शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

'तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका ओळखा; वसई-विरार महापालिका आयुक्तांची तात्काळ नियुक्ती करा'

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2022 22:22 IST

रुग्णालयांची व्यवस्था, लसीकरण आणि बुस्टर डोसची व्यवस्था, कचऱ्याची व्यवस्था, तसेच मूलभूत नागरी सोयी-सुविधांसंदर्भातील गंभीर प्रश्नांवर निर्णय घेण्यासाठी प्रशासक तथा आयुक्त दर्जाच्या अधिकाऱ्याची सध्या वसई विरार शहराला गरज आहे.

वसई - कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका ओळखून आणि महापालिकेच्या आरोग्य विभागासह इतरही विभागांची स्थिती लक्षात घेऊन वसई-विरार महापालिकेत तातडीने प्रशासक तथा आयुक्तांची नियुक्ती करावी, अशी मागणी वसई-विरार काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ओनील आल्मेडा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्र्यांना निवेदनही दिले आहे.

आपल्या निवेदनात आल्मेडा म्हणाले, शहराची लोकसंख्या २५ लाखांपेक्षा अधिक आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वसई-विरार शहरात पसरत आहे. मात्र अजूनही काही कोविड  रुग्णालये कार्यान्वित झालेली नाहीत. ज्या नागरिकांचे लसीकरण पूर्ण झालेले नाही, त्यांना कोरोनाच्या तिसरा लाटेचा मोठा फटका बसू शकतो. त्यात शहरातील मूलभूत नागरी सोयी-सुविधांकडे लक्ष देणे आणि कोवीड-१९ लसीकरण करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. शहरात कोरोना पॉझिटिव रुग्णांची संख्या २००० वर गेली असून ही बाब गंभीर आहे. 

दरम्यान, रुग्णालयांची व्यवस्था, लसीकरण आणि बुस्टर डोसची व्यवस्था, कचऱ्याची व्यवस्था, तसेच मूलभूत नागरी सोयी-सुविधांसंदर्भातील गंभीर प्रश्नांवर निर्णय घेण्यासाठी प्रशासक तथा आयुक्त दर्जाच्या अधिकाऱ्याची सध्या वसई विरार शहराला गरज आहे. त्यामुळे महापालिकेत तातडीने प्रशासक अथवा आयुक्तांची नेमणूक करावी, असे काँग्रेसने म्हटले आहे.

 

टॅग्स :Vasai Virarवसई विरारcongressकाँग्रेसUddhav Thackerayउद्धव ठाकरे