शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार थांबवला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामुळे २१,००० कोटी पणाला, काश्मीरच्या अर्थव्यवस्थेची मोठी हानी, देशाला होणार हे १० तोटे 
3
पहलगाम दहशतवादी हल्ला : मृत जगदाळेंच्या कुटुंबीयांनी शरद पवारांना सांगितली आपबिती; संसदेत मुद्दा उचलण्याची केली मागणी
4
भाच्यासोबतच अनैतिक संबंध अन् पतीची हत्या, दोन तुकडे करून मृतदेह ट्रॉली बॅगमध्ये टाकला; पण...
5
Stock Market Today: ७ दिवसांच्या तेजीनंतर शेअर बाजार सुस्तावला, Sensex मध्ये १४० अंकांची घसरण; Tata Consumer, Eternal, ONGC टॉप लूझर्स
6
सिंधू पाणी करार थांबवल्याने पाकिस्तानचं टेन्शन वाढलं! भारताला जोरदार प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत
7
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
8
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
9
"गेल्या महिन्यात काश्मीरला जायचा विचार करत होतो...", पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर प्रसाद खांडेकरची पोस्ट
10
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
11
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
12
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
13
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
14
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
15
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
16
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
17
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
18
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
19
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
20
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा

पांढरा कांदा ठरतोय म्हसरोली गावाला आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2019 00:56 IST

१२० शेतकऱ्याची २०० ते २५० एकरवर लागवड; प्रयोगशिल शेतकºयाकडे कृषी विभागाचे दुर्लक्ष

- राहुल वाडेकरविकमगड : या तालुक्यातील शेतीक्षेत्रात विविध प्रयोग सुरु असून त्यामुळे पालघर जिल्हात हा तालुका कृषी केंद्रबिंदू ठरू पाहत आहे. फुलशेतीमध्ये मोगरा, सोनचाफा, गुलाब, झेंडु, सूर्यफुल, तूती लागवड त्याचबरोबर हळद, भाजीपाला लागवड केली जात आहे. आता यापुढे पाऊल टाकून नगदी पिकांकडे लक्ष केंद्रीत करुन बाजारात अधिक उत्पन्न देईल त्याकडे शेतकºयाचा क ल दिसून येत आहे.तालुक्यातील म्हसरोली या गावात पाच ते सहा वर्षापासून खरीपातील भातपीक कापणीनंतर डिसेंबरमधे पांढºया कांद्याची लागवड केली जात आहे. त्याला वाढती मागणी असून चांगली किंमतही मिळत असल्याने गेल्या काही वर्षांत गावातील शेतकऱ्यांकडून त्याची लागवड मोठयÞा प्रमाणात केली जाऊ लागली आहे. विक्र मगड तालुक्यापासुन जवळ असलेल्या मुंबई, वसई-विरार, पालघर, नालासोपारा, भार्इंदर या शहरांतून या कांद्याला होणारी मागणी लक्षात घेऊन म्हसरोली गावातील शेतकरी अधिक प्रमाणात त्याची लागवड करू लागले आहेत. या गावात १२० शेतकºयानी या वर्षी २०० ते २५० एकरावर पांढºया कांद्याची लागवड केली आहे. त्यातून यावर्षी जवळपास १ लाख टन कांद्याचे उत्पादन या एका गावातून येणार असल्याचे शेतकरी सांगतात.पारंपरिक शेतीला फाटा देऊन यावर्षी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. सेंद्रिय खते, दर्जेदार बियाणे, पाण्याचे योग्य नियोजन केले आहे. यामुळे एकरी वीस टन एवढे विक्रमी उत्पादन घेण्यास मदत होऊ शकणार आहे. चांगल्या प्रतिचा कांदा उत्पादित झाल्यास त्याला प्रतिमाळ ९० ते १०० रुपये इतका चांगला दर शेतकºयांना मिळू शकेल, असा विश्वास सुनील रामु नडगे या कांदा लागवड शेतकºयाने व्यक्त केला आहे.म्हसरोली गावातील शेतकरी राजेंद्र मधुकर भोईर यानी डिसेंबर महिन्यात दीड एकरावर पांढºया कांद्याची लागवड केली असून त्याना लागवडी पासून ते कांदा काढण्यापर्यंत ३५ ते ४० हजाराचा खर्च आला आहे. चार महिन्यात त्याना खर्च वजा करता १ लाख रु पये उत्पन्न मिळेल अशी आशा त्यानी व्यक्त केली. तर या गावात जगदीश रामू बेंदर, सुनील रामू नडगे, अनिल गोविंद बेंदर, बालु बेंदर अशा गावातील १२० शेतकºयानी २०० ते २५० एकर वर लागवड केली आहे. त्यातून या गावात १ लाख टन उत्पादन येईल असे शेतकºयानी सांगितले.पांढºया कांद्याचे औषधी गुणधर्मजर सर्दी किंवा कफाचा विकार असेल तर ताज्या कांद्याचा रस गूळ व मध टाकून प्यायल्यास तो दूर होते. रोज कांदा खाल्ल्याने इन्शुलिन निर्माण होते हे मधुमेह रोगावर परिणाम करते. कच्च्या कांद्याने रक्तदाबही नियंत्रणात राहतो. यात मिथाईल सल्फाईड आणि अमीनो अ‍ॅसिड असते. हे कोलेस्टेरॉलही नियंत्रणात ठेवते. तसेच हृदयाच्या तक्रारींपासूनही दूर ठेवते.