शहरं
Join us  
Trending Stories
1
बेडी काढताच अक्षयने खेचले पोलिस अधिकाऱ्याचे पिस्तूल; पोलिसांच्या दिशेने गोळ्या झाडल्या
2
लैंगिक अत्याचाराचे प्रकरण होणार बंद; मृत्यूमुळे अबेटेड समरी दाखल करणार
3
"खोलीत क्षेपणास्त्रे, गॅरेजमध्ये रॉकेट ठेवणाऱ्यांकडून...", हवाई हल्ल्यादरम्यान नेतन्याहू यांचा लेबनॉनला संदेश
4
भाजपच्या 'इलेक्शन मोड'साठी अमित शाहांची दहा सूत्री 'ब्ल्यू प्रिंट'!
5
'लाडक्या बहिणी' कमळाला मत देतील, म्हणून हा जुगाड; भाजप आमदाराचा व्हिडीओ वडेट्टीवारांकडून पोस्ट!
6
...अन् बलात्कारी, मर्डरर अमरसिंग ठाकूरचे एन्काऊंटर थोडक्यात हुकले!
7
राहुल गांधींचा पासपोर्ट रद्द करा... भाजप खासदाराचे लोकसभा अध्यक्षांना पत्र 
8
अंगावर डिझेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न, घरकुलाच्या जागेच्या मोजणीवरून वाद
9
अक्षय शिंदेच्या एन्काउंटरची सीआयडी व न्यायालयीन चौकशी केली जाणार 
10
माजी पोलीस महासंचालक म्हणाले, तर हे एन्काऊंटरच घडले नसते!
11
सर्वसामान्यांचे ₹ 1.8 लाख कोटी लुटणाऱ्यांची नावे उघड करा; राहुल गांधींचा SEBI वर हल्लाबोल
12
रशिया-युक्रेन युद्ध संपणार का? PM मोदी आणि झेलेन्स्कींची तीन महिन्यांत तिसऱ्यांदा भेट...
13
"मग नंतर तो कधी शिकणार?"; यशस्वी जैस्वालबद्दल पाकिस्तानी माजी क्रिकेटरचं रोखठोक मत
14
बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा मृतदेह अखेर नातेवाईक घेणार ताब्यात
15
"...तर विरोधकांचाही 'त्या' एन्काउंटरला पाठिंबा असेल"; नाना पटोलेंनी शिंदे सरकारला दिलं चॅलेंज
16
निवडणुकीदरम्यान मतभेद बाजूला ठेवा, गटबाजी खपवून घेणार नाही, अमित शाहांनी टोचले कान
17
Gayatri Shingne : राजेंद्र शिंगणेंविरोधात पवारांचा उमेदवार ठरला? गायत्री शिंगणे लढवणार विधानसभा!
18
राज्यातील विविध तीर्थक्षेत्र विकासांच्या ३०५ कोटी रुपयांच्या आराखड्यांना मंजुरी
19
६ लाख मोबाईल फोन बंद, ६५ हजार URLs ब्लॉक... सायबर फ्रॉड रोखण्यासाठी सरकारची मोठी कारवाई
20
जयंत पाटलांचं अजित पवारांना नवं चॅलेंज; "मोदींकडून एवढं काम करून घेतलं, तर..."

पालघरमध्ये काँग्रेसचा मोर्चा

By admin | Published: July 09, 2015 11:34 PM

भाजपा सरकारने सत्ता मिळविण्यासाठी मतदारांना अनेक खोटी आश्वासने देताना आपण भ्रष्टाचारमुक्त शासन देऊ असे सांगितले होते

पालघर : भाजपा सरकारने सत्ता मिळविण्यासाठी मतदारांना अनेक खोटी आश्वासने देताना आपण भ्रष्टाचारमुक्त शासन देऊ असे सांगितले होते. मात्र चिक्की घोटाळा, बोगस पदव्या घोटाळा, व्यापम घोटाळा प्रकरणामुळे भाजप सरकारचा खरा चेहरा सर्वांसमोर उघडला पडला असल्याची टीका माजी राज्यमंत्री राजेंद्र गावीत यांनी आज केली.पालघर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने युती शासनाच्या कार्यकाळात अनेक भ्रष्टाचार व ज्वलंत समस्या उभ्या राहत असल्याने शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे प्रमाणही वाढत असल्याने या सर्व समस्यांच्या विरोधात आवाज उठविण्यासठी पालघर रेल्वेस्टेशन ते जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी माजी राज्यमंत्री राजेंद्र गावीत, मायकल फुटयार्डो, मोहन शर्मा, केदार काळे, जिल्हाध्यक्ष मनिष गणोरे, तालुकाध्यक्ष सिकंदर शेख, सुरेंद्र शेट्टी, पांडुरंग बेलकर, विश्वास पाटील, निलेश राऊत इ. मान्यवर उपस्थित होते. राज्यमंत्री शेतकऱ्यांच्या आत्महत्या प्र्रकरणात मोठी वाढ होत असून शेतकरी वर्ग मोठ्या अडचणीत सापडला आहे. शेतकऱ्यांना पीककर्जाचा पहिला हप्ता मे महिन्यात मिळणे अपेक्षित असताना तो अजूनही त्यांच्या खात्यात जमा झालेला नाही. तसेच आघाडी सरकारने बंद केलले लोडशेडींग युती सरकारने पुन्हा सुरू केल्याने शेतकऱ्यांसह सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाला आहे. पावसाने पाठ फिरविल्याने शेतकऱ्यांपुढे दुबार पेरणीचे संकट उभे राहिल्याने शासनाने या संदर्भात तत्काळ उपाययोजना आखाव्यात, आघाडी सरकारने पालघर जिल्ह्याची निर्मिती केल्यानंतर युती सरकारने पालघर जिल्ह्याला सोयीसुविधा पुरविण्यात चालढकल केली आहे. नोकर भरतीत स्थानिकांना संधी द्यावी, पालघरचा बिल्डरधार्जिणा प्रारुप विकास आराखडा रद्द करावा , तारापूर अणुशक्ती केंद्रातून कमी करण्यात आलेल्या कंत्राटी कामगारांना पुन्हा कामावर घ्यावे, आयटीआयमधून शिकणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांना मिळणारी शैक्षणिक सवलत पुन्हा सुरु करावी, सातपाटी, नवापूर, मुरबे, दांडी इ. खाडीत सोडण्यात येणारे प्रदूषित पाणी बंद करावे व त्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करावी, इ. मागण्यांसाठी काढलेल्या या मोर्चात असंख्य कार्यकर्ते सहभागी झाले होते. (वार्ताहर)