शहरं
Join us  
Trending Stories
1
"दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार"; बिहारमधून PM मोदींचा इशारा
2
फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; पहलगाम हल्ल्यातील पीडितांनी सांगितली आपबीती
3
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
4
काश्मीरमध्ये तणाव असतानाच छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांवर मोठी कारवाई, १००० नक्षल्यांना जवानांनी घेरले, ५ ठार  
5
पहलगाम दहशतवादी हल्लाः पाकिस्तानी उच्चायोगात मागवण्यात आला केक; बॉक्स पाहून एकच प्रश्न, हे 'सेलिब्रेशन' कसलं?
6
Elphinstone Bridge: तारीख निश्चित! एल्फिन्स्टन ब्रिज २५ एप्रिलपासून वाहतुकीसाठी बंद, मुंबईकरांची कोंडी होणार
7
डोळ्यात अश्रू, कपड्यांवर रक्ताचे डाग..! दहशतवादी हल्ल्यात डोळ्यादेखत वडिलांना गमावलेल्या लेकीनेच केले अंत्यसंस्कार
8
Pahalgam Terror Attack : "माझ्या शुभमला परत आणा, मी माझं दुःख कोणाला सांगू, त्याने कोणाचं काय नुकसान केलं होतं?"
9
या सरकारी बँकेनं सुरू केलं लोन कॅम्पेन; कमी व्याजदर आणि शून्य चार्जेसवर मिळणार कर्ज, अखेरची तारीख कधी?
10
पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर खेळाडूही संतापले! सचिन तेंडुलकर ते नीरज चोप्रा.. कोण काय म्हणाले?
11
मुलगी झाली हो..! ; अभिनेता चिराग पाटील दुसऱ्यांदा झाला बाबा, पोस्ट शेअर करत दिली खुशखबर
12
Pahalgam Attack Video: दहशतवाद्यांनी पर्यटकांची अशी केली हत्या; गोळ्या झाडतानाचा व्हिडीओ समोर
13
Indus Waters Treaty: ६५ वर्षे जुना सिंधू पाणी करार काय आहे? पाकिस्तानवर किती परिणाम होईल?; वाचा सविस्तर
14
"मला पहलगाम दहशतवादी हल्ल्याबद्दल आधीच माहित होतं"; 'त्या' व्यक्तीचा पोलिसांना फोन अन्...
15
मोठा खुलासा! लेफ्टनंट विनयने दोन दहशतवाद्यांना पकडलेले; नौदलाचा अधिकारी धारातीर्थी पडला
16
"तुला ठार मारू’’, भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक गौतम गंभीरला दहशतवादी संघटनेकडून धमकी
17
‘जीव वाचवण्यासाठी आम्ही…’मृत गनबोटेंच्या पत्नीने शरद पवारांना सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव
18
दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांना इन्शुरन्स क्लेम मिळतो का? काय आहेत विमा नियम?
19
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! २६ एप्रिलपासून 'या' भागांत २४ तास पाणीपुरवठा राहणार बंद
20
मित्राकडून महागडं गिफ्ट घेतलं तर द्यावा लागू शकतो Tax! ९०% लोकांना Gift वरील टॅक्सचा नियमच माहीत नाही

बुलेट ट्रेन नको, लोकल सुधारा; रेल्वे प्रवाशांची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2019 06:39 IST

पालघर लोकसभा मतदार संघामध्ये डहाणू, बोईसर, पालघर, नालासोपारा आणि वसई या विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे, त्यातून पश्चिम रेल्वे धावते.

- अनिरुद्ध पाटीलबोर्डी : १२ एप्रिल रोजी विरार लोकल ला १५२ वर्ष पूर्ण झाल्याचा मुहूर्त साधून या लोकलने प्रवास करणाऱ्या मतदारांची स्थानिक प्रश्नांविषयीची मते मतांतरे आणि त्यांना उमेदवाराविषयीच्या अपेक्षा याचा लोकमतने नुकताच आढावा घेतला.पालघर लोकसभा मतदार संघामध्ये डहाणू, बोईसर, पालघर, नालासोपारा आणि वसई या विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे, त्यातून पश्चिम रेल्वे धावते. थेट डहाणू रोडपर्यंत लोकल धावू लागल्याने या भागाचा समावेश उपनगरीय रेल्वेत होऊ लागला असतांना शहरी आणि नागरी अशा संमिश्र समस्या निर्माण झाल्याने, येणाºया शासनाकडून त्यांची सोडवणूक व्हावी, अशी नागरिकांची मागणी आहे. डहाणू रोड ते वसई आणि वसई ते डहाणू रोड या दरम्यान थेट धावत्या लोकलमधून या प्रवाशांशी बातचीत केली असता, त्यांनी वेगवेगळे प्रश्न उपास्थित केले. यावेळी व्यवसायाने सिव्हील इंजिनियर असलेला आशिष राऊत म्हणाला कि, पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांनी देशाची धुरा उत्तम प्रकारे सांभाळली आहे. काही मुद्दे दुर्लक्षिले गेले असले तरी त्यांच्या कार्यपद्धतीने युवकांना प्रभावित केले आहे. तर डहाणूतील धुंदलवाडी नजीकच्या शिसने या आदिवासी गावचा रहिवासी असलेला माह्या दळवी म्हणाला कि आम्ही मागील पाच-सहा महिन्यांपासून भूकंपाचे शेकडो धक्के सहन करतो आहोत. त्यामुळे परिसरातील अनेक घरांचे नुकसान झाले आहे. त्यापैकी निम्म्या लोकांना पाच ते सहा हजाराची तुटपुंजी मदत मिळाली असली, तरी आजही लाभापासून वंचितांची संख्या अधिक आहे. पावसाळा जवळ आला असताना आम्ही मोकळ्या मैदानातील तंबूत किती दिवस राहायचे. मात्र डहाणू-तलासरी या तालुक्यातील अनेक गावं प्रभावित असतांना कोणत्याच राजकीय पक्षाकडून त्यांची दखल घेतली जात नसल्याने मतदारांमध्ये नाराजी आहे. तर वसई येथील निर्मळ या तिर्थक्षेत्राचे रहिवासी हिराजी रामचंद्र गावड सांगतात, कि मतदार संघाची पुनर्रचना होऊन पालघर नवीन मतदार संघ निर्माण झाला. त्यामुळे पूर्वीच्या मतदार संघा ऐवजी वसई-विरारचा समावेश झाल्यानंर येथील शहरी समस्यांबाबत या अन्य पक्षांपेक्षा बहुजन विकास आघाडीचे काम बरे असून भाजपाच्या दोन्ही खासदारांची कामिगरी त्यामुळे डावी ठरताना दिसते.

डहाणू रोड ते विरार लोकल प्रवासयावेळी वाढवण बंदर, जिंदाल जेट्टी, ओएनजीसीचे समुद्रातील सर्वेक्षण, समुद्रातील मासेमारी हद्दीचा वाद, एमआयडीसीची समुद्रात सोडलेली प्रदूषित पाण्याची पाईपलाईन बुलेट ट्रेन, डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर, मुंबई वडोदरा एक्स्प्रेसवे बेकायदेशीर सर्व्हे, तसेच विविध प्रकल्पांकरिता जमीन अधिग्रहण, कोस्टल झोन मॅनेजमेंट प्लॅन, सीआरझेड, सूर्या धरणाचा पाणी प्रश्न, कुपोषण अशा मुद्द्यांवर मतदारांनी आपली मते व्यक्त करून येणाºया शासनाकडून भूमिपुत्रांवर कोणतेही प्रकल्प लादण्यात येऊ नयेत शिवाय जिल्ह्यातील विविध समस्या प्राधान्याने सोडावाव्यात असे मत व्यक्त केले.
महायुती आणि महाआघाडीत जिल्ह्यातील अनेक छोटे-मोठे पक्ष विभागले गेल्याने सेनेचे गावित आणि बहुजन विकास आघाडीचे बळीराम जाधव यांच्यात तुल्यबळ लढत होणार असल्याचे त्यांनी सांगितले.एक लाख कोटीची बुलेट ट्रेन साकारण्यापेक्षा डहाणू ते मुंबई या लोकल सेवेचा विकास ५ हजार कोटी रु. खर्चून करण्यास प्राधान्य द्यावे, कारण बुलेट ट्रेन मुठभरांसाठी तर लोकल २५ लाख प्रवाशांसाठी आहे, असे प्रवासी म्हणाले

टॅग्स :western railwayपश्चिम रेल्वेVasai Virarवसई विरार