शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे तर व्होट कटिंग मशिन..."; 'परिवर्तन महाशक्ती' तिसऱ्या आघाडीवर संजय राऊत बरसले
2
भाजपाची ऑफर नाकारली, काँग्रेसमध्ये घरवापसी; खतगावकरांचा पुढचा प्लॅन ठरला?
3
Kolkata Doctor Case : "मृत्यूच्या काही तास आधी लेकीशी बोललो होतो..."; डॉक्टरच्या वडिलांनी CBI ला केली 'ही' विनंती
4
वडीगोद्री ते जालना मार्गावर बस - टेम्पोचा भीषण अपघात; ६ जणांचा मृत्यू, १७ जखमी
5
Exclusive: 'युध्रा' मधून साऊथ ब्युटीचं हिंदीत पदार्पण, म्हणाली, "सिनेमात केवळ बाहुली बनून..."
6
अयोध्येत पुन्हा होणार प्राणप्रतिष्ठापना, २२ जानेवारीचा मुहुर्त, तयारीला सुरुवात, नेमकं काय होणार?
7
'बिग बॉसचे पहिले 4 सिझन गाजले नाहीत', केदार शिंदेंच्या वक्तव्यावर मेघा धाडेची लक्षवेधी कमेंट
8
तिरुपती लाडू प्रकरण : पवन कल्याण म्हणाले, "आता सनातन धर्म रक्षण बोर्ड स्थापन करण्याची वेळ आलीय"
9
'या' कंपनीच्या गोल्ड लोन व्यवहारावरील बंदी हटवली; रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय; शेअरमध्ये तुफान तेजी
10
शिवसेना-भाजपा वाद संपेना; आमदार योगेश कदमांविरोधात भाजपा पदाधिकारी संतापले
11
४०० पारचा प्रयत्न फसला; ३७ धावांत ४ विकेट्स! ३७६ धावसंख्येवर आटोपला टीम इंडियाचा पहिला डाव
12
जुना अनुभव फार डेंजर, बॅकअप प्लॅन तयार ठेवलाय; अपक्ष आमदाराचा महायुतीला सूचक इशारा
13
Piccadily Agro Share : ही तर कमालच! १ लाखांचे झाले १ कोटी रुपये, मद्य तयार करणाऱ्या कंपनीकडून गुंतवणूकदारांवर पैशांचा पाऊस
14
आमदार आदित्य ठाकरेंना निमंत्रण; मनसेच्या 'व्हिजन वरळी'त काका-पुतणे एकत्र येणार?
15
Post Office Saving Scheme : Post Office ची सुपरहिट स्कीम! ५ वर्षांपर्यंत दर महिन्याला मिळतील ₹९,२५०; पाहा स्कीमचे फायदे
16
iPhone 16 ची भारतात विक्री सुरू होताच खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड; मुंबई, दिल्लीत लागल्या रांगा  
17
ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये रस्सीखेच; मुंबईतल्या 'या' ६ जागांवर दोन्ही पक्षांचा दावा
18
मारु का सोडू? संभ्रमात पडल्यामुळं फसला जड्डू! शतकासह 'द्विशतकी' डावही हुकला
19
Aadhaar Card : Aadhaar मध्ये केवळ एकदा करू शकता 'हा' बदल; अनावधानानेही करू नका 'ही' चूक; पुन्हा संधी मिळणार नाही
20
उर्वशी रौतेला क्रिकेटर ऋषभ पंतला करतेय डेट? अभिनेत्री म्हणाली...

माजी सभापती म्हात्रेंसह ६ जणांना सक्तमजुरी

By admin | Published: January 10, 2017 5:45 AM

कामण येथील शिवसेनेच्या विभागप्रमुखाची गेली २५ वर्ष सुरु असलेली न्यायालयीन लढाई यशस्वी ठरली असून, याप्रकरणी तत्कालीन ठाणे जिल्हा परिषदेच्या

वसई : कामण येथील शिवसेनेच्या विभागप्रमुखाची गेली २५ वर्ष सुरु असलेली न्यायालयीन लढाई यशस्वी ठरली असून, याप्रकरणी तत्कालीन ठाणे जिल्हा परिषदेच्या माजी सभापतीसह सहा जणांना एक महिन्याच्या सश्रम कारावासाची शिक्षा वसईच्या प्रथम वर्ग न्याय दंडाधिकाऱ्यांनी सुनावली आहे. २७ जून १९९१ ला रात्री ८.१५ च्या दरम्यान परागदिन जयस्वाल,राधेशाम जयस्वाल,घनशाम जयस्वाल या तिघांनी जमीनीच्या वादातून आपल्या घरावर ५०-६० जणांच्या जमावासह सशस्त्र हल्ला केला. त्यांनी घराला घेरले, महिलांना अश्लिल शिवीगाळ केली आणि घर जाळून टाकण्याची धमकी दिली.अशी तक्रार लक्ष्मण उर्फ आप्पा विरारकर यांनी वसई पोलीस ठाण्यात केली होती. या तक्रारीवर पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा नोंदवण्यास नकार दिल्यामुळे आप्पा विरारकर यांनी वसई न्यायालयात फिर्याद दाखल केली होती.या फिर्यादीवर सुनावणी होवून तब्बल २५ वर्षे ६ महिने आणि ६ दिवसांनी निकाल लागला आहे. आरोपींच्या वतीने नेत्रा नाईक यांनी तर सरकार पक्षातर्फे संजय समेळ यांनी केलेला युक्तीवाद विचारात घेवून आरोपींनी फिर्यादीला भीती दाखवण्याच्या हेतूने त्याच्या मालमत्तेला क्षती पोहोचवण्याची धमकी दिली. त्यामुळे त्यांनी गुन्हा केला आहे. तसेच त्यांनी याच उद्देशाने बेकायदा जमाव जमवला आणि प्राणघातक हत्यारासह ते सज्ज होते. त्यामुळे त्यांनी आणखी एक गुन्हा केला आहे,असा निष्कर्ष न्यायालयाने काढून हा आदेश दिला.आरोपी राधेशाम जयस्वाल, घनशाम जयस्वाल,अजय मदने,प्रभाकर दामोदर म्हात्रे, सुरेश म्हात्रे,प्रकाश म्हात्रे यांना या प्रकरणी दोषी ठरविले असून, प्रत्येकी एक महिना सक्तमजुरी आणि प्रत्येकी दोेन हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. हा महत्वपूर्ण निकाल वसईचे न्याय दंडाधिकारी मा.ये.वाघ यांनी दिला आहे. तसेच आरोपींकडून दंडाची रक्कम वसूल झाल्यावर त्यातील ९ हजार रुपये नुकसानभरपाई म्हणून फिर्यादीला देण्यात यावे. आरोपींचे जामीनपत्र समर्पित करावे. हा आदेश ठाण्याच्या तुरुंगाधिकाऱ्यांना कळवण्यात यावा, असा निकालही न्यायालयाने यावेळी दिला. (प्रतिनिधी)

शिक्षा ठोठावण्यात आलेल्या आरोपींपैकी प्रभाकर म्हात्रे हे तत्कालीन ठाणे जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती आहेत. तसेच कामण गावचे माजी सरपंच देखिल आहेत. पूर्वी जनता दलात विविध पदांवर कार्यरत असलेले म्हात्रे सध्या बहुजन विकास आघाडीचे नेते आहेत. तर फिर्यादी आप्पा विरारकर शिवसेनेचे माजी विभागप्रमुख आहेत.त्यामुळे राजकिय दृष्टीकोनातूनही या प्रकरणाकडे पाहिले जात होते.न्याय प्रक्रियेवर माझा संपूर्ण विश्वास आहे.त्यामुळेच २५ वर्षे दिलेला न्यायालयीन लढा यशस्वी झाला. अशी प्रतिक्रिया विरारकर यांनी दिली. या प्रकरणी प्रभाकर म्हात्रे यांच्याशी मोबाईलवरून संपर्क साधला असता, त्यांनी प्रतिसाद दिला नाही.