शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
3
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
4
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
5
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
6
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
7
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
8
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
9
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
10
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
11
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
12
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
13
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
14
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
15
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
16
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
17
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
18
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
19
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
20
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!

विद्यार्थ्यांचं भवितव्य टांगणीला! विरारमध्ये घराला लागलेल्या आगीत बारावीच्या उत्तरपत्रिका जळून खाक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2025 14:33 IST

विरारमध्ये बारावीच्या उत्तर पत्रिका तपासण्यासाठी आणलेल्या शिक्षिका महिलेच्या घराला आग लागल्याने आगीमध्ये बारावीच्या उत्तर पत्रिका जळून खाक झाल्या आहेत.

मंगेश कराळे

नालासोपारा :- नुकत्याच बारावीच्या परीक्षा पार पडल्या. परीक्षेचे टेन्शन गेल्याने विद्यार्थी निर्धास्त झालेत. पण काही महिन्यांतच लागणाऱ्या निकालाचेही टेन्शन आहेच की... दुसरीकडे शिक्षकांचीही बारावीच्या उत्तर पत्रिका तपासणीची लगबग सुरू आहे. अशातच विरारमधून एक अत्यंत धक्कादायक बातमी समोर आली असून शिक्षिकेच्या घरी लागलेल्या आगीमध्ये बारावीच्या उत्तरपत्रिका जळून खाक झाल्याने खळबळ उडाली आहे. ऐन शिमग्याच्याच दिवशी विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका आगीच्या भक्षस्थानी गेल्यामुळे विद्यार्थ्यांचं भवितव्य टांगणीला लागलं आहे.

विरारमध्ये बारावीच्या उत्तर पत्रिका तपासण्यासाठी आणलेल्या शिक्षिका महिलेच्या घराला आग लागल्याने आगीमध्ये बारावीच्या उत्तर पत्रिका जळून खाक झाल्या आहेत. अग्निशमन जवानांनी घटनास्थळी जाऊन आगीवर नियंत्रण मिळवले यामध्ये कोणतेही जीवितहानी झाली नसली तरी बारावीच्या विद्यार्थ्यांचं भविष्य टांगणीवर लागलं आहे. विरारच्या आगाशी येथील गंगुबाई अपार्टमेंट परिसरात ही घटना घडली आहे. शिक्षिकेने १२ वी कॉमर्सच्या उत्तरपत्रिका तपासणीसाठी घरी आणली होत्या. कामानिमित्त शिक्षिकेच्या घरातील लोक बाहेर गेले. त्यांचे घर बंद असतानाच शॉर्ट सर्किट झाल्याने घरामध्ये मोठी आग लागली, ज्यामध्ये या पेपरसह घरातील इतर सामानही जळून खाक झालं आहे.

धक्कादायक बाब म्हणजे, बारावीच्या उत्तर पत्रिका कॉलेजमध्येच तपासणं बंधनकारक असताना शिक्षिकेने नियम तोडून त्या घरी कशा नेल्या? असा सवाल आता उपस्थित होत आहे. पेपर तपासणीसाठी घरी कसे आणले? असा सवाल उपस्थित करत नागरिकांनी या घटनेवरुन संताप व्यक्त केला आहे. दरम्यान, या निष्काळजीपणामुळे विद्यार्थ्यांच्या भविष्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. याचा विद्यार्थ्यांच्या निकालावर परिणाम होण्याची शक्यता आहे.

टॅग्स :VirarविरारStudentविद्यार्थीHSC / 12th Exam12वी परीक्षा