शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदनगर जिल्हा बँकेने नोकर भरतीत आरक्षण वगळले; वाद पेटणार?
2
अंबाजोगाई - लातूर रोडवर भीषण अपघात; लातूर जिल्ह्यातील ४ जण जागीच ठार
3
चीन समर्थक दिशानायके यांनी श्रीलंकेच्या राष्ट्रपती निवडणुकीत घेतली विजयी आघाडी   
4
ENG vs AUS : इंग्लंडचे पुनरागमन पण मिचेल स्टार्क भिडला! यजमानांचा पुन्हा पराभव; ऑस्ट्रेलियाची गाडी सुस्साट
5
मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; बजरंग सोनवणेंचं मुख्यमंत्री अन् राज्यपालांना पत्र, म्हणाले...
6
सिनेट निवडणूक मंगळवारी होणार; सरकारच्या परिपत्रकाला स्थगिती
7
जगन्नाथ मंदिराच्या तळघरात गुप्त खजिन्याचा घेणार शोध; लेझर स्कॅनिंगचा वापर
8
परतीचा पाऊस देणार महामुंबईला तडाखा; २६ ते २९ सप्टेंबर मुसळधारेचा अंदाज
9
१४ दिवसांतच संग्राम चौगुलेची 'बिग बॉस मराठी'मधून एक्झिट, पोस्ट शेअर करत म्हणाला- "मला..."
10
स्वाभिमानी मणका तंदुरुस्त करून घ्या!; राज ठाकरेंची पुन्हा मराठी माणसांना हाक
11
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: महत्त्वाचा निर्णय घेण्यास दिवस अनुकूल नाही!
12
याही वेळी मुंबईत अपक्षांची संख्या लक्षणीय असणार? इच्छुकांमध्ये तिकिटासाठी रस्सीखेंच
13
पाकिस्तान मोदींना घाबरतो; आज पाकिस्तान गोळीबाराची हिंमतही करणार नाही
14
राष्ट्रवादीचे कार्यालय शरद पवार गटाचेच; लोकसभा सचिवालयाने दिले स्पष्टीकरण
15
तिरूपती लाडूबाबत अफवा पसरवणाऱ्यांवर गुन्हा; भेसळयुक्त तूप ‘अमूल’चे असल्याच्या पोस्ट
16
मुख्य निवडणूक आयुक्त ३ दिवस मुंबई दौऱ्यावर; विधानसभा निवडणुकीसाठी घेणार बैठका
17
भारतातील चाकरमानी दबले फायलींच्या ढिगाऱ्याखाली; ६१ टक्के जण आठवड्याला ४९ तासांपेक्षा अधिक राबतात
18
पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेत दाखल, ‘क्वाड’ शिखर परिषदेत सहभागी होणार
19
आता मेडिकलच्या ‘पीजी’च्या जागा वाढणार; वैद्यकीय आयोगाने अर्ज मागविले
20
वरिष्ठांना लाच देण्याचा कनिष्ठाचा प्रयत्न; ‘प्रॉव्हिडंट फंड’ची सीबीआयकडे तक्रार

सिल्व्हासा रस्ता रुंदीकरणाची मागणी

By admin | Published: August 08, 2015 9:45 PM

सिल्व्हासा रस्त्यावरील दाभोसा धबधबा अवघ्या १७ कि.मी. अंतरावर असल्यामुळे पावसाळ्यात येथे मुंबई, नाशीक, ठाणे, वसई, पालघर येथून मोठ्या संख्येने पर्यटक येतात.

जव्हार : सिल्व्हासा रस्त्यावरील दाभोसा धबधबा अवघ्या १७ कि.मी. अंतरावर असल्यामुळे पावसाळ्यात येथे मुंबई, नाशीक, ठाणे, वसई, पालघर येथून मोठ्या संख्येने पर्यटक येतात. मात्र, ब्रिटीश काळापासून एकच रस्ता असलेल्या या मार्गावर मोठ मोठे खड्डे पडल्यामुळे तसेच, वर्षानुवर्ष या रस्त्याची डागडुजी किंवा नूतनीकरण न झाल्याने पर्यटकांमध्ये नाराजी आहे. मात्र, येथे बांधकाम विभागाकडून कुठलीच दुरूस्ती अथवा साईडपट्टीची कामे केली जात नाहीत, त्यामुळे सार्वजनिक बांधकामा विभागाची उदासिनता दिसत आहे.शहरापासून अवघ्या १ कि.मी. अंतरावर जांभूळविहिर समोरील मार्गवर मोठ्याप्रमाणात वसाहत झाल्यामुळे आणि खेडोपाड्यातून व कंपनीच्या मलवाहू गाड्यांच्या ये-जा सुरू असते, परंतु खड्ड्याखड्ड्यांच्या वा अरूंद रस्त्यावर पर्यटकांच्या वाहनांना अपघात होतात. त्यामुळे जांभूळविहिरकरांनी आणि या भागातील वाहन चालकांनी यारस्त्याचे रूंदीकरण करून मजबूत करावे अशी मागणी केलेली आहे. अरुंद असला तरी, जव्हार-सिल्व्हासा या रस्त्यावरून गुजरात- दादरा नगर हवेली कडून नाशिक कडे जाण्यासाठी अवजड वाहनांची मोठ्याप्रमाणात वर्दळ असते, त्यात जांभूळविहिर परिसरांत मोठ्या प्रमाणात लोकवस्ती वाढल्यामुळे तेथून जाणाऱ्या पादचाऱ्यांना तसेच मोटारसायकल वाहनचालकांना जीवमुठीत धरून जावे-यावे लागते.आम्ही ऐवढ्या लांबून प्रवास करीत येथे येतो, मात्र जव्हारहून दाभोसाला जाताना आम्हाला गाडीत एवढे धक्के बसतात की. पाठीच्या मणक्याची डीस्क ढासळते की, स्पॉन्डेलाईटीस जडतो अशी धास्ती वाटते. त्यातच गाडींचेही मोठे नुकसान होते, त्यामुळे परत येण्याचा विचार आम्ही करत नाहीत. - डॉ. नितीन गोखलेपर्यटक, मुंबई