शहरं
Join us  
Trending Stories
1
बापरे बाप, धावत्या रेल्वेत निघाला भलामोठा साप; प्रवाशांची धावपळ उडाली, पहा Video...
2
नाना पटोलेच होतील पुढील मुख्यमंत्री; काँग्रेस नेत्याचा दावा, नागपुरातील सहाही जागांवर लढणार
3
PM Modi US Visit Live: ...पण नियतीने मला राजकारणात आणले; मोदींनी अमेरिकेत भारतीयांसमोर मन मोकळे केले
4
Pune Rain Update: तीन दिवस उकाडा, पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात; अवघ्या 5 मिनिटात रस्त्याला नदीचे स्वरूप
5
मालदीवनंतर श्रीलंकाही चीनच्या गळाला; मार्क्सवादी अनुरा कुमारा दिसानायके नवे राष्ट्रपती
6
हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम फेल केले; नागरिकांवर बंकरमध्ये लपण्याची वेळ
7
धक्कादायक! अरबाज पटेल घराबाहेर, आठ आठवड्यांचा प्रवास संपला; निक्कीला अश्रू अनावर
8
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
9
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला
10
खंबाटकी घाटात थरार! कंटेनर आठ वाहनांना धडकला; पाचजण जखमी 
11
UPA सरकार पाकिस्तानला घाबरायची; शाहपूरकंडी प्रकल्पावरुन जेपी नड्डांचा काँग्रेसवर हल्लाबोल
12
मुकेश अंबानी यांनी खरेदी केले सर्वात महागडे विमान; किंमत ऐकून फक्त 'शून्य' मोजत बसाल...
13
४४० व्होल्टचा झटका! १८ वर्षे 'तो' शेजाऱ्याचं वीज बिल भरत राहिला, असं समोर आलं 'सत्य'
14
Zerodha च्या नावाने सुरू आहे फ्रॉड, तुम्ही तर अडकला नाहीत ना?
15
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
16
जो बायडेन यांची विसरण्याची समस्या वाढली; स्टेजवर PM मोदींचे नाव विसरले, video व्हायरल
17
इस्रायलच्या औषधानंतर ६५ वर्षांच्या व्यक्तीला २५ वर्षांचे करणारी मशीन; ठग दाम्पत्याने ५०० लोकांना लुटले
18
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
19
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव

भूकंपाने पुन्हा हादरली तलासरी परिसरातील घरे; नागरिकांत घबराट

By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2019 12:25 AM

तलासरी - डहाणू परिसरात मंगळवारी पहाटे पुन्हा एकदा भूकंपाचा जोरदार धक्का बसला.

तलासरी : तलासरी - डहाणू परिसरात मंगळवारी पहाटे पुन्हा एकदा भूकंपाचा जोरदार धक्का बसला. या धक्क्यामुळे पहाटे साखर झोपेत असलेल्या लोकांमध्ये घबराट पसरली. अनेक जणांनी घराबाहेर धाव घेतली. अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या या भूकंपाच्या धक्क्यांची कारणमीमांसा शोधण्यास मात्र सरकारी यंत्रणा अपयशी ठरली आहे.मंगळवारी सकाळी बसलेला धक्का जोरदार होता. त्याची ३.२ रिश्टर स्केल एवढी नोंद झाली. मात्र, धक्क्यांची तीव्रता बघता झालेल्या नोंदीबाबत शंका निर्माण होऊ लागली आहे. भूकंपाच्या या जोरदार धक्क्याने कोणताही अनुचित प्रकार घडला नसल्याचे महसूल विभागाने सांगितले.नियमति बसणाऱ्या या धक्क्यांनी लोकांच्या मनात स्थलांतराचा विचार डोकावतो आहे. पण उपाय योजना करण्याकडे यंत्रणेचे दुर्लक्ष होते आहे. घरे, शाळा, अंगणवाड्या धोकादायक झाल्या आहेत. या धोकादायक घरात राहणे म्हणजे जीव धोक्यात घालणे आहे.सरकारी यंत्रणेकडून मिळणारी मदत तुटपुंजी आहे, तडे गेलेल्या घरांना अवघे सहा हजार रुपये दिले जातात. हे म्हणजे आपत्तीग्रस्त लोकांच्य जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.शाळा, अंगणवाड्यांना महसूल कडून तंबूसाठी पुरविलेल्या ताडपत्र्या अडगळीत पडून वा गायब झाल्या आहेत. ही बाब जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांच्या निदर्शनास आणून देऊनही त्यांच्याकडून अद्याप काहीही कार्यवाही झालेली नाही. यामुळे नागरिकांमध्ये नाराजी आहे.

टॅग्स :Earthquakeभूकंपpalgharपालघर