शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिफॉर्म-परफॉर्म-ट्रान्सफॉर्म; भारत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनणार"- PM मोदी
2
Raj Thackeray : "संरक्षक जाळ्या काढून तुमचाच कडेलोट…", नरहरी झिरवळांच्या आंदोलनावर राज ठाकरेंची टीका
3
ऐतिहासिक वाढ! भारताचा परकीय चलन साठा पहिल्यांदाच 700 अब्ज डॉलर्स पार
4
Thane: तरुणीला ब्लॅकमेल करणाऱ्या बांधकाम व्यावसायिकाचा खून, तरुणीसह दाेघे पाेलिसांच्या ताब्यात
5
छत्तीसगडच्या बस्तरमध्ये भीषण चकमक; सुरक्षा दलांनी 30 नक्षलवाद्यांचा केला खात्मा
6
'रन आउट' करूनही मिळाली नाही विकेट! हरमनप्रीतसह स्मृतीलाही आला राग (VIDEO)
7
आता अहमदनगर नव्हे तर 'अहिल्यानगर'! नामांतराच्या प्रस्तावाला केंद्राची मंजुरी
8
टीम इंडियाच्या माजी क्रिकेटपटूच्या आईचा पुण्यातील राहत्या घरात सापडला मृतदेह
9
इस्रायलनं नकाशात भारतासोबत असं काय केलं की लोक भडकले? ताबडतोब घेण्यात आली अ‍ॅक्शन
10
शिक्षकाचं संपूर्ण कुटुंब संपवणारा आरोपी अखेर अटकेत, समोर आली धक्कादायक माहिती
11
INDW vs NZW: भारतीय महिला संघाचा पहिला सामना; New Zealand Women सेट करणार टार्गेट
12
PAK vs ENG : आपल्याच देशात पाकिस्तानची 'कसोटी'! पण पहिल्या सामन्यापूर्वी मिळाला सुखद धक्का
13
“राज्यातील राजकारणाला जनता कंटाळली, एक सुसंस्कृत पर्याय म्हणून तिसरी आघाडी”: संभाजीराजे
14
दहशतवाद्यांचा कर्दनकाळ माजी IPS अधिकारी आता BCCI मध्ये काम करणार; मोठी जबाबदारी मिळाली!
15
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर पाकिस्तानला जाणार; SCO शिखर परिषदेत सहभागी होणार
16
काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा आजचा कोल्हापूर दौरा रद्द, कारण..
17
२२ वर्षांनी घेतला वडिलांच्या हत्येचा बदला, मुलाने खुन्याला त्याच स्टाईलनं संपवलं   
18
TRAI कडून पुन्हा कारवाई, १८ लाखांहून अधिक मोबाईल नंबर्स ब्लॉक; तुम्हीही करत आहात ही चूक?
19
कॅनडातील भीषण वास्तव; वेटरच्या नोकरीसाठी सुशिक्षित भारतीयांनी लावल्या रांगा...
20
इस्रायलची मोठी कारवाई; हिजबुल्लाह प्रमुख हाशिम सफीद्दीनचा खात्मा, आता फक्त एकच जिवंत...

महाप्रकल्प ठरताहेत युतीची महाडोकेदुखी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2019 2:15 AM

वाढवण, जेट्टी, बुलेट ट्रेन, हायवे, कॉरिडोर : यांचे भूसंपादन भोवणार

पालघर : पालघर लोकसभा मतदारसंघात महायुती झाली. भाजपाचे गावीत सेनेला दत्तक जाऊन पुन्हा महायुतीचे उमेदवार ठरले, असा सारा फीलगुडचा माहोळ असला तरी महायुतीला मोदी सरकारने व फडणवीस सरकारने बुलेट ट्रेन, वाढवण बंदर, जिंदाल जेट्टी, बडोदा एक्स्प्रेस हायवे, डेडीकेटेड गुड्स कॅरिडोर या महाप्रकल्पांच्या अंमलबजावणीसाठी बळजबरीने केलेले भूसंपादन ही महायुतीसाठी डोकेदुखी ठरली आहे.

आमची वडीलोपार्जित शेती, घरेदारे याच्यावरून या महाप्रकल्पांसाठी तुम्ही नांगर फिरविणार आहात काय? आमच्या जमिनी मातीमोल भावाने बळजबरी का घेतल्यात या प्रश्नांची सरबत्ती मतदार मते मागणारे नेते व कार्यकर्त्यांवर करीत असतात. त्याचे कोणतेही उत्तर त्यांच्याकडे नसते. एमएमआरडीएने जारी केलेला व जनतेचा प्रचंड विरोध असलेला विकास आराखडा देखील महायुतीसाठी कबाब में हड्डी ठरतो आहे. ४० हजारांहून अधिक हरकती ज्या विरोधात घेतल्या गेल्या तो आराखडा आमलात आणणार की रद्द करणार या प्रश्नाचेही उत्तर मतांची भिक्षा मागणाऱ्या युतीच्या नेत्यांकडे नाही. १९९५ मध्ये शिवसेनाप्रमुखांनी रद्द केलेल्या वाढवण बंदराचे भूत पुन्हा जागविले गेले आहे. त्यासोबत आता जिंदाल जेट्टीचेही भूत निर्माण केले गेले आहे. याबाबत ठोस भूमिका काय घेणार? याचेही उत्तर युतीकडे नाही. विशेष म्हणजे महाआघाडीनेही याबाबत ठोस भूमिका घेतलेली नाही. त्यामुळे मतदार संतप्त आहे. अनेक ठिकाणी प्रकल्पांची कामे जनतेने स्वयंस्फूर्तीने बंद पाडली आहेत.जनतेची अपेक्षा काय आहे?बुलेट ट्रेन, बडोदा एक्स्प्रेस हायवे, गुड्स कॅरिडोर हे प्रकल्प राबविणारच असाल तर त्यांचा मार्ग शेती, बागायती, घरे विहिरी याला बाधा पोहोचणार नाही अशा पद्धतीने नव्याने नियोजित करा, या प्रकल्पांसाठी करावे लागणारे भूसंपादन संंबंधित शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन जमिनीच्या दराबाबत त्यांच्याशी थेट (दलालांविना) चर्चा करा, डहाणू व अन्य परिसरात पर्यावरण संवंर्धनासाठी गेल्या अडीच दशकापासून एकही उद्योग होऊ दिलेला नाही ते योग्यच आहे. मग पर्यावरणाचा समूळ नाश करणारे वाढवण बंदर आणि जिंदाल जेट्टीसारखे महाप्रकल्प उभारण्याचा हट्ट कशासाठी तेही रद्द केले पाहिजेत. शिवसेनाप्रमुखांनी युती सरकारच्या काळात वाढवण बंदर रद्द केले होते. मग आला ते पुन्हा का साकारले जाते आहे.

टॅग्स :palghar-pcपालघर