शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंच्या कन्या संजना जाधव यांच्या गाडीला अपघात, थोडक्यात बचावल्या
2
“ही निवडणूक आरक्षणाच्या मुद्द्यावरच लढली जाईल, ठाकरे गट-भाजपा पडद्यामागे...”: प्रकाश आंबेडकर
3
"मोदींनी जितका पैसा अदानींना दिला, मी तितका गरिबांना देईन", राहुल गांधी काय बोलले?
4
विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्य सरकारचा मोठा निर्णय; गायीला दिला 'राज्यमाते'चा दर्जा
5
मुस्लिमांची संख्या वाढलीय, आता तुमची सत्ता संपणार; सपा आमदाराच्या विधानानं नवा वाद
6
तुम्ही दिवसभरात किती पाणी प्यायला हवं? संशोधन काय सांगतं?
7
भारतात WANTED असलेला झाकीर नाईक पाकिस्तानात पोहोचला; 'या' मोठ्या शहरात घेणार सभा
8
मुकेश अंबानींच्या Reliance मध्ये मोठी घसरण; शेअर बाजार हादरला, जाणून घ्या कारण
9
अरे देवा! सलूनमध्ये 'फ्री हेड मसाज' पडला महागात; ३० वर्षीय तरुणाला आला स्ट्रोक अन्...
10
टेस्टमध्ये टीम इंडियाचा बेस्ट शो! धावांची 'बरसात' अन् फिफ्टी, सेंच्युरीसह जलद 'द्विशतकी' रेकॉर्ड 
11
सिंधुदुर्ग जिल्हा परिषद कार्यालात तुफान राडा, ठाकरे गटाच्या शिवसैनिकांकडून बॉडीगार्ड्ना चोप 
12
Jio New Recharge Plan! दररोज १० रुपयांत मिळणार २ जीबी डेटा, अनलिमिटेड कॉलिंगही; कोणता आहे प्लॅन?
13
जपानचे नवे पंतप्रधान चीनला शिकवणार धडा; नवा प्लॅन पाहून ड्रॅगनला बसणार धडकी!
14
“मविआ १८० जागा जिंकेल, फडणवीसांनी महायुतीचा विरोधी पक्षनेता ठरवावा”: बाळासाहेब थोरात
15
"देवाला तरी राजकारणापासून दूर ठेवा", सुप्रीम कोर्टाने मुख्यमंत्री चंद्राबाबूंना झापले 
16
वर्षभरात अर्धी होतेय Smartphones ची किंमत; 'दिल मांगे मोअर'च्या नादात तुमचं मोठं नुकसान तर होत नाहीये ना?
17
अमेरिकेत जाणाऱ्यांसाठी खुशखबर! अमेरिकन दूतावास २.५ लाख अतिरिक्त व्हिसासाठी भेट देणार
18
फिल्मी क्वीनचा लक्झरी 'अंदाज'...! कंगना रणौतनं बंगला विकून काय केलं खरेदी? मोजले तब्बल 3 कोटी
19
विधानसभेसाठी तयारी झाली सुरू! शरद पवारांच्या भेटीसाठी नेत्यांची गर्दी, ठाकरेंच्या नेत्याने घेतली भेट
20
भाजपाला दिली २१ जागांची यादी, ३ महामंडळेही हवी; तिसऱ्या आघाडीवर रामदास आठवले म्हणाले...

परराज्यातही चिंचणी-वाणगाव मिरचीचा ठसका; घेतले जाते विक्रमी उत्पादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2021 1:50 AM

गेल्या वर्षी कोरोनाची सुरुवात होऊन वाहतूक बंद पडल्याने ढोबळी मिरची आणि तिखट मिरचीचे उत्पादन घेणाऱ्या शेकडो शेतकऱ्यांचे कोट्यवधीचे नुकसान झाले होते.

शौकत शेखडहाणू : कोल्हापुरी मिरचीचा ठसका सर्वश्रुत आहे, परंतु पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील चिंचणी-वाणगावची मिरचीही आपले वेगळे अस्तित्व राखून आहे. मुंबई शहराला भाजीपाला पुरवठा करण्यात सिंहाच्या वाटा असलेल्या या परिसरातील बागायतदार सध्या मिरचीचे विक्रमी उत्पादन घेण्यात यशस्वी ठरत आहे. 

गेल्या वर्षी कोरोनाची सुरुवात होऊन वाहतूक बंद पडल्याने ढोबळी मिरची आणि तिखट मिरचीचे उत्पादन घेणाऱ्या शेकडो शेतकऱ्यांचे कोट्यवधीचे नुकसान झाले होते. डहाणूच्या पश्चिम किनारपट्टीवरील अत्याधुनिक पद्धतीने वानगाव, चिंचणी, वरोर, वाढवण, बावडा, बडापोखराण, वासगाव, चंडीगाव, माटगाव, धूमकेत, आसनगाव, ऐना, गुंगवडा, डहाणूखडी, कांक्राडी या बागायतसमृद्ध भागात रब्बी हंगामात इस्रायल तंत्रज्ञानाचा वापर करून अत्याधुनिक पद्धतीने शेडनेटचा वापर करीत ढोबळी मिरची आणि तिखट मिरचीचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेतले जात आहे. सध्या उन्हाळा सुरू झाला असला तरी ठिंबक सिंचनद्वारे मिरचीची वाढ मोठ्या प्रमाणात होत आहे. यंदा परिसरातील शेतकऱ्यांकडून सुमारे पाच ते सहा हजार एकर जमिनीवर ढोबळी मिरची, अचारी मिरची, हिरव्या मिरचीची लागवड करण्यात आली आहे. हे पीकही जोमदार आले आहे. येथून दररोज दोनशे टन मिरची मुंबई, नवी मुंबई, पुणे, नाशिकसह गुजरात राज्यातील अहमदाबाद, सुरत, वापी येथील बाजारपेठेत रवाना होत आहे. काही वर्षांपूर्वी फक्त गवतांचे उत्पन्न घेणारे परिसरातील शेतकरी आधुनिक पद्धतीने भाजीपाला लागवड करीत आहेत. याआधी डहाणूच्या पश्चिम भागात भाजीपाला, फळभाज्या तसेच वेलवर्गीय भाज्यांपैकी दुधी भोपळा, पडवळ, कारली, वांगी, टोमॅटो, तोंडली, पिकांची लागवड मोठ्या प्रमाणात होत असे, मात्र वेलवर्गीय भाज्या लागवडीमध्ये जास्त गुंतवणूक असल्याने तसेच बाजारपेठेतील भावांची अनिश्चितता यामुळे शेतकरी वेलवर्गीय भाज्यांची लागवड करण्यासाठी उत्सुक नाहीत. त्यांनी मिरचीचा फायदेशीर पर्याय स्वीकारला आहे. 

दरम्यान, डहाणूच्या पश्चिम भागातील चिंचणी, बावडा, वाणगावसारख्या भागांत सध्या सर्वात जास्त शिमला मिरचीचे उत्पादन सर्वाधिक आहे. येथील ढोबळी मिरचीची मागणी दिल्ली, मुंबईबरोबरच गुजरात राज्यातही आहे. दररोज येथून २०० टन मिरची पाठवली जात आहे.

इस्रायलमध्ये जाऊन शेतकऱ्यांनी केला अभ्यासमिरचीची लागवड केल्यास त्यातून नुकसान होण्याची भीती नाही. संकरीत बियाणांमुळे हे पीक कोणत्याही रोगाला बळी पडण्याचा धोका कमी असतो. शिवाय चुकून एखादा रोग पडल्यास त्यावर तातडीने उपाय करून तो नियंत्रणात आणता येतो. तसेच मिरचीचे भावही आश्वासक असतात. यामुळे येथील बहुसंख्य शेतकरी मिरची पिके घेण्याकडे वळले आहेत. या परिसरातील शेतकरी इस्रायलसारख्या ठिकाणी जाऊन तेथील शेतीचा अभ्यास करून विविध तंत्रज्ञानाचा वापर करून ठिबक सिंचनाने पाण्याची बचत करून जास्तीत जास्त क्षेत्र लागवडीखाली आणून त्यातून विक्रमी उत्पादन घेण्यात येथील शेतकऱ्यांनी यश मिळविले आहे.