शहरं
Join us  
Trending Stories
1
Raj Thackeray : "संरक्षक जाळ्या काढून तुमचाच कडेलोट…", नरहरी झिरवळांच्या आंदोलनावर राज ठाकरेंची टीका
2
ऐतिहासिक वाढ! भारताचा परकीय चलन साठा पहिल्यांदाच 700 अब्ज डॉलर्स पार
3
छत्तीसगडच्या बस्तरमध्ये भीषण चकमक; सुरक्षा दलांनी 30 नक्षलवाद्यांचा केला खात्मा
4
आता अहमदनगर नव्हे तर 'अहिल्यानगर'! नामांतराच्या प्रस्तावाला केंद्राची मंजुरी
5
टीम इंडियाच्या माजी क्रिकेटपटूच्या आईचा पुण्यातील राहत्या घरात सापडला मृतदेह
6
इस्रायलनं नकाशात भारतासोबत असं काय केलं की लोक भडकले? ताबडतोब घेण्यात आली अ‍ॅक्शन
7
शिक्षकाचं संपूर्ण कुटुंब संपवणारा आरोपी अखेर अटकेत, समोर आली धक्कादायक माहिती
8
INDW vs NZW: भारतीय महिला संघाचा पहिला सामना; New Zealand Women सेट करणार टार्गेट
9
PAK vs ENG : आपल्याच देशात पाकिस्तानची 'कसोटी'! पण पहिल्या सामन्यापूर्वी मिळाला सुखद धक्का
10
“राज्यातील राजकारणाला जनता कंटाळली, एक सुसंस्कृत पर्याय म्हणून तिसरी आघाडी”: संभाजीराजे
11
दहशतवाद्यांचा कर्दनकाळ माजी IPS अधिकारी आता BCCI मध्ये काम करणार; मोठी जबाबदारी मिळाली!
12
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर पाकिस्तानला जाणार; SCO शिखर परिषदेत सहभागी होणार
13
काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा आजचा कोल्हापूर दौरा रद्द, कारण..
14
२२ वर्षांनी घेतला वडिलांच्या हत्येचा बदला, मुलाने खुन्याला त्याच स्टाईलनं संपवलं   
15
TRAI कडून पुन्हा कारवाई, १८ लाखांहून अधिक मोबाईल नंबर्स ब्लॉक; तुम्हीही करत आहात ही चूक?
16
कॅनडातील भीषण वास्तव; वेटरच्या नोकरीसाठी सुशिक्षित भारतीयांनी लावल्या रांगा...
17
इस्रायलची मोठी कारवाई; हिजबुल्लाह प्रमुख हाशिम सफीद्दीनचा खात्मा, आता फक्त एकच जिवंत...
18
पाकिस्तानी हिंदू विद्वानानं झाकीर नाईकला आरसा दाखवला; कट्टरपंथी मानसिकतेवर बोचरा प्रश्न विचारला अन्...
19
Women’s T20 World Cup : कोडं सुटलं; पण Harmanpreet Kaur समोर उभं राहिलं मोठं चॅलेंज
20
मच्छिमार महामंडळासाठी ५० कोटी मंजूर, राज्य सरकारचे मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय, वाचा...

सिग्नल बंद असल्याने वसईमध्ये कोंडी वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2019 2:11 AM

दुरुस्तीचा अभाव : महापालिका म्हणते नागरिक बेशिस्त

विरार : वसई विरार शहरात नवीन सिग्नल बसवण्याचा महापालिकेचा प्रयत्न आहे. मात्र, पूर्वीपासून असलेल्या सिग्नलची महापालिकेकडून देखरेख होत नसल्याने नागरिकांना वाहतूक कोंडीचा त्रास होत आहे. जकात नाक्यावरील सिग्नल वारंवार बंद पडत आहे तर, विरार पूर्वेला असलेला सिग्नल पाळला जात नाही, यामुळे सतत वाहतूक कोंडीमध्ये वाढ होत आहे.

विरार पश्चिम व पूर्वेला एक - एक सिग्नल बसवण्यात आला आहे. मात्र, महापालिकेकडून त्याचाही सांभाळ व्यवस्थित होत नसल्याने नागरिकांना कोंडीचा सामना करावा लागत आहे. विरार पश्चिमेला जकात नाका या मुख्य रस्त्यावर गेल्या वर्षी सिग्नल बसवण्यात आला. मात्र, त्याचे पालन व्यवस्थितरित्या केले जात नाही म्हणून बेशिस्तीचे खापर नागरिकांवर फोडले जात होते.जकात नाक्यावरील सिग्नल हा दर रविवारी बंद असतो (दोन महिन्यांनी एखादा रविवार सुरु असतो) तसेच गेल्या आठवड्यात हा सिग्नल तिसऱ्यांदा बंद असल्याची घटना घडली. खरं तर सुट्टीच्या दिवशी रस्त्यांवर ट्राफिक जॅम असते.

पूर्वी सिग्नलच्या नियमांचे पालन होत नसल्याने नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली होती. त्यानंतर वाहतूक पोलीस उभे करण्यात आल्यानंतर नागरिकांकडून सिग्नलचे पालन व्यवस्थित रित्या सुरु झाले होते. नागरिकांना आता सिग्नलची सवय लागल्याने ते बंद पडल्यानंतर कधी थांबावे, कधी निघावे याचा अंदाज येत नसल्याने ते कशीही वाहने चालवतात आणि त्यामुळे वाहतूक कोंडीमध्ये वाढ होत आहे.पाच ठिकाणी दुरुस्ती १५ नवे सिग्नलच्विरार पूर्वेला असलेल्या सिग्नलचे पालन होत नाही व त्याची देखरेखीसाठी वाहतूकविभागाकडे कर्मचारी नसल्याने चालक कसेही गाड्या चालवतात. सिग्नल असूनही नागरिकांना वाहतूककोंडीचा सामना करावा लागतो आहे. महापालिकेतर्फे ५ ठिकाणी सिग्नल व्यवस्थेचे काम सुरु आहे व १५ नवीन सिग्नल बसवण्यात येणार आहेत.च्परंतु, जे आहेत ते सांभाळले जात नाहीत. विरार पश्चिमेला असलेला एकमेव सिग्नल सतत बंद पडत असल्याने नागरिकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत असला तरी यामुळे अपघात होण्याची देखील शक्यता आहे. 

‘काही छोटे तांत्रिक बिघाड असतील, परंतु चौकशी करून आम्ही लवकरच दुरूस्त करू. तसेच वाहतूक पोलीस देखील लवकरच तैनात करू. सध्या संख्या कमी असल्याने अडचण होत आहे पण आमचे प्रयत्न सुरु आहेत नागरिकांना त्रास होणार नाही याची काळजी घेऊ.’- संपत पाटील, वाहतूक पोलीस अधिकारी