मनमानी पद्धतीने करण्यात येणाऱ्या प्रचंड सुरुंग स्फोटानेही घरांना हादरे बसून तडे जात आहेत

तलासरी : तलासरी तालुक्यातील २१ अंगणवाड्या धोकादायक झाल्याने त्या पाडून नवीन अंगणवाड्या बांधण्याचे प्रस्ताव प्रलंबित असताना तलासरी डहाणू भागात सतत होणाऱ्या भूकंपाच्या धक्क्याने अजून ५२ अंगणवाड्यांना तडे गेल्याने त्या धोकादायक झाल्याने आदिवासी बालकांचे जीव टांगणीला लागले आहेत पण याचे सोयरसुतक ना अधिकाऱ्यांना ना पुढाऱ्यांना.

या धोकादायक झालेल्या अंगणवाड्यांचा अहवाल एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी आनंद जाधव यांनी तलासरी तहसील कार्यालयाला दिल्यावर महसूल विभागाने ५२ ताडपत्र्या बाल विकास प्रकल्प मध्ये पाठवून देऊन आपली जबाबदारी झटकली. या अंगणवाड्या आता गळणार नाहीत परंतु, त्या कोसळल्या तर यात ताडपत्रीचा काय उपयोग होणार? याचा कोणताही खुलासा महसूल खात्याकडे नाही.

५२ अंगणवाड्यांना देण्यात आलेल्या ताडपत्र्यातून तंबू उभारायचे आहेत. संबंधित ग्रामपंचायतीच्या सहकार्याने अंगणवाड्या बाहेर तंबू टाकून भूकंपाचा धक्का बसताच बालके तंबूत बसवायची अशी ही योजना पण तडे गेलेल्या अंगणवाड्यांची दुरूस्तीचे काय? हा प्रश्न अनुत्तरीतच आहे, या भागात भूकंपाचे धक्के बसू लागल्यानंतर गाव पाड्यात शासना तर्फे तंबू टाकण्यात आले पण ते कुचकामी ठरले आहेत, अन आता अंगणवाड्या तंबूत भरणार असल्याने आदिवासी बालकांचे बालपण तंबूत जाणार आहे.

तलासरी डहाणू भागात होत असलेल्या भूकंपाच्या धक्क्याने जनता हैराण आहे या भूकंपाची कारणमिमांसा करण्यात यंत्रणा अक्षरश: अपयशी ठरली आहे. भूकंपाने या भागातील हजार दीड हजार घरांना तडे गेले आहेत या घरांचे पंचनामे महसूल विभागा मार्फत करण्यात येऊन काही लाभार्थ्यांना सहा हजाराची मदत देण्यात आली पण शासनाने दिलेली मदत म्हणजे जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार आहे,तलासरी तालुक्यातील धोकादायक झालेल्या २१ अंगणवाड्या या सन १९८५ पासून ते २००५ पर्यंत बांधण्यात आलेल्या असून काही ना ३० वर्षे तर काही अगदी १३ ते १४ वर्षांपूर्वी बांधलेल्या पण निकृष्ट कामाने त्या धोकादायक झाल्या आहेत त्या पाडून नवीन बांधण्याचे प्रस्ताव बांधकाम विभागा कडे आहेत या पैकी २ अंगणवाड्या बांधण्याचे प्रस्ताव मंजूर झाले असून १९ अंगणवाड्या चे प्रस्ताव निधीअभावी रखडले आहेत पण या कडे आदिवासींचे पुढारी म्हणवणाºयांचे दुर्लक्ष आहे

एकात्मिक बाल विकास प्रकल्पाचे अधिकारी आनंद जाधव यांनी या बाबत माहिती देतांना सांगितले की, १९ अंगणवाड्यां च्या जुन्या तोडून नव्या बांधण्याचे प्रस्ताव बांधकाम खात्याकडे प्रलंबित आहेत, तर भूकंपाने तडे गेलेल्या अंगणवाड्या साठी २ ताडपत्री महसूल विभागाने पाठविल्या असून ग्रामपंचतीच्या सहकार्याने तंबू टाकण्यात येतील.

तलासरी भागात भूकंपाच्या हादऱ्याने अनेक घरांना व अंगणवाड्या ना तडे जात आहेत या बरोबर या भागातील खदानी त मनमानी पद्धतीने करण्यात येणाऱ्या प्रचंड सुरुंग स्फोटानेही घरांना हादरे बसून तडे जात आहेत पण खाण मालकांबरोबर असलेल्या आर्थिक हित संबंधामुळे शासकीय यंत्रणा सुरु स्फोटाने झालेले नुकसान भूकंपाच्या नावावर खपवित आहे