शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक दिवस! मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा; केंद्र सरकारचा मोठा निर्णय
2
अजित पवार बारामतीमधून माघार घेणार? कार्यकर्त्यांसमोर दिले सूचक संकेत 
3
रेल्वे कर्मचाऱ्यांना मोदी सरकारची मोठी भेट! नवरात्रीच्या पहिल्या दिवशी बोनस मंजूर, मिळणार 'इतकी' रक्कम! 
4
Women's T20 World Cup : कॅप्टन Fatima Sana ची अष्टपैलू खेळी; लंकेविरुद्ध पाकचा 'डंका'
5
"आजचा दिवस मायमराठीच्या इतिहासातील एक ऐतिहासिक दिवस’’, देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया
6
मुलीच्या अपहरणाची तक्रार देणारा बापच निघाला विकृत, वडिलांच्याच अत्याचाराला कंटाळून मुलीने सोडले होते घर
7
अखेर सापडलं सोन्याचं घुबड, ३१ वर्षांपासून शोघ घेत होता संपूर्ण देश, नेमकं कारण काय?  
8
धक्कादायक! घरात घुसून पती-पत्नीसह दोन चिमुकल्यांची हत्या; CM योगींनी दिले कारवाईचे आदेश
9
केकमुळे कॅन्सरचा धोका! अन्न सुरक्षा आणि गुणवत्ता विभागाच्या अहवालात मोठा खुलासा
10
एक दोन नव्हे, तब्बल 7 आघाड्यांवर युद्ध लढतोय चिमुकला इस्रायल; जाणून घ्या, ज्यूंचे शत्रू कोण कोण?
11
अरुण गवळीची मुलगी गीता गवळी ठाकरे गटाच्या संपर्कात; लवकरच मशाल हाती घेणार?
12
Sangli: शरद पवारांच्या दौऱ्याने सांगलीत भाजपला मोठा धक्का; राजेंद्रअण्णा देशमुख पवार गटात
13
वैवाहिक बलात्कार गुन्हा नाही तर सामाजिक समस्या; सुप्रीम कोर्टात केंद्र सरकारची स्पष्टोक्ती
14
रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरला, ‘फादर ऑफ ऑल बॉम्ब’ चा वापर केल्याचा दावा! बघा धडकी भरवणारा VIDEO
15
Rohit Pawar Rohit Sharma, Viral VIDEO: रोहित पवार म्हणाले- "हमको और एक वर्ल्ड कप चाहिए", मग रोहित शर्माने काय केलं?
16
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना खूशखबर, ५ तारखेला खात्यात जमा होणार ४ हजार रुपये
17
इराणमध्ये विषारी दारू प्यायल्यानं २६ जणांचा मृत्यू, १०० हून अधिक जण रुग्णालयात दाखल
18
"जरांगेंनी पाडापाडीचं राजकारण करण्यापेक्षा उमेदवारांना निवडून आणावं’’,संभाजीराजेंचा सल्ला
19
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ठाणे दौरा, शहरातील वाहतुकीमध्ये बदल
20
"आधी स्वतःची परिस्थिती पाहा..." धार्मिक स्वातंत्र्याबाबत अमेरिकेच्या टीकेवर भारताचा पलटवार

घोलवडच्या जयप्रकाश बारी वाड्यातील चिमणीवालं घर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2019 12:15 AM

घराला घरपण देणारा ठेवा : पाहुण्यांकडून कौतुक

बोर्डी : या गावच्या टोकेपाडा येथील बारी वाड्यातील जयप्रकाश बारी यांच्या घराच्या ओटीवर रोज सायंकाळी शेकडो चिमण्यांचा चिवचिवाट ऐकू येतो. त्याचे स्थानिकांना अप्रूप नसलं तरी घरी येणाऱ्या पाहुण्यांकडून विचारणा होऊन कौतुक होत असल्याचं बारी यांच म्हणणे आहे.

या गावच्या टोकेपाडा येथे डहाणू बोर्डी प्रमुख राज्य मार्गावर जयप्रकाश आणि अर्चना बारी या दाम्पत्यांचं घर आहे. हे सर्वसामान्य मध्यम वर्गीयांप्रमाणेच घर असलं, तरी येथे रोज सायंकाळी शेकडो चिमण्यांचा गोतावळा जमत असल्याने त्याला असामान्य महत्व प्राप्त झालं आहे. वर्षभरापूर्वी त्यांनी कागदाच्या बॉक्सला चिमण्यांना आतबाहेर जाता यावे, म्हणून जागा ठेवली आणि त्याला दोरी बांधून घराच्या वेगवेगळ्या भागात टांगून ठेवले. मात्र साप आणि मांजरीपासून त्याचे संरक्षण होईल याची विशेष काळजी घेतली. त्यानंतर त्यामध्ये दाणे आणि पाणी ठेवण्याचे काम त्यांची हर्ष व राशी ही दोन मुलं व पत्नी अर्चना यांना सुलभतेने करता येईल हे देखील पाहिले. शिवाय रोजच्या धकाधकीच्या जीवनातून सायंकाळची वेळ ते चिमण्यांना दाणे टाकण्याकरिता आवर्जून देतात. त्यांचा लळा चिमण्यांनाही लागला असून तिन्ही सांजेला ते ओटीवर दाणे घेऊन आल्यावर त्या भुर्रकन येऊन दाणे वेचायला येतात.

हा क्षण दिवसभराचा थकवा आणि ताण कमी करण्यासाठी लाभदायक असल्याचे ते म्हणतात. तर दाणे वेचून झाल्यावर अंधार पडताच लगतच्या झाडावर त्या डेरेदाखल होतात. हा प्रकार रोज सुरू असतो. त्यांच्या घरी येणाऱ्या पाहुण्यांना त्याचे विशेष अप्रुप असून त्या बद्दल बारी कुटुंबियांचे विशेष कौतुक त्यांच्याकडून केले जाते. शिवाय घर किती मोठे वा सोयी सुविधांनी युक्त असण्यापेक्षा असा ठेवा असावा म्हणून त्यांना विशेष शाबासकी मिळते. तर जागतिक चिमणी दिनी त्यांना स्नेह्यांनी फोन करून शुभेच्छाही दिल्या.

अर्चना बारी या घोलवड येथील अंगणवाडी केंद्रात सेविका आहेत. अन्य कर्मचाऱ्यांप्रमाणे केंद्रातील बालकांना त्या चिऊकावूच्या गोष्टी आणि गाणी ऐकवतात. मात्र घरचा समृद्ध करणाºया अनुभवाच्या गोष्टीतून या लहानग्यांच्या मनावर संस्कार करण्याचे काम त्या सुंदररित्या करीत आहेत. दरम्यान या परिसरात झाडांची संख्या, शेती व बागायती असून मोबाईल टॉवर नसल्याने चिमण्यांची संख्या वाढली असल्याचे दिसून येते. हा वारसा टिकवायचा असल्यास टॉवर हद्दपार झाले पाहिजेत असे पर्यावरण प्रेमींचे म्हणणे आहे. 

रोज सायंकाळी चिमण्यांना अंगणात दाणे टाकले जायचे, आता त्या थेट ओटीवरच येतात. ही संख्या झपाट्याने वाढत असून समृद्ध करणारा अनुभव आहे.-जयप्रकाश बारी (घोलवड ग्रामस्थ)