शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राची इच्छा पूर्ण झाली! सूरज चव्हाण 'बिग बॉस मराठी'चा महाविजेता; अभिजीत सावंतचं स्वप्न भंगलं
2
IND vs BAN : फक्त ७१ चेंडूत खेळ खल्लास! Hardik Pandya चा स्वॅग; सिक्सर मारत फिनिश केली मॅच
3
उद्धव ठाकरे यांची मुलावर टीका; एकनाथ शिंदे भडकले, म्हणाले…
4
बारामतीच्या लेकाने बिग बॉस जिंकले! सूरज चव्हाणसाठी अजित पवारांच्या पत्नीची पोस्ट, म्हणाल्या- "पहिल्या दिवसापासून..."
5
Abhishek Sharma २०० + स्ट्राइक रेटनं कुटत होता धावा, पण 'गडबड घोटाळा' झाला (VIDEO) 
6
Bigg Boss 18 : "मी डाकूंच्या खानदानातून आहे, त्यामुळे...", गुणरत्न सदावर्तेंची 'बिग बॉस'च्या घरात एन्ट्री, सलमानलाही हसू आवरेना
7
बेरोजगारी दूर झाली तर आरक्षणाचा एकही प्रश्न उभा राहणार नाही; पृथ्वीराज चव्हाण यांचे मत
8
Bigg Boss 18: ९० च्या दशकातील हिरोईन शिल्पा शिरोडकरची एन्ट्री, सलमान म्हणतो, 'इथे कुठे आली तू...?'
9
Bigg Boss Marathi Season 5: रनर अप ठरल्यानंतर अभिजीत सावंतची पोस्ट, म्हणाला...
10
प्रयागराजमधील महाकुंभदरम्यान मांस आणि मद्यविक्रीवर बंदी, मुख्यमंत्री योगींचा मोठा निर्णय
11
"8 ऑक्टोबरनंतर बिहारमध्ये राजकीय भूकंप"! NDA संदर्भात आरजेडी नेत्याची मोठी भविष्यवाणी 
12
३ वर्षांनी कमबॅक! आधी Varun Chakravarthy च्या नावे लाजिरवाणा विक्रम; मग सोडली छाप
13
INDW vs PAKW : पाक विरुद्ध विजयी जल्लोष! हरमनप्रीत ब्रिगेडनं पुन्हा मारलं मैदान
14
भारतीय महिलांनी पाकिस्तानला दिला 'जोर का झटका'; क्रिकेटच्या देवाने केलं 'नारीशक्ती'चे कौतुक
15
रामराजेंनी घेतली शरद पवारांची भेट?; रणजीतसिंह निंबाळकरांचा खळबळजनक दावा
16
नवा फास्टर किंग Mayank Yadav ची दाबात एन्ट्री; असा पराक्रम करणारा तिसरा गोलंदाज
17
बंगालमध्ये पुन्हा बलात्कार अन् हत्या; आरोपीला 3 महिन्यांत फाशीची शिक्षा, ममतांचा अल्टिमेटम
18
9 चिमुकल्यांची शिकार करणाऱ्या लांडग्यांची दहशत संपली; शेवटचा लांडका मृतावस्थेत आढळला
19
हरियाणात कसं स्थापन होणार भाजप सरकार? नायब सैनी यांनी सांगितला पुढचा प्लॅन, म्हणाले...
20
पाकिस्तानात काहीही होऊ शकतं... आता थेट मुख्यमंत्रीच झाले बेपत्ता, नक्की प्रकरण काय?

सीएसआर निधीच्या विनियोगाबाबत कंपन्यांची होणार परखड झाडाझडती!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 03, 2019 11:04 PM

समाजकल्याणासाठी भरीव काम नाही : पालकमंत्री घेणार आढावा

सुरेश लोखंडेठाणे : जिल्ह्यात हजारो कंपन्या शेकडो कोटींची उत्पादने घेऊन पैसा कमवत आहेत. त्यांच्या उत्पन्नाचा विशिष्ट वाटा त्यांनी समाजकल्याणासाठी सीएसआर निधीच्या माध्यमातून जिल्ह्यातच खर्च करणे अपेक्षित आहे. पण, या निधीतून कोठेच भरीव काम दिसत नाही. हा निधी ते परस्पर कोणाला देतात, याची साधी कल्पनाही कुणाला नसल्याचा आरोप होत आहे. याकडे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी लक्ष केंद्रित करून, सीएसआर निधीसाठी जिल्ह्यातील सर्व कंपन्यांची झाडाझडती घेण्याचे निश्चित केले आहे.

पाणीटंचाईने जिल्हा होरपळून निघत आहे. त्यावर, मात करण्यासाठी व भविष्यात ही टंचाई उद्भवू नये, यासाठी युद्धपातळीवर उपाययोजना हाती घेतल्या जात आहेत. या कामासाठी कंपन्यांचा ‘सीएसआर’ निधी उपयुक्त ठरू शकतो. जिल्ह्यात ठिकठिकाणच्या कंपन्या कोट्यवधी रुपयांचे उत्पादन घेत आहेत. त्याबदल्यात या कंपन्यांनी ‘सीएसआर’ निधीतून जनहिताची कामे, उपक्रम हाती घेणे अपेक्षित आहे. पण, बहुतांश कंपन्या त्यांचा हा निधी मनमानीपणे कुठेही खर्च करत असल्याचे निदर्शनास आले आहे. याची कल्पनाही जिल्हा प्रशासनाला नाही. कंपन्यांच्या या मनमानीला आळा घालून त्यांचा सीएसआर निधी प्राप्त करण्यासाठी पालकमंत्र्यांनी जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांना बैठक आयोजित करण्याचे आदेश दिले आहेत.

जिल्ह्यातील वागळे इस्टेट, नवी मुंबईतील ऐरोली- बेलापूरपट्टा हा आशिया खंडातील सर्वाधिक मोठा औद्योगिक पट्टा आहे. डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर, कल्याण, उल्हासनगर, भिवंडी, शहापूर आदी परिसरांत शेकडो कंपन्या कार्यरत आहेत. त्यांच्या नफ्यातील सीएसआर निधी किती आहे, तो जिल्ह्यात कोठे, कशासाठी वापरला की, अन्य जिल्ह्यांमध्ये किंवा संस्थांना परस्पर हा निधी वाटप केला, त्या निधीतून जिल्ह्याला काय योगदान मिळाले, आदी मुद्यांवर कंपन्यांची लवकरच झाडाझडती घेतली जाणार आहे.