शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

वसई-विरार महापालिकेवर होणार प्रशासकाची नियुक्ती?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2020 02:07 IST

लॉकडाउनमुळे येथे इतक्यात निवडणुका होणार नसल्याने आता राज्य शासनाने निवडणूक आयोगाची शिफारस मान्य केल्यास वसई-विरार महापालिकेवर कदाचित शासनाकडून प्रशासकाची नेमणूक होऊ शकते, असे समजते.

वसई : जगभरासह देशातही कोरोनाचे थैमान सुरू असून त्याचा फटका सर्वसामान्य जनतेसोबत प्रशासनालादेखील मोठ्या प्रमाणावर बसत आहे. वसई-विरार शहरांत तर कोरोनाबाधितांचा आकडा शंभरीपलीकडे गेला आहे. महानगरपालिकेची पाच वर्षांची मुदतही संपत असल्याने आणि सध्या शहरात कोरोनाचा कहर असल्यामुळे नजीकच्या काळात निवडणुका होणे कठीण आहे. यामुळे महापालिकेवर प्रशासक नेमला जाण्याचे संकेत मिळत आहेत.कोरोनाच्या संकटामुळे केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्य सरकारसोबत चर्चा केल्यानंतर पहिल्याच लॉकडाउनच्या वेळी राज्यात पुढील दोन महिन्यांत होणाऱ्या त्या-त्या शहरातील महापालिका निवडणुका पुढे ढकलल्या. त्यामुळे त्या-त्या ठिकाणी आता प्रशासक नेमण्याची शिफारस निवडणूक आयोगाने राज्य सरकारला केल्याने वसई-विरार महापालिकेलाही त्याचा फटका बसणार असल्याचे संकेत मिळत आहेत. वसई-विरार महापालिकेची मुदत २० जून २०२० रोजी संपत असून लॉकडाउनमुळे येथे इतक्यात निवडणुका होणार नसल्याने आता राज्य शासनाने निवडणूक आयोगाची शिफारस मान्य केल्यास वसई-विरार महापालिकेवर कदाचित शासनाकडून प्रशासकाची नेमणूक होऊ शकते, असे समजते.कोरोनामुळे राज्यातील निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत. त्याचा फटका खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही बसला असताना आता ज्या महापालिकांची मुदत संपली आहे किंवा नजीकच्या काळात संपणार आहे, त्यांना तो अधिक बसणार आहे. वसई-विरार महापालिकेची मुदत २० जूनला संपत आहे, तर ३ मेपर्यंत जाहीर झालेले लॉकडाउन त्यानंतरही सुरूच राहणार असल्याचेही म्हटले जात आहे.मिळालेल्या माहितीनुसार येथील निवडणूक किमान सहा महिने तरी पुढे जाणार असल्याचे संकेत मिळत आहेत. असे झाल्यास पालिकेच्या विद्यमान सदस्यांना वाढीव मुदतवाढ द्यायची की, या ठिकाणी प्रशासक बसवायचा, याचा निकाल आता राज्य सरकारच्या कोर्टात आहे. यासंदर्भात नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी संपर्क केला असता तो झाला नाही.>नवनियुक्त आयुक्त गंगाधरन देवराजन यांचे काय?वसई-विरार महापालिकेचे तत्कालीन आयुक्त बी.जी. पवार ३१ डिसेंबर २०१९ रोजी निवृत्त झाल्यानंतर जवळपास तीन महिन्यांनंतर राज्य शासनाने आयुक्त म्हणून गंगाधरन देवराजन यांची नियुक्ती केली. त्यांनी पदभार स्वीकारून केवळ २० दिवस झाले आहेत. यापूर्वी प्रभारी आयुक्त म्हणून पालघरचे जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे हेच पालिकेच्या आयुक्तपदाचा अतिरिक्त भार सांभाळत होते. त्यामुळे आता महापालिकेवर प्रशासक नियुक्त झाला, तर विद्यमान आयुक्तांचे काय, असाही प्रश्न उपस्थित होत आहे. कदाचित, गंगाधरन देवराजन यांनाच प्रशासक म्हणून जबाबदारी पार पाडण्यास सांगितले जाऊ शकते, अशीही चर्चा आहे. प्रशासक नियुक्त झाला तर त्याचा फायदा निश्चितच राज्यातील सत्ताधारी पक्षाला होत असतो. त्यामुळे शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसला याचा फायदा होईल का, याबाबतही शहरात तर्कवितर्क लढवले जात आहेत.

टॅग्स :Vasai Virarवसई विरारcorona virusकोरोना वायरस बातम्या