शहरं
Join us  
Trending Stories
1
Mamata Banerjee : "बंगालमध्ये पुरामुळे विध्वंस, अनेक जिल्हे बुडाले"; ममता बॅनर्जींनी मोदींना लिहिलं पत्र, मागितली मदत
2
सर्वोच्च न्यायालयाचे यूट्यूब चॅनल हॅक, सगळे व्हिडीओ गायब, काय दिसतंय?
3
FSSAI चौकशी करणार, दोषींवर कारवाई होणार; तिरुपती लाडू वादावर आरोग्यमंत्र्यांची प्रतिक्रिया
4
शाळा-कॉलेजात टॉपर, १३ गोल्ड मेडल; सरकारी अधिकारी होण्यासाठी नाकारली परदेशातील नोकरी
5
'...तर आज काश्मीर पाकिस्तानचा भाग असता', मेहबुबा मुफ्ती यांच्या वक्तव्याने नवा वाद
6
एकीकडे सुरक्षेची चिंता, तर दुसरीकडे दुबईत शॉपिंग करताना दिसला सलमान खान; Video व्हायरल
7
'कुछ कुछ होता है' मधील शाहरुखची लेक 'अंजली' आता दिसते अशी, फोटो पाहून तुम्हीही व्हाल थक्क
8
"त्यांच्या तोंडांनाही टाळं लागलंय", PM मोदींनी महाविकास आघाडीवर चढवला हल्ला
9
Haryana Election : "आम्हाला संधी मिळाली तर अधिकारी...", काँग्रेस उमेदवार विनेश फोगाटचा मोठा दावा
10
PAN कार्डासाठी ऑनलाइन अर्ज कसा कराल? अवघ्या काही दिवसांत घरपोच मिळेल
11
दिल्लीतील सहा मंदिरांवर वक्फ बोर्डाने ठोकला दावा, अल्पसंख्याक आयोगाच्या अहवालातून समोर आली माहिती  
12
कसे तयार केले जातात तिरुपतीचे लाडू? 300 वर्षांत 6 वेळा बदलली रेसिपी, वर्षाला होते 500 कोटींची कमाई!
13
पितृपक्ष: तुळस ठरेल भाग्यकारक, ‘हे’ उपाय करा; शुभ-लाभ मिळवा, पितरांसह होईल लक्ष्मी कृपा!
14
मराठा तेवढाच मिळवावा, ओबीसी संपवावा असं मुख्यमंत्र्यांचं धोरण; लक्ष्मण हाकेंचा आरोप
15
पितृपक्षात संकष्टी चतुर्थी: ‘असे’ करा व्रत, गणपती होईल प्रसन्न; पाहा, चंद्रोदय वेळ, मान्यता
16
कोण आहेत न्यायाधीश श्रीशानंद? ज्यांनी मुस्लीम परिसराचा उल्लेख केला पाकिस्तान
17
"माझा तरुण मुलगा गेला, आरोपीला जामीन मिळाला, हा कोणता कायदा?"; आईने फोडला टाहो
18
अब तक ४००! फिरकीच्या बालेकिल्ल्यात बुमराहचा कल्ला; ३ विकेट्स घेताच गाठला मैलाचा पल्ला
19
घडलं असं काही की डिलिव्हरी बॉयने आयुष्यच संपवले; 'सुसाईड नोट'मुळे फुटली वाचा
20
पितृपक्ष: कालसर्प योगाचे चंद्राला ग्रहण, ८ राशींना शुभ काळ; पद-पैसा वाढ, अपार सुख-समृद्धी!

डहाणूत पुराच्या पाण्यातून अंत्ययात्रा; स्मशानभूमीत पोहोचायलाही रस्ता नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: August 06, 2024 10:12 AM

गेल्या आठवड्यात तर डहाणू येथील सोनाळे खूबरोड पाडा येथे नाल्यावर पूल किंवा रस्ता नसल्याने नागरिकांना चक्क अंत्ययात्रेदरम्यान मृतदेह पुराच्या पाण्यातून नेण्याची वेळ आली.

हितेन नाईक

पालघर : जिल्हा निर्मितीला दहा वर्षे उलटली तरी अद्याप रस्ते, वीज, पाणी या गरजेच्या सुविधांपासून पालघरवासीय वंचित आहेत, याचा प्रत्यय विविध घटनांतून येत असतो. अनेक गावपाड्यात जायला रस्ते नाहीत, त्यामुळे पावसाळ्यात तर येथील नागरिकांचा संपर्क तुटतो, तर कधी जीव धोक्यात घालून या पाण्यातून त्यांना प्रवास करावा लागतो. गेल्या आठवड्यात तर डहाणू येथील सोनाळे खूबरोड पाडा येथे नाल्यावर पूल किंवा रस्ता नसल्याने नागरिकांना चक्क अंत्ययात्रेदरम्यान मृतदेह पुराच्या पाण्यातून नेण्याची वेळ आली.

  पालघर जिल्ह्यात एकूण आठ तालुके असून, एकूण ९०४ गावांत अनेक ठिकाणी सोयी-सुविधांचा अभाव आहे. अजूनही केळवे पाली पाडा येथील स्मशानभूमीत पोहोचण्यासाठी रस्ता नसल्याने पावसाळ्यात येथील नागरिकांना गुडघाभर पाण्यातून वाट काढत जावे लागते, तर डहाणू येथील सोनाळे खूबरोड पाडा या ठिकाणीही शनिवारी नागरिकांना अंत्यसंस्कारासाठी एक मृतदेह कमरेभर पाण्यातून न्यावा लागला होता. 

निधी मिळूनही सुविधांपासून वंचित?

डहाणू तालुक्यातील तवा ग्रामपंचायतीमध्ये आठवडाभरापूर्वी विजय वझे यांच्या आईचा मृत्यू झाल्यावर स्मशानभूमीची दुरवस्था झाल्याने उघड्यावर अंत्यसंस्कार करताना मोठा पाऊस आल्याने मृतदेह प्लास्टिकने झाकण्याची वेळ नातेवाइकांवर आली होती. केंद्र आणि राज्य शासन पेसाच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचा निधी देत असताना जिल्ह्यातील गावपाडे आणि तेथील आदिवासी समाज अजूनही सोयी-सुविधांपासून वंचित का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.  

केळवे पालीपाडा येथील आदिवासी बांधवांना मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी कमरेइतक्या पाण्यातून जाण्याची वेळ येत असेल तर याच्याइतके दुर्दैव ते काय? या समस्यांसंदर्भात मुख्यमंत्री कार्यालयाकडे तक्रार दाखल केली आहे.

- ॲड. प्रथमेश प्रभोतेंडोलकर, पालघर