शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

बहुजन विकास आघाडीचा शहरी व ग्रामीण भागात प्रचाराचा झंझावात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2019 00:25 IST

प्रत्येक घरात वीज दिल्याचा दावा करणाऱ्यांनी : मोखाडा, तलासरीत सर्वेक्षण करावे

पालघर : बहुजन विकास आघाडीचे नेते आ.हितेंद्र ठाकूर व उमेदवार बळीराम जाधव या दोघांनी बुधवारी जिल्ह्याचा शहरी व ग्रामीण भाग पिंजून काढला. बळीराम जाधव यांनी मोखाडा, जव्हार, खोडाळा व विक्र मगड या ग्रामीण भागात घरोघरी जाऊन मतदारांच्या भेटी घेतल्या. यावेळी त्यांना मिळालेल्या प्रतिसादामुळे ते भारावून गेले. यावेळी झालेल्या छोटेखानी भाषणात ते म्हणाले, हे सरकार गोरगरीबांचे नसून मूठभर उद्योगपतीसाठी राबणारे सरकार आहे. जिल्ह्यात दुष्काळाची दाहकता मोठ्या प्रमाणावर जाणवू लागली असतांना, राज्य सरकार मात्र आपल्याच मस्तीत आहे. ग्रामीण भागात हजारो आदिवासी मुले कुपोषणांमुळे मरणाच्या दारात आहेत, परंतु सरकारला त्याची चाड नाही. गुरांना चारा नाही, आदिवासी शेतमजुरांच्या हाताला काम नाही, मनरेगा योजनेंतर्गत असलेली कामे बंद करण्यात आल्यामुळे मोठ्या प्रमाणात स्थलांतर सुरू झाले आहे. पाणीटंचाईची तीव्रता दिवसेंदिवस वाढत चालली असून महिलांना हंडाभर पाण्यासाठी २ ते ३ कि.मी. पायपीट करावी लागत आहे, अशी स्थिती असताना सरकार मात्र निद्रावस्थेत आहे. त्यामुळे आता परिवर्तन अटळ आहे.दुसरीकडे आ.हितेंद्र ठाकूर यांनी वसई,नालासोपारा व वसई गावात झालेल्या चौकसभेत सरकारच्या गैरकारभारावर चौफेर टीका केली.ते म्हणाले, अच्छे दिन राहिले दूर, पूर्वी होते ते दिवस राहिले म्हणजे आपण खूप काही मिळवल्यासारखे होईल, काँग्रेसच्या कारकिर्दीत सुरू झालेल्या योजनांची नावे बदलून स्वत:च्या नावावर खपवणारे हे सरकार आहे.३५० चा सिलिंडर ८०० ला हे अच्छे दिन म्हणायचे का?ही मंडळी मते मागायला आली की त्यांना जाब विचारा.गॅस सिलिंडर ३५० रु. होता तो आता ८०० रु . झाला. याला आपण अच्छे दिन म्हणायचे का ?देशातील प्रत्येक गावात वीज पोहोचली, असा दावा करणार्या मोदी सरकारने मोखाडा भागात अंधारात चाचपडणाºया गावांचे सर्व्हेक्षण करावे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019palghar-pcपालघर