शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात भाजपाला आणखी एक धक्का बसणार, माजी खासदार तुतारी फुंकणार? 
2
दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई; 2000 कोटी रुपयांचे कोकेन जप्त, आठवडाभरात दुसरी कारावई
3
हरयाणानंतर आता महाराष्ट्रातही भाजपला 'फ्रीबीज'चा फायदा होईल का?
4
वृद्ध दाम्पत्यानं पाण्याच्या टाकीत उडी मारून संपवलं जीवन, समोर आलं धक्कादायक कारण
5
श्वास घेण्यास त्रास; प्रकृती खालावल्याने भाजप आमदाराला एअर ॲम्ब्युलन्सने मुंबईला हलवले!
6
Ratan Tata News LIVE: ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा पंचत्वात विलीन, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
7
Kalyan: कल्याणमध्ये नामांकित बिल्डरकडून मिस फायर? बिल्डरसह मुलगा जखमी, पोलिसांकडून तपास सुरू
8
Hardik Pandya सोबत दिसणारी ही सुंदर तरुणी कोण? व्हायरल झालेल्या फोटोंमुळे रंगली चर्चा
9
केंद्र सरकारची कारवाई; 'हिज्ब-उत-तहरीर' दहशतवादी संघटनेवर घातली बंदी
10
'ही' इलेक्ट्रिक स्कूटर १०,००० रुपयांनी स्वस्त, फुल चार्ज केल्यावर १७० किमी धावणार!
11
लोकसभेला ठाकरेंच्या उमेदवाराविरोधात प्रचार करणारे नेते शरद पवारांच्या भेटीला
12
रुटचे द्विशतक, ब्रूकचे त्रिशतक! ४०० पार भागीदारी; पहिल्या सामन्यात इंग्लंडची 'दिवाळी', ७ नवे विक्रम
13
सोने ८०० रुपयांनी स्वस्त, सणासुदीतही भाव कमीच राहणार, त्यानंतर अशी उसळी घेणार की...
14
Israel Iran War: इराणवर हल्ला कधी केला जाणार? इस्रायल बैठकीत घेणार अंतिम निर्णय
15
काश्मीरमध्ये समिकरण बदलले, नॅशनल कॉन्फ्रन्सने स्वबळावर गाठला बहुमताचा आकडा, काँग्रेसची साथ सोडणार?
16
ओबीसींमध्ये १५ नव्या जातींचा समावेश; मनोज जरांगेंनी सरकारला खिंडीत गाठलं, म्हणाले...
17
PAK vs ENG: धो डाला! पाकिस्तानच्या सहा गोलंदाजांची बॉलिंगमध्ये 'शतकं', एक पोहोचला 'द्विशतका'जवळ
18
मंत्रिमंडळाची आज शेवटची बैठक संपन्न; पुढील ३-४ दिवसांत राज्यात आचारसंहिता लागू?
19
महिला आमदाराच्या पतीला केलं 'इमोशनल ब्लॅकमेलिंग', २५ हजारांची झाली फसवणूक
20
PAK vs ENG : ५५६ धावा तरी सामन्याचा 'रुट' बदलला; इंग्लंडने पाकिस्तानची 'घरच्यांसमोर' लाज काढली

कर्जफेड करणारे शेतकरी प्रोत्साहन रकमेच्या प्रतीक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2020 12:21 AM

अनेक शेतकºयांनी कर्जाचा प्रामाणिक उपयोग करून आपली भातशेती, नागली, वरई, उडीद इत्यादी पिकांचे उत्पादन घेतले व शेतातून मिळणाºया ध्यान्याची विक्री करून घेतलेले पीक कर्ज वेळेवर म्हणजे ३१ मार्चपूर्वी भरले

विक्रमगड : जिल्ह्यातील असंख्य शेतकऱ्यांनी २०१९-२० च्या खरीप हंगामात प्राथमिक सहकारी संस्थांकडून हजारो रुपयांचे कर्ज उचलले होते. हे कर्ज अनेक शेतकऱ्यांनी प्रामाणिकपणे फेडलेले आहे, मात्र ज्यांनी कर्ज फेडले नाही, त्यांना कर्जमाफी झाली आहे. तरी नियमित कर्जफेड करणारे शेतकरी आता प्रोत्साहनपर रकमेच्या प्रतीक्षेत आहेत.

अनेक शेतकºयांनी कर्जाचा प्रामाणिक उपयोग करून आपली भातशेती, नागली, वरई, उडीद इत्यादी पिकांचे उत्पादन घेतले व शेतातून मिळणाºया ध्यान्याची विक्री करून घेतलेले पीक कर्ज वेळेवर म्हणजे ३१ मार्चपूर्वी भरले. नियमित कर्ज परतफेड करणाºया शेतकरी वर्गास शासनाने कर्जमाफीत बसवले नाही व कर्ज थकवणाºया शेतकरी वर्गास योजनेचा लाभ दिला. थकबाकीदार शेतकरी नव्याने पीककर्ज घेण्यास पात्र झाले. हे धोरण चुकीचे असून प्रामाणिकपणे कर्जफेड करणाºया शेतकरीवर्गावर अन्याय करणारे आहे. जून महिना सुरू झाला असून या वर्षी समाधानकारक पाऊस होईल, असे वेधशाळेने म्हटलेले आहे. खरीप हंगामाची कामे सुरू होताना दिसत आहेत. शेतकरी वर्ग प्राथमिक कामाच्या गडबडीत आहे. प्रामाणिक शेतकरी वर्गाने मुदतीत पीककर्ज भरले असल्याने महाराष्ट्र शासनाने अधिवेशन काळात दिलेला शब्द पाळून शेतकरी वर्गाच्या बँक खात्यावर प्रोत्साहन पार रक्कम जमा करावी, अशी मागणी शेतकरी वर्गाच्या वतीने विक्रमगड येथील जाणकार शेतकरी व सहकारी संस्थेचे चेअरमन घनश्याम आळशी यांनी एका पत्राद्वारे शासनाकडे केली आहे.प्रामाणिक कर्जफेड केलेल्या शेतकºयांना ५० हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान देण्याची मागणी आता केली जात आहे. परंतु, दोन महिने झाले तरी या प्रामाणिकपणे कर्जफेड करणाºया शेतकरीवर्गाच्या बँक खात्यात प्रोत्साहनपर ५० हजार रक्कम जमा झालेली नाही. कोरोनाचे संकट संपूर्ण देशावर असल्याने अडचणी येत आहेत.