शहरं
Join us  
Trending Stories
1
"खोलीत क्षेपणास्त्रे, गॅरेजमध्ये रॉकेट ठेवणाऱ्यांकडून...", हवाई हल्ल्यादरम्यान नेतन्याहू यांचा लेबनॉनला संदेश
2
भाजपच्या 'इलेक्शन मोड'साठी अमित शाहांची दहा सूत्री 'ब्ल्यू प्रिंट'!
3
'लाडक्या बहिणी' कमळाला मत देतील, म्हणून हा जुगाड; भाजप आमदाराचा व्हिडीओ वडेट्टीवारांकडून पोस्ट!
4
...अन् बलात्कारी, मर्डरर अमरसिंग ठाकूरचे एन्काऊंटर थोडक्यात हुकले!
5
राहुल गांधींचा पासपोर्ट रद्द करा... भाजप खासदाराचे लोकसभा अध्यक्षांना पत्र 
6
अंगावर डिझेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न, घरकुलाच्या जागेच्या मोजणीवरून वाद
7
अक्षय शिंदेच्या एन्काउंटरची सीआयडी व न्यायालयीन चौकशी केली जाणार 
8
माजी पोलीस महासंचालक म्हणाले, तर हे एन्काऊंटरच घडले नसते!
9
सर्वसामान्यांचे ₹ 1.8 लाख कोटी लुटणाऱ्यांची नावे उघड करा; राहुल गांधींचा SEBI वर हल्लाबोल
10
रशिया-युक्रेन युद्ध संपणार का? PM मोदी आणि झेलेन्स्कींची तीन महिन्यांत तिसऱ्यांदा भेट...
11
"मग नंतर तो कधी शिकणार?"; यशस्वी जैस्वालबद्दल पाकिस्तानी माजी क्रिकेटरचं रोखठोक मत
12
बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा मृतदेह अखेर नातेवाईक घेणार ताब्यात
13
"...तर विरोधकांचाही 'त्या' एन्काउंटरला पाठिंबा असेल"; नाना पटोलेंनी शिंदे सरकारला दिलं चॅलेंज
14
निवडणुकीदरम्यान मतभेद बाजूला ठेवा, गटबाजी खपवून घेणार नाही, अमित शाहांनी टोचले कान
15
Gayatri Shingne : राजेंद्र शिंगणेंविरोधात पवारांचा उमेदवार ठरला? गायत्री शिंगणे लढवणार विधानसभा!
16
राज्यातील विविध तीर्थक्षेत्र विकासांच्या ३०५ कोटी रुपयांच्या आराखड्यांना मंजुरी
17
६ लाख मोबाईल फोन बंद, ६५ हजार URLs ब्लॉक... सायबर फ्रॉड रोखण्यासाठी सरकारची मोठी कारवाई
18
जयंत पाटलांचं अजित पवारांना नवं चॅलेंज; "मोदींकडून एवढं काम करून घेतलं, तर..."
19
जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघावरून शिवसेना शिंदे गट आणि भाजपात रस्सीखेच
20
"आम्हा तिघांनाही CM व्हायचंय, पण निर्णय हायकमांडचा", रणदीप सुरजेवालांनी केले मोठे वक्तव्य

वसई तालुक्यात दुष्काळी स्थिती

By admin | Published: July 10, 2015 10:23 PM

वसई तालुक्यात १५ दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने शेतकरीवर्ग हवालदिल झाला असून रखरखत्या उन्हात भात व भाजीपाल्याची रोपे करपली आहेत.

पारोळ : वसई तालुक्यात १५ दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने शेतकरीवर्ग हवालदिल झाला असून रखरखत्या उन्हात भात व भाजीपाल्याची रोपे करपली आहेत. या पार्श्वभूमीवर वसई परिसरात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असतानाही कृषी विभागाने या भागातील शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करून त्यांना वाऱ्यावर सोडल्याच पाहायला मिळत आहे.तालुक्यात पश्चिम व पूर्व भागात मोठ्या प्रमाणात भातशेती व पावसाळी भाजीपाल्यांची शेती केली जाते. या वर्षाचा विचार केला तर अवकाळी पडलेल्या पावसाने या भागातील खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर असतानाही त्यांनी महागडी भातबियाणे खरेदी करून पेरणी केली, पण सुरुवातीला पावसाने दमदार हजेरी लावल्याने शेतकऱ्यांनी भराभर पेरण्या उरकून घेतल्या. पण, १५ दिवसांपासून वरुणराजाने पाठ फिरविल्याने भातपिके करपून गेली आहेत. तसेच पावसाळ्यात भातशेतीला जोड असणाऱ्या भाजीपाल्याची रोपेही करपून गेल्याने या भागातील शेतकऱ्यांवर मोठे संकट कोसळले आहे. पाऊस लांबल्याने हळवे, निमगरवे पिकांच्या भातलावणीचा हंगामही निघून जात असल्यामुळे या भागातील शेतकरी आकाशाकडे डोळे लावून बसले आहेत. वसई तालुक्यात अशी परिस्थिती निर्माण झाली असतानाही कृषी विभागाने कोणतीही पाहणी केली नसून शेतकऱ्यांच्या मतांचा जोगवा मागणारी राजकीय मंडळीही मूग गिळून गप्प आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना वाली कोण, अशी व्यथा शेतकरी प्रसाद पाटील यांनी लोकमतकडे मांडली. (वार्ताहर)