शहरं
Join us  
Trending Stories
1
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
2
महाविकास आघाडीत कोणतीही बिघाडी होणार नाही; खासदार निलेश लंके यांना आत्मविश्वास
3
पुण्याहून लातूरकडे निघालेली भरधाव ट्रॅव्हल्स उलटली; गाढ झाेपेत असलेले ५ प्रवासी जखमी!
4
रिपाइं आठवले गटाचे उल्हासनगर शहर जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव यांची पक्षातून हकालपट्टी
5
धक्कादायक! उल्हासनगरातील अपंग शासकीय बालगृहातून २ गतिमंद व कर्णबधीर मुले गायब
6
तुळजापुरातील बसस्टँडवर ओळख; लातूरमध्ये अत्याचार! संशयित शिक्षकासह तिघांविरुद्ध गुन्हा
7
वाळवा, शिराळा, पलूस, तासगाव तालुक्यासह सांगली जिल्ह्यात पुन्हा जोरदार पाऊस
8
उजनी परिसराला पावसाने झाेडपले; वाहतूक ठप्प! एकंबी, मासुर्डी रस्ता गेला पाण्याखाली
9
थरकाप उडवणारी घटना...! आता दुसरी 'श्रद्धा वालकर'...! फ्रिजमध्ये आढळले 29 वर्षांच्या तरुणीचे 30 तुकडे 
10
IND vs BAN 1st Test : चेन्नईच्या मैदानावर विराटचा जल्लोष, शाकिब आउट झाल्यानंतर केला सुपर डान्स! बघा Video
11
VIDEO: मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडने घेतला 'सुपरमॅन' कॅच; हवेत उडी घेऊन टिपला झेल
12
हमीभावापेक्षा अधिक दराने कापूस, सोयाबीनची खरेदी होणार- देवेंद्र फडणवीसांनी दिलं वचन
13
“शिंदे, फडणवीस सर्वांसमोर उमेदवार देऊ, २८८ जागा लढू, राज्यात महाशक्तीचा CM दिसेल”: बच्चू कडू
14
“अमूल तूप कधीही तिरुपतीला पाठवलेले नाही”; लाडू प्रसाद वादावर कंपनीने दिले स्पष्टीकरण
15
आतिशी दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्या, पण सरकार चालवण्यासाठी असतील मोठी आव्हाने!
16
IND vs BAN : पंत OUT होणार असं समजून राहुलची तयारी पण फजिती; सिराजला पिकला हशा, Video
17
₹600 कोटींची ऑर्डर मिळताच शेअरच्या खरेदीसाठी उडाली गुंतवणूकदारांची झुंबड, 14% नं वधारला भाव
18
PM मोदी - मुहम्मद युनूस यांच्यात अमेरिकेत बैठक नाही, बांगलादेशने पुढे केलं 'हे' कारण
19
दिल्लीला मिळाल्या तिसऱ्या महिला मुख्यमंत्री! आतिशी यांच्यासह आणखी ५ मंत्र्यांनी घेतली शपथ
20
काँग्रेस नेते राजभवनावर, घेतली राज्यपाल राधाकृष्णन यांची भेट; पण नेमके कारण काय?

जिल्ह्याचा ९३.०४ टक्के निकाल

By admin | Published: June 08, 2015 11:00 PM

एस.एस.सी परिक्षेचा निकाल ९३.०४ टक्के लागला असून ४६१ शाळांमधून परीक्षेला बसलेल्या ४० हजार ८५१ विद्यार्थ्यांमधून ३८ हजार ४०३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

पालघर : यावर्षी एस.एस.सी परिक्षेचा निकाल ९३.०४ टक्के लागला असून ४६१ शाळांमधून परीक्षेला बसलेल्या ४० हजार ८५१ विद्यार्थ्यांमधून ३८ हजार ४०३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. मोखाडा तालुक्याचा सर्वाधिक ९८.०१ टक्के तर तलासरी तालुक्याचा सर्वाधिक कमी म्हणजे ८६.४५ टक्के इतका निकाल लागला आहे.सोमवारी आॅनलाईन पद्धतीने एस.एस.सी परीक्षेचा निकाल दुपारी १ वाजता लागला. यामुळे ग्रामीण भागातील पालक, शिक्षक, विद्यार्थ्यांची शहरातील सर्वच सायबर कॅफेमध्ये गर्दी बघायला मिळाली.जिल्ह्यातील ४६१ शाळांमधून एकूण ४० हजार ८५१ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. यातील ३८ हजार ४०३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. ४६१ शाळामधून १३७ शाळांचा निकाल १०० टक्के लागला. पालघर तालुक्यातील ७८ शाळांमधून ६ हजार ५९७ विद्यार्थ्यांपैकी ६ हजार २१७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. तालुक्याचा निकाल ९४.२४ टक्के लागला. २० शाळांचा निकाल शंभर टक्के लागला. डहाणू तालुक्यातून ४८ शाळामधून ४ हजार २७९ विद्यार्थ्यांपैकी ३ हजार ९३५ विद्यार्थी उर्त्तीण झाले. तालुक्याचा निकाल ९१.९६ टक्के लागला असून ७ शाळांचा निकाल १०० टक्के लागला आहे.वाडा तालुक्यातील ३१ शाळांमधून २ हजार ६७१ विद्यार्थी परीक्षेला बसले होती. त्यातील २ हजार ४९१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. शाळेचा निकाल ९३.३० टक्के लागला असून १२ शाळांचा निकाल शंभर टक्के लागला. मोखाडा तालुक्यातील १९ शाळा मधून १ हजार १०४ विद्यार्थ्यांमधून १ हजार ८२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. निकाल ९८.०१ टक्के लागला असून ९ शाळांचा निकाल शंभर टक्के लागला आहे.विक्रमगड तालुक्यातील २४ शाळांमधून १ हजार ७४९ विद्यार्थ्यांपैकी १ हजार ५७४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून तालुक्याचा निकाल ८९.९९ टक्के लागला . ७ शाळांचा निकाल शंभर टक्के लागला आहे. जव्हार तालुक्यातून २४ शाळांमधून १ हजार ५९४ विद्यार्थ्यांमधून १ हजार ५१८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले निकालाची टक्केवारी ९५.२३ आहे. ११ शाळांचा निकाल शंभर टक्के लागला आहे. तलासरी तालुक्यातून २१ शाळांमधून १ हजार ८६७ विद्यार्थी परीक्षेला बसले. त्यातील १ हजार ६१४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. तालुक्याचा निकाल ८६.४५ टक्के लागला तर दोन शाळांचा निकाल शंभर टक्के. (वार्ताहर)