शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: विधानसभेसाठी वंचितचा धमाका; ११ उमेदवारांची पहिली यादी जाहीर
2
"या तीन घराण्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये दहशत पसरवली" अमित शाहांचा विरोधकांवर हल्लाबोल
3
जरांगेंच्या तालावर मुख्यमंत्री नाचतात; ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंची बोचरी टीका
4
"काशीचा प्रसाद मिळाला, तेव्हा माझ्या मनात तिरुपतीचा विचार आला", लाडू वादावर माजी राष्ट्रपतींनी व्यक्त केली चिंता
5
LLC 2024 : इरफान पठाणची जादू अन् विजयी सलामी; जुन्या आठवणींना उजाळा, भज्जीचा संघ हरला
6
BSNL नं जिओ, एअरटेल, Vi ला दिला 'जोर का झटका'; एकाच महिन्यात वाढले लाखो ग्राहक
7
'खोसला का घोसला'मधील लोकप्रिय अभिनेत्याचा भीषण अपघात, ICU त उपचार सुरु
8
काय सांगता! ६०० ब्राह्मण करतात तिरुपतीचा प्रसाद; १ लाख लाडू रामलला चरणी केले होते अर्पण
9
Leela Palace IPO: पैशांची व्यवस्था करून ठेवा! आता दिग्गज हॉटेल ब्रँडचाही येणार IPO; पाहा डिटेल्स
10
"पोलीस कर्मचाऱ्याच्या मुलाचा मृत्यू झाला असता तर आरोपीला ३० मिनिटांत जामीन दिला असता का?"
11
हिज्बुल्लाहची झोप उडवणाऱ्या कंपनीची CEO असणारी ही फिल्मी महिला आहे तरी कोण? 
12
तिरुपती बालाजींवर कुबेराचे ऋण; आजही भाविक फेडतात कर्ज! वाचा, लाडू प्रसादम अद्भूत गोष्टी
13
IND vs BAN : शुबमन गिलची कमाल! शतकी खेळीसह द्रविड-कोहलीसह रुट-बाबरला धोबी पछाड!
14
पॅसेन्जरच्या जेवणात निघाला जिवंत उंदीर, कराव लागलं विमानाचं इमरजन्सी लॅन्डिंग; नेमकं काय घडलं?
15
पितृपक्षात महालक्ष्मी गजकेसरी योग: ९ राशींना वरदान काळ, सर्वोत्तम संधी; लाभच लाभ, शुभ होईल!
16
मशिदीचे अतिक्रमित बांधकाम स्वतःहून काढण्यासाठी विश्वस्तांनी मागितली मुदत
17
३ महिन्यांपासून थंडावलेले डिफेन्स कंपन्यांचे स्टॉक्स; आता जोरदार तेजी; एकात लागलं अपर सर्किट
18
"राजानं प्रखर टीका सहन करुन चिंतन करायला हवं"; नितीन गडकरींचे मोठं वक्तव्य
19
नवरी जोमात, नवरा कोमात! घरातून पळाली; बॉयफ्रेंडशी केलेल्या लग्नाचे पाठवले फोटो, पती म्हणतो...
20
डिविडेंड, व्याजाच्या पेमेंटवर SEBI चे नवे नियम; Mutual Funds साठीही गूड न्यूज

अवकाळी पावसामुळे शेतकरी, मच्छीमारांचे झाले मोठे नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Published: May 03, 2023 10:39 AM

पाच तास धुमाकूळ घातल्याने साचली पाण्याची डबकी

पालघर - जिल्ह्यात पालकमंत्र्यांच्या हस्ते १ मे रोजी ध्वजारोहण सुरू असतानाच पावसाने पाच तास धुमाकूळ घातल्याने कार्यक्रम स्थळाजवळ पाण्याची डबकी निर्माण झाली, तर जिल्ह्यात पावसामुळे वीटभट्टी, सुके मासे यासह आंबा, जांभूळ, भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

पालघर जिल्ह्यातील एकूण आठ तालुक्यांत १ लाख ४७ हजार ४२५ हेक्टर लागवडीचे क्षेत्रफळ असून, त्यातील १ लाख ४ हजार क्षेत्रावर भात, नागली, वेलवर्गीय भाजीपाला, फळे आदींची लागवड केली जाते. रविवारी जिल्ह्यातील पालघर, डहाणू, विक्रमगड, जव्हार, मोखाडा येथे तासभर पाऊस कोसळला होता. तर १ मे रोजी पालघरच्या पोलिस परेड ग्राऊंडवर  ध्वजारोहण कार्यक्रमादरम्यान अचानक आकाशात काळे ढग जमून जोरदार पावसाला सुरुवात झाली होती. त्यामुळे पालकमंत्र्यांसह सर्व लोकप्रतिनिधी, शासकीय अधिकाऱ्यांना सुमारे दीड तास अडकून पडावे लागले होते. दुसरीकडे मिरची, पडवळ, कारली, भोपळी मिरची या भाजीपाल्याचे तर आंबा, काजू, जांभूळ आदी पिकांचे मोठे नुकसान होत झाडाखाली आंबा, जांभूळ या फळांचा मोठा सडा पडला होता. पालघर, डहाणू, वसई तालुक्यातील फुल शेतीसह किनारपट्टीवर वाळत घातलेल्या बोंबील, मांदेली, करंदी आदींना मोठा फटाका बसला. त्याचे लाखो रुपयांचे नुकसान झाले.  

चिखलामुळे वाहनचालकांना करावी लागली कसरतकार्यक्रमाच्या ठिकाणी आलेल्या चारचाकी गाड्या चिखलात रुतून बसल्याने ही वाहने बाहेर काढताना वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागली. जिल्ह्यात ऑक्टोबर-नोव्हेंबरनंतर मार्च महिन्यात पडलेल्या पावसाने फळे, फुले आणि पिकांचे मोठे नुकसान झाले होते. त्या नुकसानीचे पंचनामे पूर्ण होत नाहीत, तोपर्यंत उरलेल्या पिकाचे पुन्हा नुकसान झाल्याचे दिसून आले.