शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राची इच्छा पूर्ण झाली! सूरज चव्हाण 'बिग बॉस मराठी'चा महाविजेता; अभिजीत सावंतचं स्वप्न भंगलं
2
IND vs BAN : फक्त ७१ चेंडूत खेळ खल्लास! Hardik Pandya चा स्वॅग; सिक्सर मारत फिनिश केली मॅच
3
उद्धव ठाकरे यांची मुलावर टीका; एकनाथ शिंदे भडकले, म्हणाले…
4
वायुसेनेच्या एअर शोदरम्यान चेन्नईतील बीचवर चेंगराचेंगरी; ५ मृत्युमुखी, २५० जखमी
5
बारामतीच्या लेकाने बिग बॉस जिंकले! सूरज चव्हाणसाठी अजित पवारांच्या पत्नीची पोस्ट, म्हणाल्या- "पहिल्या दिवसापासून..."
6
Abhishek Sharma २०० + स्ट्राइक रेटनं कुटत होता धावा, पण 'गडबड घोटाळा' झाला (VIDEO) 
7
Bigg Boss 18 : "मी डाकूंच्या खानदानातून आहे, त्यामुळे...", गुणरत्न सदावर्तेंची 'बिग बॉस'च्या घरात एन्ट्री, सलमानलाही हसू आवरेना
8
बेरोजगारी दूर झाली तर आरक्षणाचा एकही प्रश्न उभा राहणार नाही; पृथ्वीराज चव्हाण यांचे मत
9
Bigg Boss 18: ९० च्या दशकातील हिरोईन शिल्पा शिरोडकरची एन्ट्री, सलमान म्हणतो, 'इथे कुठे आली तू...?'
10
Bigg Boss Marathi Season 5: रनर अप ठरल्यानंतर अभिजीत सावंतची पोस्ट, म्हणाला...
11
"8 ऑक्टोबरनंतर बिहारमध्ये राजकीय भूकंप"! NDA संदर्भात आरजेडी नेत्याची मोठी भविष्यवाणी 
12
३ वर्षांनी कमबॅक! आधी Varun Chakravarthy च्या नावे लाजिरवाणा विक्रम; मग सोडली छाप
13
INDW vs PAKW : पाक विरुद्ध विजयी जल्लोष! हरमनप्रीत ब्रिगेडनं पुन्हा मारलं मैदान
14
भारतीय महिलांनी पाकिस्तानला दिला 'जोर का झटका'; क्रिकेटच्या देवाने केलं 'नारीशक्ती'चे कौतुक
15
रामराजेंनी घेतली शरद पवारांची भेट?; रणजीतसिंह निंबाळकरांचा खळबळजनक दावा
16
नवा फास्टर किंग Mayank Yadav ची दाबात एन्ट्री; असा पराक्रम करणारा तिसरा गोलंदाज
17
बंगालमध्ये पुन्हा बलात्कार अन् हत्या; आरोपीला 3 महिन्यांत फाशीची शिक्षा, ममतांचा अल्टिमेटम
18
9 चिमुकल्यांची शिकार करणाऱ्या लांडग्यांची दहशत संपली; शेवटचा लांडका मृतावस्थेत आढळला
19
हरियाणात कसं स्थापन होणार भाजप सरकार? नायब सैनी यांनी सांगितला पुढचा प्लॅन, म्हणाले...
20
पाकिस्तानात काहीही होऊ शकतं... आता थेट मुख्यमंत्रीच झाले बेपत्ता, नक्की प्रकरण काय?

सुकेळी खिंडीत दरड कोसळण्याची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 02, 2019 11:19 PM

पावसाळ्यापूर्वी दुरुस्तीची मागणी : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील रस्ता

पाली : मुंबई-गोवा महामार्गावर अंत्यत धोकादायक म्हणून सुकेळी खिंडीची ओळख आहे. सध्या मुंबई-गोवा महामार्गावरील पनवेल ते इंदापूर या दरम्यानच्या रस्त्याची कामे ही युद्धपातळीवर सुरू आहेत; परंतु जून महिना सुरू झाल्यामुळे पाऊस पडण्यास केव्हाही सुरुवात होऊ शकते. त्यामुळे सुकेळी खिंडीतील दरवर्षी जे मोठ्या प्रमाणात दरड कोसळण्याचे प्रमाण होते ते कमी करायचे असेल तर पावसाळ्याआधी या उपाययोजना करण्याची मागणी प्रवाशांकडून होत आहे.

मुंबई-गोवा मार्गावरील रस्त्याच्या कामासाठी सुकेळी खिंडीतील जे डोंगर खोदले गेले आहेत, त्यामुळे काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात रस्त्याच्या बाजूला मोठमोठे दगड तसेच माती मोठ्या प्रमाणात खाली आलेली आहे. त्यामुळे पोकळ झालेली माती व दगड पावसाळ्यात पाण्याच्या प्रवाहाबरोबर खाली येऊन दरड कोसळून वाहतूककोंडी होण्याची शक्यता आहे. दरवर्षी या खिंडीमध्ये दरड कोसळून मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी होत असते. त्याचप्रमाणे रस्त्याच्या साइडपट्टीही उद्ध्वस्त झाल्या आहेत. त्यातच रस्तासुद्धा अरुंद असल्यामुळे कधी कधी गाडी ओव्हरटेक करण्याच्या नादात गाडी साइडपट्टी सोडून गेल्यामुळे मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. जर का सुकेळी खिंडीतील रस्त्याच्या दोन्ही बाजूच्या डोंगरांना पावसाळ्याच्या आधीच संरक्षण भिंत घातली तरच यावर्षी दरडी कोसळण्याचे प्रमाण कमी करून वाहतूककोंडी नियंत्रणात आणता येऊ शकते. त्यामुळे पावसाळा सुरू होण्याआधीच सुकेळी खिंडीत योग्य त्या उपाययोजना करण्याची मागणी प्रवाशांकडून होत आहे.